शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

वैतरणा रेल्वेस्थानकात सुरक्षा वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:37 IST

मुंबईपासून जवळ असलेल्या आणि पश्चिम रेल्वेचे उपनगरीय रेल्वे स्टेशन असलेले वैतरणा हे स्थानक ‘उघड्या’वर पडले

नालासोपारा : मुंबईपासून जवळ असलेल्या आणि पश्चिम रेल्वेचे उपनगरीय रेल्वे स्टेशन असलेले वैतरणा हे स्थानक ‘उघड्या’वर पडले असून येथील रेल्वे सुरक्षाही रामभरोसे आहे. या स्थानकाला उपनगरीय दर्जा असूनही आॅन ड्युटी जीआरपी किंवा आरपीएफ उपस्थित नसतात.३० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अनुसया सुरेश भांगरे (६५) ही वृद्धमहिला वैतरणा स्थानकात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी रेल्वे लाइन पार करत असताना राजधानी एक्सप्रेसने तिला धडक दिल्याने त्यात ती मरण पावली. वैतरणा स्थानकात मोठी लोकवस्ती ही पूर्वेकडे आहे शिवाय प्लॅटफॉर्म क्र .१ वर जाण्यासाठी प्रवाशांना पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्र २ वरून १ वर जाण्यासाठी सब-वेचा वापर करून नंतर पुन्हा फूट ओव्हर ब्रिज चढून साधारण २५० मीटरचे अंतर कापावे लागते. हा खटाटोप वृद्ध प्रवाशांना खूपच गैरसोयीचा आहे. त्यामुळे बहुतांशी प्रवासी हे रेल्वेलाइन क्रॉस करतात व काही वेळा अपघाताला बळी पडतात.वैतरणा वाढीव गावातील प्रवाशांना वैतरणा स्थानक गाठण्यासाठी पुलाचा वापर करून रेल्वे रुळांवरून चालत वैतरणा स्थानकात यावे लागते. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी वाढीव गावातील रमेश भगवान पाटील (४९) या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला इतके होऊन सुद्धा अशा दुर्दैवी घटनेची तातडीने दखल घेण्यासाठी वैतरणा स्थानकात जीआरपी किंवा आरपीएफ उपस्थित नव्हते. तसेच अपघात झाल्यावर जीआरपी किंवा आरपीएफ नसल्याने काही वेळा मृतदेह अनेक तास पडून राहतात व त्यामुळे अपघाती मृतांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. १२ दिवसातील या दोन दुर्दैवी घटनांनंतर तरी रेल्वे प्रशासन वैतरणा स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष देईल का असा प्रश्न डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सतिश गावड यांनी उपस्थित केला आहे. प्लॅटफॉर्म क्र ३ पर्यंत मर्यादित असलेला सबवे प्लॅटफॉर्म क्र १ पर्यंत पूर्ण करण्यासाठी रेल्वे व लोकप्रतिनिधी यांच्याकडे आम्ही केलेल्या मागणीची दखल घेऊन ती पूर्ण करावी असे ते म्हणाले.>उघड्यावर वैतरणा स्टेशनरेल्वे स्टेशनची दुर्दशा आणि प्रशासनाची डोळेझाक यामुळे प्रवाशांना होणारा त्रास मोठी डोकेदुखी बनत चालला आहे. रेल्वे दर वर्षी स्टेशनच्या देखभालासाठी, करोडो रु पयाचे बजेट पास करते तरी सुद्धा या एकमेव रेल्वे स्टेशनची अशी दुर्दर्शा का ? प्लॅटफॉर्मवर पत्रे का टाकत नाही ? 25 टक्के फलाटावर पत्रे आणि 75टक्के फलाटावर पत्रे का नाहीत ? असे अनेक प्रश्न येथील प्रवाशांना पडले आहेत. या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने तर हा दुजाभाव होत नाही ना!