शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

चार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, नऊ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 00:57 IST

विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे, जांभा, वेहेलपाडा, मोहबु या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत असून या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकुण ९ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत.

विक्रमगड - तालुक्यातील सुकसाळे, जांभा, वेहेलपाडा, मोहबु या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत असून या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकुण ९ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. २७ ग्रामपंचायाती पैकी ६ ग्रामपंचायतीमध्ये अर्ज प्राप्त न झाल्याने व १७ ग्रामपंचायती बिनविरोधत झाल्या होत्या. गेल्या महिनाभरापासुन धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या होत्या. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २३ जुन रोजी मतदान होणार आहे़ यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे़ विक्रमगड तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पाच मतदार केद्रावर रविवारी सकाळी ७़ ३० ते सायंकाळी ५़ ३० या वेळेत निवडणुक होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. निवडणुक शांततेत पार पाडाव्यात यासाठी पाचही मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्या आहेत. या निवडणूकीचे निकाल २४ जुन रोजी पंचाय समिती कार्यालय विक्रमगड येथे उपलब्ध होणार असून विक्रमगड तालुक्यातील २७ पैकी ०४ ग्रामपंचायतीची मतमोतणी २३ जुन रोजी पंचायत समिती कार्यालय विक्रमगड येथे होणार आहे़ त्या अनुशंगाने तेथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीदार कार्यालयाकडून व पोलिस कर्मचारी, अधिकारी व राखीव दजाच्या तुकडया मिळून ४४ कर्मचारी नेमण्यात आले आहेत़. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष-५, मतदान अधिकारी एक-५, मतदान अधिकारी दोन-५, मतदान अधिकारी तीन-५, शिपाई-५, पोलिस कर्मचारी-५, राखीव टीम एक कर्मचारी-५, निवडणुक निर्णय अधिकारी -०३, झोनल अधिकारी-४, लिपीक-२ असे कर्मचारी यंत्रणा सज्ज झाली आहे़ गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला या ग्रामपंचायत निवणुकीचा प्रचार शुक्रवारी थांबला असून उमेदवार रविवारी होणाºया निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विक्रमगड तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीच्या ५ वार्ड ९ जागांसाठी निवडणूक होत आहे़ आज मतदाराचे भवितव्य मतपेटीत बंद होऊन निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे़ स्थानिक स्वराज्यस्थेमध्ये ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना महत्व प्राप्त झालेले आहे़ गेल्या काही वर्र्षांमध्ये तालुक्याच्या ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या माध्यमातुन झालेल्या विकासकामांमुळे चेहरा-मोहरा बदलत चालला आहे. झालेल्या विकासकामांमुळे व होणाºया विकासकामांमुळे अनेक गावांची खेडयांची वाटचाल ही शहरीकरणाच्या दिशेने होत आहे़ ग्रापंचायतींनी आपला विकास आपल्या हाती ही संकल्पना राबविल्याने हे शक्य होतआहे़ 

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतVasai Virarवसई विरार