शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

विश्वनाथ पाटील यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 04:13 IST

उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसची सर्व पदे सोडली : समिती नेमली, ३ दिवसांत भूमिका घेणार

वसंत भोईरवाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने उमेदवारी डावलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस व कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सोमवारी शहापूर येथे झालेल्या भूमिपुत्रांच्या निर्धार सभेत काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिले असून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत भूमिका घेण्यासाठी कुणबी समाजातील राजकीय धुरिणांची समिती नेमण्याची घोषणा करून येत्या तीन दिवसात तिच्या अहवालानुसार ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. विश्वनाथ पाटील यांचे संभाव्य बंड लक्षात घेता कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार सुरेश टावरे यांना खूप सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाडा येथे झालेल्या कुणबी सेनेच्या मेळाव्यात विश्वनाथ पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.भिवंडी लोकसभेत असलेल्या सहा लाख कुणबी समाजाच्या एक गठ्ठा मतांवर लक्ष ठेवून काँग्रेसने तत्कालीन विद्यमान खासदार सुरेश टावरे यांचे तिकीट कापून विश्वनाथ पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे देशभरात मोदी लाट असतांना भिवंडी लोकसभेतून पाटील यांना सुमारे तीन लाख मते मिळाली तरी त्यांचा निसटता पराभव झाला.2014 च्या लोकसभेत मिळविलेले मते लक्षात घेता काँग्रेस पक्ष आपल्याला पुन्हा उमेदवारी देईल असा विश्वास विश्वनाथ पाटील व त्यांच्या समर्थकांना होरा होता. परंतु तिकिटाच्या स्पर्धेत माजी खासदार सुरेश टावरे यांनी बाजी मारल्याने पाटील व त्यांच्या कुणबी सेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहे.पान /३दोन्ही उमेदवार आगरी असल्याने कुणबी समाज नाराजभिवंडी लोकसभा मतदारसंघात सुमारे साडेसहा लाख कुणबी मतदार असताना भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आगरी समाजातील उमेदवार दिल्याने वाडा तालुक्यातील बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजात दोन्ही पक्षांविषयी नाराजी आहे.वंचित बहुजन आघाडीने मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व कुणबी समाजातील नावाजलेले व्यक्तिमत्व डॉक्टर अरु ण सावंत यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. परंतु विश्वनाथ पाटलांसारख्या कुणबी समाज नेतृत्वाचे वजन लक्षात घेऊन ती उमेदवारी त्याना मिळाल्यास कुणबी समाजाचे धु्रवीकरण होऊ शकते.खासदार कपिल पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे भूमिपूजन वरिष्ठांच्या उपस्थित उरकून घेतले असताना दुसरीकडे गत निवडणुकीत वाडा तालुकावासियांना आश्वासन दिलेल्या कल्याण-भिवंडी-वाडा-डहाणू मार्गाविषयी चक्कार शब्दही उच्चारला नाही. त्याविषयी तालुक्यात नाराजी आहे.बंडखोरांचे उपद्रवमूल्य : गुंता वाढलाकाँग्रेस पक्षाने माजी खासदार सुरेश टावरे यांची उमेदवारी जाहीर करताच तिकिटाच्या शर्यतीतील काँग्रेसचे कुणबी समाजाचे नेते विश्वनाथ पाटील यांनी केलेली बंडखोरीची भाषा तसेच भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुरेश टावरे यांच्या विरोधात केलेल्या बंडामुळे मतदारसंघात नकारात्मक संदेश गेला आहे.बंडोबांच्या या समिकरणामुळे भाजपच्या कपिल पाटील यांना धक्का बसू शकतो. त्यातच शिवसेनेचे सुरेश म्हात्रे हे कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक असून त्यांनी सुरु वातीपासून पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यांनी बंड केल्यास व वाडा तालुक्यातील नाराज शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास पाटलांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

टॅग्स :congressकाँग्रेसVasai Virarवसई विरार