शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

विरार कॉरिडोर सर्व्हेला स्थगिती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:30 IST

गैरसमज असेल तर आताच दूर करा : प्रांताधिकाऱ्यांच्या सूचना

वसई : विरार-पनवेलरेल्वे कॉरिडॉरच्या विरोधात आता नवघर पूर्वेकडील रहिवासी एकवटले असून, चुकीच्या पद्धतीने परियोजनेच्या सर्वेक्षणाला विरोध केला जात आहे. त्यामुळे सर्व्हे करतांना नागरिकांची बाजू ऐकून घ्या व त्यांचा काही गैरसमज असेल तर आत्ताच दूर करा अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, सर्वेक्षणाला कोणतीही स्थगिती नसल्याचे प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारी वसईतील सदिच्छा सेवा मंडळ सभागृहात गृहसंकुलाचे अध्यक्ष, सचिव, सभासद व स्वतंत्र घरात राहणाºया रहिवाशांची बैठक झाली. याठिकाणी अनेकांनी कर्ज घेऊन सदनिका, गाळे घेतले आहेत. रेल्वेच्या प्रकल्पासाठी ते हटविले जाणार असल्याने रहिवाशांची, कारखानदारांची झोप उडाली आहे. त्याचा मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याने नव्या ठिकाणी घर घेणे परवडणार नाही.

गेली अनेक वर्ष नवघर पूर्वेला वस्ती उभी आहे. विरार, नालासोपारा वसई मार्गावरून प्रकल्प जाणार असल्याने रेल्वेने जास्त जागा वसईतून का मागितली आहे. नागरी वस्तीचा विचार करून कॉरिडॉरचा मार्ग मिठागरातून न्यावा अशा सूचना यावेळी नागरिकांनी केल्या. जोपर्यंत रहिवाशांना न्याय मिळत नाही तोवर शिवसेना लढा देणार असल्याचे राजाराम बाबर यांनी सांगितले.

नवघर पूर्वेला १२५ गृहसंकुले, बैठी घरे तसेच १०८ इमारतीत औद्योगिक कारखाने व झोपडपट्टी अशी संमिश्र वस्ती आहे. याबाबत रेल्वेच्या अधिकाºयांना भेटणार असून प्रकल्पाला ठाम विरोध करणार आहोत. जोवर नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जात नाही. तोवर गप्प बसणार नाही असे ते म्हणाले.या आहेत रहिवाशांच्या गंभीर अडचणीआता आमची राहती घरे उध्वस्त होणार आहेत. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. गृहसंकुलात राहत असलो तरी बºयाच इमारती या मालकांच्या नावावर असल्याने जरी रेल्वेने मोबदला दिला तरी तो जमीन मालकाला मिळेल मग आमचे काय? आम्ही आमचे कुटुंब घेऊन कुठे जायचे. या तांत्रिक अडचणी सुटल्या पाहिजेत. असे नवघर पूर्व येथील रहिवासी सांगत आहेत. नागरी वस्तीतून प्रकल्प उभारण्यापेक्षा रेल्वेने पर्यायी जागा निवडावी. आमच्या वस्तीला वाचवा अनेक इमारतींच्या कन्व्हेयंस सातबाºयावर मालकाचे नाव आहे. महागाईच्या काळात दुसरीकडे घर घेणे शक्य होणार नाही. रेल्वेने सर्वबाजूने विचार करावा.या आहेत रहिवाशांच्या गंभीर अडचणीआता आमची राहती घरे उध्वस्त होणार आहेत. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. गृहसंकुलात राहत असलो तरी बºयाच इमारती या मालकांच्या नावावर असल्याने जरी रेल्वेने मोबदला दिला तरी तो जमीन मालकाला मिळेल मग आमचे काय? आम्ही आमचे कुटुंब घेऊन कुठे जायचे. या तांत्रिक अडचणी सुटल्या पाहिजेत. असे नवघर पूर्व येथील रहिवासी सांगत आहेत. नागरी वस्तीतून प्रकल्प उभारण्यापेक्षा रेल्वेने पर्यायी जागा निवडावी. आमच्या वस्तीला वाचवा अनेक इमारतींच्या कन्व्हेयंस सातबाºयावर मालकाचे नाव आहे. महागाईच्या काळात दुसरीकडे घर घेणे शक्य होणार नाही. रेल्वेने सर्वबाजूने विचार करावा. 

विरार - पनवेल कॉरिडॉरसाठी सर्व्हे सुरु झाला आहे. नवघर पासून ज्या ठिकाणाहून रेल्वेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याठिकाणी हे काम सुरु आहे. या प्रक्रियेला स्थगिती देण्ंंंयात आलेली नाही. काही अडचणी, गैरसमज आहेत का हे तपासले जाणार आहे.- दीपक क्षीरसागर, प्रांताधिकारी, वसई

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpanvelपनवेलrailwayरेल्वे