शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

Video - पालघरमध्ये एसटीला अपघात, 52 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 10:42 IST

वाडा येथे एसटीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

ठळक मुद्देवाडा येथे एसटीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.एसटी प्रशासनाने 1000 रूपयांची तातडीची मदत दिली आहे.

पालघर - वाडा येथे एसटीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसटी प्रशासनाने 1000 रूपयांची तातडीची मदत दिली आहे. वाडा-अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे  मंगळवारी (13 ऑगस्ट) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस शेतात जाऊन हा अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी बसमधून 52 प्रवासी प्रवास करत होते. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरितांवर वाडा येथील ग्रामीण व खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये बहुसंख्य विद्यार्थी आहेत. रामनवमी प्रसाद (50) सुमन प्रसाद (45) यांच्या हात आणि पायाला फॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे. 

वाडा आगाराची वाडा-पिवळी एम एच 14 बीटी 2331 या क्रमांकाची एसटी आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिवळीहून वाड्याकडे येत असताना हा अपघात झाला. जांभुळपाडा येथे असलेल्या गतिरोधकावर चालक काशिनाथ जाधव याने जोराचा ब्रेक लावल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून बस थेट शेतात गेली. या अपघातात 52 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर उर्वरितांवर वाडा येथील ग्रामीण व खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातpalgharपालघर