शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

विक्रमगडचा गावठी कोलम होतोय नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 05:56 IST

राहुल वाडेकर विक्रमगड: कमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास गोडीस, रुचकर व मागणी जास्त असलेल्या विक्रमगडच्या प्रसिध्द गावठी कोलम (झीनी) तांदळाची पूर्वीप्रमाणे लागवड होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आहे़ तो सध्या नामषेश होण्याच्या मार्गावर आहे़. कारण उत्पादीत मालाला कमी बाजारभाव, मजुरीचे वाढते दर, शेतीसाहित्याचा वाढलेल्या किंमती, महागाई आणि महत्वाचे ...

राहुल वाडेकर विक्रमगड: कमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास गोडीस, रुचकर व मागणी जास्त असलेल्या विक्रमगडच्या प्रसिध्द गावठी कोलम (झीनी) तांदळाची पूर्वीप्रमाणे लागवड होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आहे़ तो सध्या नामषेश होण्याच्या मार्गावर आहे़. कारण उत्पादीत मालाला कमी बाजारभाव, मजुरीचे वाढते दर, शेतीसाहित्याचा वाढलेल्या किंमती, महागाई आणि महत्वाचे म्हणजे निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील घेतल्या जाणाºया या लहान दाण्याच्या भाताचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे़ शेतकरी सध्या त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे एक चांगले वाण धोक्यात आले आहे़ सध्या हा तांदुळ बाजारात दुकानावर ५५ ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे़आजची तरुणाई शेतीबाबत उदासीन आहे. काही ठिकाणी नवनवीन सुधारीत जातीच्या वाणांची लागवड केली जात असल्याने या तांदळाचे उत्पादन घटले आहे. याच्या उत्पादनासाठी मेहनतीच्या जोडीला मोठा खर्च करावा लागतो. निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही, तर शेतकºयांच्या वाट्याला नुकसानच येते. या वाणाला कीड लवकर लागते व त्यापासून खूप जपावे लागते. तशी मेहनत घ्यावी लागते़ त्यामुळे या भातपिकाला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे विक्रमगड येथील शेतकरी घनश्याम आळशी यांनी लोकमतला सांगितले.विक्रमगड तालुक्यातील मृदा, पावसाचे प्रमाण व अनुकूल हवामान पाहता साधारण अडीच दशकांपूर्वी विक्रमगड कोलम या भातपिकाचे मोठया प्रमाणात सर्वत्र शेतकºयांकडून उत्पादन घेतले जात होते. एक सेंटिमीटर लांबीचा असणारा शुभ्र दिसणारा तांदूळ आणि त्याला येणारा गोड सुगंध यामुळे हा तांदूळ खाण्यासाठी अतिशय रुचकर म्हणून ओळखला जातो. पूर्वी भात पिकाच्या मोजक्या जाती होत्या. त्यात कोलम तांदळाला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे या भात पिकाची कोठारे तालुक्यातील विविध भागातील आदिवासी व कुणबी शेतकरी कणग्यांमध्ये भरुन ठेवत असे. मात्र अलिकडे भात पिकांच्या संकरित व सुधारित जातींमुळे या पिकाची जात दुर्लक्षित होऊन आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या जातीवरही कृषी विद्यापीठातून संशोधन होण्याची आवश्यकता आहे.