शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

विरार-वसईकरांची चिंता वाढली; तिन्ही धरणातील पाणी आटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:00 IST

२५ टक्केच साठा : सूर्या-धामणी, पेल्हार व उसगाव धरणातील पाणी आटले

आशिष राणे वसई : राज्य हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे ७ जून रोजी होणारे आगमन आठवडाभर लांबले असल्याने साधारण १५ जून नंतरच वरुणराजा सर्वत्र बरसेल असे चित्र आहे. मात्र या दरम्यानच्या काळात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष शहरी व ग्रामीण भागात जाणवण्याची चिन्हे आहेत.

दि. ३१ मार्च अखेरीसपर्यंत वसई-विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणी, पेल्हार आणि उसगाव या तिन्ही धरणात एकूण ४७.४३ टक्के असा मुबलक साठा असल्याची अधिकृत आकडेवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिल्यावर मुबलक साठा असल्याने यापुढे ही वसईत पाणीकपात होणार नाही असे ही त्यावेळी महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र आताच्या परिस्थितीत दोन महिन्यात धरणातील पाणी साठा घटल्याने ताज्या आकडेवारीनुसार वसईकरांनो पाणी जपून वापरा, असे म्हणण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. दि.१ जूनपर्यंत धरणात सरासरी २५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती शहर अभियंता माधव जवादे यांच्याकडून प्राप्त झाली आहे. पालघरसहित वसई तालुक्यातील या तीन धरणांचा एकूण साठा सरासरी २५ टक्के इतका राहिला असून यामध्ये मुख्य सूर्या-धामणी धरणात आता केवळ २०.०२ टक्के इतका पाणी साठा शिल्लक राहिला असून ही बाब वसईकरांच्या दृष्टीने चिंतेची आहे. वसई, नालासोपारा, विरार, नायगाव ही चार शहरे आणि ग्रामीण भाग वसई विरार महापालिका हद्दीत येतात. वाढते नागरिकीकरण आणि त्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन करता यावे, या प्रयोगात पालिका यशस्वी झाल्याने यंदा मार्च अखेरीसपर्यंत धरणात मुबलक साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंताकडून सांगण्यात आले. असले तरी आता दोन महिन्यात धरणातील पाणीसाठा व त्याची पातळी बºयापैकी खालावली आहे.

पाऊस लांबल्यास पाणीकपात अटळवसई -विरार शहराला सूर्या- धामणी धरणातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा- ३ मधून ५० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हारमधून १० एमएलडी पाणी प्रतिदिन उचलायला मिळत असते. मागील दोन वर्षांपूर्वी पाण्याची टंचाई भासली होती. तशी गतवर्षी सुद्धा जुलै-२०१८ व सप्टेंबर नंतर पाहिजे तसा समाधानकारक पाऊस पडला नाही. परंतु यंदा पालिकेने पाण्याचे उचित असे नियोजन केल्याने व अमृत योजना ही बºयापैकी कार्यान्वित झाल्याने यावेळी धरणात पाण्याचा साठा अजून ही तसा समाधानकारक आहे.याउलट बहुतांशी गंभीर स्थिती पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असून जिल्ह्यातील अनेक गावांना अजून ही पुढील १५ जूनपर्यंत पाऊस पडला नाही तर सर्वत्र मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

तीन धरणातील १ जूनपर्यंत शिल्लक पाण्याची आकडेवारीवसई- विरार शहराला मुख्य अशा सूर्या प्रकल्प म्हणजेच धामणी, उसगाव आणि पेल्हार धरणाच्या माध्यमाने नियमित पाणीपुरवठा होतो. त्यातच मागील वर्षीपासून विरार पूर्वेतील पापडखिंड धरण बंद करण्यात आले आहे. मात्र त्याचा काही फार असा फरक पडणार नाही.जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात पाण्याची मोठी टंचाई आहे. त्यातच आपल्या शहरी भागात पाणी पुरवठा करणारी तीन धरणे असून त्यात आज १५ जून अखेरपर्यतही कमी का होईना मात्र अजूनही पाण्याचा साठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Waterपाणी