शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

विरार-वसईकरांची चिंता वाढली; तिन्ही धरणातील पाणी आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:00 IST

२५ टक्केच साठा : सूर्या-धामणी, पेल्हार व उसगाव धरणातील पाणी आटले

आशिष राणे वसई : राज्य हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे ७ जून रोजी होणारे आगमन आठवडाभर लांबले असल्याने साधारण १५ जून नंतरच वरुणराजा सर्वत्र बरसेल असे चित्र आहे. मात्र या दरम्यानच्या काळात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष शहरी व ग्रामीण भागात जाणवण्याची चिन्हे आहेत.

दि. ३१ मार्च अखेरीसपर्यंत वसई-विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणी, पेल्हार आणि उसगाव या तिन्ही धरणात एकूण ४७.४३ टक्के असा मुबलक साठा असल्याची अधिकृत आकडेवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिल्यावर मुबलक साठा असल्याने यापुढे ही वसईत पाणीकपात होणार नाही असे ही त्यावेळी महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र आताच्या परिस्थितीत दोन महिन्यात धरणातील पाणी साठा घटल्याने ताज्या आकडेवारीनुसार वसईकरांनो पाणी जपून वापरा, असे म्हणण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. दि.१ जूनपर्यंत धरणात सरासरी २५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती शहर अभियंता माधव जवादे यांच्याकडून प्राप्त झाली आहे. पालघरसहित वसई तालुक्यातील या तीन धरणांचा एकूण साठा सरासरी २५ टक्के इतका राहिला असून यामध्ये मुख्य सूर्या-धामणी धरणात आता केवळ २०.०२ टक्के इतका पाणी साठा शिल्लक राहिला असून ही बाब वसईकरांच्या दृष्टीने चिंतेची आहे. वसई, नालासोपारा, विरार, नायगाव ही चार शहरे आणि ग्रामीण भाग वसई विरार महापालिका हद्दीत येतात. वाढते नागरिकीकरण आणि त्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन करता यावे, या प्रयोगात पालिका यशस्वी झाल्याने यंदा मार्च अखेरीसपर्यंत धरणात मुबलक साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंताकडून सांगण्यात आले. असले तरी आता दोन महिन्यात धरणातील पाणीसाठा व त्याची पातळी बºयापैकी खालावली आहे.

पाऊस लांबल्यास पाणीकपात अटळवसई -विरार शहराला सूर्या- धामणी धरणातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा- ३ मधून ५० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हारमधून १० एमएलडी पाणी प्रतिदिन उचलायला मिळत असते. मागील दोन वर्षांपूर्वी पाण्याची टंचाई भासली होती. तशी गतवर्षी सुद्धा जुलै-२०१८ व सप्टेंबर नंतर पाहिजे तसा समाधानकारक पाऊस पडला नाही. परंतु यंदा पालिकेने पाण्याचे उचित असे नियोजन केल्याने व अमृत योजना ही बºयापैकी कार्यान्वित झाल्याने यावेळी धरणात पाण्याचा साठा अजून ही तसा समाधानकारक आहे.याउलट बहुतांशी गंभीर स्थिती पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असून जिल्ह्यातील अनेक गावांना अजून ही पुढील १५ जूनपर्यंत पाऊस पडला नाही तर सर्वत्र मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

तीन धरणातील १ जूनपर्यंत शिल्लक पाण्याची आकडेवारीवसई- विरार शहराला मुख्य अशा सूर्या प्रकल्प म्हणजेच धामणी, उसगाव आणि पेल्हार धरणाच्या माध्यमाने नियमित पाणीपुरवठा होतो. त्यातच मागील वर्षीपासून विरार पूर्वेतील पापडखिंड धरण बंद करण्यात आले आहे. मात्र त्याचा काही फार असा फरक पडणार नाही.जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात पाण्याची मोठी टंचाई आहे. त्यातच आपल्या शहरी भागात पाणी पुरवठा करणारी तीन धरणे असून त्यात आज १५ जून अखेरपर्यतही कमी का होईना मात्र अजूनही पाण्याचा साठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Waterपाणी