शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

रणरणत्या उन्हात विजयदिन साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 12:40 AM

तांदुळवाडी गडावरील बहुतेक पिण्याच्या टाक्यांचे पुरातत्वीय दृष्टीने संवर्धन न झाल्याने पाण्याची साठवणूक होत नसल्याने किल्ल्याच्या एकूण संवर्धनासाठी नवीन आराखडा तयार करण्यासाठी अभ्यासक श्रीदत्त राऊत ह्यांच्या सहकार्याने अनेक दुर्गिमत्रांनी तांदुळवाडी किल्ल्याला भेट दिली.

पालघर - तांदुळवाडी गडावरील बहुतेक पिण्याच्या टाक्यांचे पुरातत्वीय दृष्टीने संवर्धन न झाल्याने पाण्याची साठवणूक होत नसल्याने किल्ल्याच्या एकूण संवर्धनासाठी नवीन आराखडा तयार करण्यासाठी अभ्यासक श्रीदत्त राऊत ह्यांच्या सहकार्याने अनेक दुर्गिमत्रांनी तांदुळवाडी किल्ल्याला भेट दिली.नरवीर चिमाजी अप्पांच्या गौरवशाली वसईच्या मोहिमेतील एक महत्त्वाचा वनदुर्ग म्हणून पालघर जिह्यातील तांदुळवाडी दुर्ग इतिहास प्रसिद्ध आहे. सन १७३७ मध्ये चिमाजीअप्पाच्या उत्तर कोकणातील मोहिमेत विठ्ठल विश्वनाथ व आवजी कवडे यांनी मे १७३७ रोजी तांदुळवाडी गड पोर्तुगीजांकडून जिंकला. या घटनेस यंदा २८२ वर्षे पूर्ण झाली असून यंदाचा हा दिवस तांदुळवाडी गड विजयदिन ठरला. किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत दिनांक ४ मे २०१९ शनिवार चैत्र कृ ३० रोजी तांदुळवाडी गडाच्या विजयदिनाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर उपक्र मात स्थानिक युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर परिवाराच्या दुर्गिमत्रांनी सिक्रय सहभाग नोंदवला. वाढत्या उन्हाचा प्रभाव वाढत असतानाही एकूण ११ दुर्गिमत्रांनी सकाळी ८ वाजता तांदुळवाडी गडाच्या सोंड वाटेची चढाई सुरू केली. दिवसभराच्या उपक्र मात वास्तुदेवता पूजन, इतिहास मार्गदर्शन सफर, संवर्धन मोहिमेची दिशा, ज्ञात अज्ञात इतिहासाची पाने, भगवा ध्वज मानवंदना, महादरवाजा पूजन इत्यादीं कार्यक्र म हाती घेण्यात आले. तांदुळवाडी गडाच्या मुख्य महादरवाजा बुरु जाचा परिसर दुर्गिमत्रांनी तोरणे लावून सुशोभित केलेला होता. यावेळी महादरवाज्यावर शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे व शस्त्र पूजन करण्यात आले. तांदुळवाडी गडावरील बहुतेक पिण्याच्या टाक्यांचे पुरातत्वीय दृष्टीने संवर्धन न झाल्याने गडावरील पाण्याची गैरसोय वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले. यात बहुतेक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या संवर्धनासाठी नवीन आराखडा तयार करावा लागणार असे लक्षात आले. सदर मोहिमेत किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी सहभागी दुर्गिमत्रांना मार्गदर्शन केले.युवा शक्ती प्रतिष्ठानचे प्रतिनिधी प्रीतम पाटील यांनी तांदुळवाडी गडाच्या बालेकिल्ला वास्तूमधील मूळ देवस्थानाची सध्या झालेली दुरवस्था यावर एकित्रतपणे श्रमदान करण्याचे आवाहन केले. तर प्रतिनिधी मानसी शिरगावकर यानी तांदुळवाडी गडाची खडतर चढाई व गडावरील पाण्याची दुरावस्था लक्षात घेता आगामी काळात स्थानिक दुर्गिमत्रांच्या सक्र ीय सहभागातून संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार असल्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार