शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

विक्रमगडला भुरट्यांंची दहशत, पोलिसांना येत आहे अपयश, गस्त वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:26 IST

विक्रमगड : गेल्या काही महिन्यांपासुन विक्रमगड षहराच्या बुधवारच्या आठवडी बाजारामध्ये भरटया चोरांची दहशत वाढली

राहुल वाडेकर विक्रमगड : गेल्या काही महिन्यांपासुन विक्रमगड शहराच्या बुधवारच्या आठवडी बाजारामध्ये भरटया चोरांची दहशत वाढली असून यामध्ये जास्त लहान मुलांचा (१२ ते १५ वर्षाच्या) समावेश आहे़. ही मुले महिलांवर वॉच ठेवतात व त्यांनी काहीही खरेदीकरीता आपली पर्स बाहेर काढली की त्यांच्यावर अ‍ॅटॅक करुन पर्स पळवून नेतात. मुले लहान असल्याने ती पटकन नाहीशी होतात़ गेल्या दोन दिवसांपूर्वी विक्रमगड शहराचा बुधवारी आठवडी बाजारात पाच महिलांच्या पर्स अशा रितीने चोरण्यात आलेल्या आहेत व असेच प्रकार वाढीस लागलेले आहेत. याबाबत एपीआय विश्वास पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की अजून दोन पोलिसांची गस्त वाढवून या भुरटया चोरांवर लक्ष ठेवले जाईल़दरम्यान यापूर्वी देखील विक्रमगड शहर परिसरात वारंवार मोबाइलची दुकाने फोडून तसेच घरफोडी करण्याचे प्रकार वाढलेले होते. या टोळीला पकडण्यात अजून पोलिसांना यश आलेले नाही.एक वर्षापूर्वी चो-यांचे अधिक होते त्यामुळे शहराच्या चारही कोप-यांमध्ये पोलिसांची गस्त वाढविली होती मात्र कालांतराने गस्त कमी झाल्याने चोºयांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. तसेच अलिकडे जरीमरीनगर परिसरसत घरफोडया करुन चोरटयांनी चांदी सोने, रोख रक्कम अशी मिळून जवळ जवळ २ लाख १८ हजाराचा एैवज लंपास केला आहे.तसेच यतीन घरत, रघुनाथ दुपारी व जनार्दन पाथरवट यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्यात आली आहे. यामुळे शहराच्या कानाकोप-यांमध्ये पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहेगतवर्षी देखील याच पहील्याच आठवडयात एकाच रात्रीमध्ये याच जरीमरी नगर परिसरात जवळजवळ सहा ठिकाणी घरफोडया झाल्या होत्या. चोरी करणारे इसम प्रथम परिसराची टेहळणी करुन माहिती काढून त्याप्रमाणे रात्रीे ज्या घरास कुलूप आहे़त्या घरात चोरी करायची व आजूबाजूला असलेल्या घरांच्या कड्या बाहेरुन लावून घ्यायचे. यावेळी मात्र यतीन घरत हे चोर घरामध्ये असतांनाच लग्नाहून परत आले होते परंतु त्याचे बरोबर घरातील महिला असल्याने त्यांना काहीच करता आले नाही मात्र चोरांनी घरत यांचा गाडीचा आवज ऐकल्याने पळ काढला मात्र चोरांना पळतांना त्यांनी पाहीले परंतु ते त्यांना ओळखू शकले नाही़>गस्त वाढवासद्यस्थितीत विक्रमगडमध्ये पोलिसांची गस्त वाढली पाहीजे कारण मोबाइल दुकाने फोडणे, घरफोड्या, सायकल, पेट्रोल, मोटरसायकल यांच्या चोºया वाढल्या आहेत़ यामधील आरोपी पोलिसांच्या हाती अदयापही लागलेले नाही़. यामुळे आता पोलिस व नागरिकांनी सतर्क राहून चोरटयांना जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक जनतेकडून होते आहे़>विक्रमगड शहराच्या बुधवारी आठवडी बाजारात लहान मुलांकडून भुरटया चो-या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. एखादी महिला वस्तू खरेदी करीतांना पर्स हातामध्ये ठेवताच ती लंपास करण्याचे प्रकार होत आहे़ त्यामुळे महिलांनी देखील पोलिसांच्या भरवशावर न राहता सतर्क राहून चोरटयांना धडा शिकविला पाहिजे. आता आपल्यालाच खंबीर होण्याची गरज आहे़-अनिता पाथरवट, जरीमरी नगर विक्रमगडनागरिकांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी पोलिस ठाण्याला माहिती देणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर आपल्या घराची दारे-खिडक्या काळजीपूर्वक बंद करणे, सिक्युरिटी नेमतांना त्याची संपूर्ण पार्श्वभूमी, माहित करून घ्या, भाडेकरु ठेवतांना माहितीतलाच ठेवा. याबाबतची नोंद तरी पोलिस ठाण्यात करा. पोलिसांबरोबरच जनतेनेही जागरूक व सतर्क राहीले पाहिजे़ बाहेरगावी जातांना मौल्यवान वस्तू, दाग-दागिने घरात ठेवू नये़ तसेच बाजारामध्ये फिरतांना आजूबाजूला लक्ष ठेवावे. पर्समधील पैसे काढतांना सतर्क राहावे़- विश्वास पाटील, एपीआय, विक्रमगड