शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

गावितांनी आघाडी कायम ठेवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:58 IST

भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकी.....

हितेन नाईकपालघर : भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावीत यानी शिवसेनेचे श्रीनिवासन वनगा याचा २९ हजार ५७२ मतानी दणदणीत पराभव केला. ह्या निवडणुकीत सेनेला वनगांच्या मृत्यूच्या सहानुभूतीचा लाटेचा फायदा मिळेल ही अपेक्षा मतदारांनी फोल ठरविली.संपूर्ण देशभर गाजलेल्या पालघर लोकसभा पोट निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, माकप, शिवसेना, बविआ व दोन अपक्ष असे सातजण रिंगणात होते. निवडणूक प्रचारात विकासाचे मुद्दे बाजूला टाकून सेनेने चितामण वनगाच्या कुटुंबियांकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याचे व सेनेने भाजपाचा कार्यकर्ता तर भाजपाने काँग्रेसचा कार्यकर्ता पळविल्याचा मुद्दा चर्चेत येत होता.पालघरच्या शासकीय गोदामात गुरु वारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. एकुण ३३ फेर्या मध्ये मतमोजणी करण्यात येणार असल्याने निकाल एकण्यासाठी जिल्ह्यातील नागरीक उत्सुक होते. मात्र यावेळी सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होईल ह्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु पहिल्या फेरीतच भाजप ने आघाडी घेतल्याने मतमोजणी ठिकाणा पासून सेना कार्यकर्त्यांनी दूर राहणेच पसंद केले.मतमोजणीच्या पिहल्या फेरीतच भाजपाचे राजेंद्र गावीत यानी बविआचे बळीराम जाधव यांच्यावर १४६ मताची आघाडी घेतली ती सलग पाचव्या फेरी पर्यत वाढत जात १६ हजार ४५० मतांची आघाडी बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यावर घेतली. तर सेना ४२ हजार ५७६ मत पडून तिसऱ्या क्र मांकावर राहिली.सहाव्या फेरीत दुसºया क्र मांकावर असलेल्या बवीआच्या उमेदवाराला (४७ हजार ६०६) मागे टाकीत सेनेचे श्रीनिवास (५२ हजार ८९३ मते) हे दुसºया क्र मांकावर पोचले. मात्र तोपर्यत राजेंद्र गावीत यानी एकुण ६७ हजार ९७५ मते मिळवीत सेनेवर 15 हजार ०८२ मताची आघाडी घेण्यात यश मिळविले. गवितांनी पिहल्या फेºया पासून घेतलेली आघाडी शेवटच्या ३३ व्या फेरी पर्यंत वाढवीत नेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढुच दिले नाही.मतमोजणीच्या अंतिम ३३ व्या फेरीत ईवीएम मधील नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील १८८ मता पैकी सर्वाधिक ८१ मते घेऊन तेथील सत्ताधारी बविआला जोरदार धक्का दिला असून तेथे काँग्रेसला ३ मते व सेनेला २५ मते आणि बविआला ७९ मते मिळवीत समाधान मानावे लागले.या निवडणुकीत माकप ने आपली पारंपरिक मत राखण्यात यश मिळविले असून ७१ हजार ८८७ मते मिळविण्यात यश मिळविले. काँग्रेसचे ५ वेळा निवडून आलेले माजी खासदार दामु शिगंडा याना पन्नास हजार मताचा आकडाही पार करता आला नसल्याने काँग्रेस पदाधिकाºयांची जिल्ह्यातील आपली ताकद समोर आल्याचे पहावयास मिळाले.