शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

विक्रमगडचा गावठी कोलम होतोय नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 05:56 IST

राहुल वाडेकर विक्रमगड: कमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास गोडीस, रुचकर व मागणी जास्त असलेल्या विक्रमगडच्या प्रसिध्द गावठी कोलम (झीनी) तांदळाची पूर्वीप्रमाणे लागवड होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आहे़ तो सध्या नामषेश होण्याच्या मार्गावर आहे़. कारण उत्पादीत मालाला कमी बाजारभाव, मजुरीचे वाढते दर, शेतीसाहित्याचा वाढलेल्या किंमती, महागाई आणि महत्वाचे ...

राहुल वाडेकर विक्रमगड: कमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास गोडीस, रुचकर व मागणी जास्त असलेल्या विक्रमगडच्या प्रसिध्द गावठी कोलम (झीनी) तांदळाची पूर्वीप्रमाणे लागवड होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आहे़ तो सध्या नामषेश होण्याच्या मार्गावर आहे़. कारण उत्पादीत मालाला कमी बाजारभाव, मजुरीचे वाढते दर, शेतीसाहित्याचा वाढलेल्या किंमती, महागाई आणि महत्वाचे म्हणजे निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील घेतल्या जाणाºया या लहान दाण्याच्या भाताचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे़ शेतकरी सध्या त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे एक चांगले वाण धोक्यात आले आहे़ सध्या हा तांदुळ बाजारात दुकानावर ५५ ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे़आजची तरुणाई शेतीबाबत उदासीन आहे. काही ठिकाणी नवनवीन सुधारीत जातीच्या वाणांची लागवड केली जात असल्याने या तांदळाचे उत्पादन घटले आहे. याच्या उत्पादनासाठी मेहनतीच्या जोडीला मोठा खर्च करावा लागतो. निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही, तर शेतकºयांच्या वाट्याला नुकसानच येते. या वाणाला कीड लवकर लागते व त्यापासून खूप जपावे लागते. तशी मेहनत घ्यावी लागते़ त्यामुळे या भातपिकाला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे विक्रमगड येथील शेतकरी घनश्याम आळशी यांनी लोकमतला सांगितले.विक्रमगड तालुक्यातील मृदा, पावसाचे प्रमाण व अनुकूल हवामान पाहता साधारण अडीच दशकांपूर्वी विक्रमगड कोलम या भातपिकाचे मोठया प्रमाणात सर्वत्र शेतकºयांकडून उत्पादन घेतले जात होते. एक सेंटिमीटर लांबीचा असणारा शुभ्र दिसणारा तांदूळ आणि त्याला येणारा गोड सुगंध यामुळे हा तांदूळ खाण्यासाठी अतिशय रुचकर म्हणून ओळखला जातो. पूर्वी भात पिकाच्या मोजक्या जाती होत्या. त्यात कोलम तांदळाला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे या भात पिकाची कोठारे तालुक्यातील विविध भागातील आदिवासी व कुणबी शेतकरी कणग्यांमध्ये भरुन ठेवत असे. मात्र अलिकडे भात पिकांच्या संकरित व सुधारित जातींमुळे या पिकाची जात दुर्लक्षित होऊन आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या जातीवरही कृषी विद्यापीठातून संशोधन होण्याची आवश्यकता आहे.