शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा रेल्वेस्थानकात सुरक्षा वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:37 IST

मुंबईपासून जवळ असलेल्या आणि पश्चिम रेल्वेचे उपनगरीय रेल्वे स्टेशन असलेले वैतरणा हे स्थानक ‘उघड्या’वर पडले

नालासोपारा : मुंबईपासून जवळ असलेल्या आणि पश्चिम रेल्वेचे उपनगरीय रेल्वे स्टेशन असलेले वैतरणा हे स्थानक ‘उघड्या’वर पडले असून येथील रेल्वे सुरक्षाही रामभरोसे आहे. या स्थानकाला उपनगरीय दर्जा असूनही आॅन ड्युटी जीआरपी किंवा आरपीएफ उपस्थित नसतात.३० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अनुसया सुरेश भांगरे (६५) ही वृद्धमहिला वैतरणा स्थानकात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी रेल्वे लाइन पार करत असताना राजधानी एक्सप्रेसने तिला धडक दिल्याने त्यात ती मरण पावली. वैतरणा स्थानकात मोठी लोकवस्ती ही पूर्वेकडे आहे शिवाय प्लॅटफॉर्म क्र .१ वर जाण्यासाठी प्रवाशांना पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्र २ वरून १ वर जाण्यासाठी सब-वेचा वापर करून नंतर पुन्हा फूट ओव्हर ब्रिज चढून साधारण २५० मीटरचे अंतर कापावे लागते. हा खटाटोप वृद्ध प्रवाशांना खूपच गैरसोयीचा आहे. त्यामुळे बहुतांशी प्रवासी हे रेल्वेलाइन क्रॉस करतात व काही वेळा अपघाताला बळी पडतात.वैतरणा वाढीव गावातील प्रवाशांना वैतरणा स्थानक गाठण्यासाठी पुलाचा वापर करून रेल्वे रुळांवरून चालत वैतरणा स्थानकात यावे लागते. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी वाढीव गावातील रमेश भगवान पाटील (४९) या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला इतके होऊन सुद्धा अशा दुर्दैवी घटनेची तातडीने दखल घेण्यासाठी वैतरणा स्थानकात जीआरपी किंवा आरपीएफ उपस्थित नव्हते. तसेच अपघात झाल्यावर जीआरपी किंवा आरपीएफ नसल्याने काही वेळा मृतदेह अनेक तास पडून राहतात व त्यामुळे अपघाती मृतांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. १२ दिवसातील या दोन दुर्दैवी घटनांनंतर तरी रेल्वे प्रशासन वैतरणा स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष देईल का असा प्रश्न डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सतिश गावड यांनी उपस्थित केला आहे. प्लॅटफॉर्म क्र ३ पर्यंत मर्यादित असलेला सबवे प्लॅटफॉर्म क्र १ पर्यंत पूर्ण करण्यासाठी रेल्वे व लोकप्रतिनिधी यांच्याकडे आम्ही केलेल्या मागणीची दखल घेऊन ती पूर्ण करावी असे ते म्हणाले.>उघड्यावर वैतरणा स्टेशनरेल्वे स्टेशनची दुर्दशा आणि प्रशासनाची डोळेझाक यामुळे प्रवाशांना होणारा त्रास मोठी डोकेदुखी बनत चालला आहे. रेल्वे दर वर्षी स्टेशनच्या देखभालासाठी, करोडो रु पयाचे बजेट पास करते तरी सुद्धा या एकमेव रेल्वे स्टेशनची अशी दुर्दर्शा का ? प्लॅटफॉर्मवर पत्रे का टाकत नाही ? 25 टक्के फलाटावर पत्रे आणि 75टक्के फलाटावर पत्रे का नाहीत ? असे अनेक प्रश्न येथील प्रवाशांना पडले आहेत. या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने तर हा दुजाभाव होत नाही ना!