शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा रेल्वेस्थानकात सुरक्षा वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 00:37 IST

मुंबईपासून जवळ असलेल्या आणि पश्चिम रेल्वेचे उपनगरीय रेल्वे स्टेशन असलेले वैतरणा हे स्थानक ‘उघड्या’वर पडले

नालासोपारा : मुंबईपासून जवळ असलेल्या आणि पश्चिम रेल्वेचे उपनगरीय रेल्वे स्टेशन असलेले वैतरणा हे स्थानक ‘उघड्या’वर पडले असून येथील रेल्वे सुरक्षाही रामभरोसे आहे. या स्थानकाला उपनगरीय दर्जा असूनही आॅन ड्युटी जीआरपी किंवा आरपीएफ उपस्थित नसतात.३० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अनुसया सुरेश भांगरे (६५) ही वृद्धमहिला वैतरणा स्थानकात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी रेल्वे लाइन पार करत असताना राजधानी एक्सप्रेसने तिला धडक दिल्याने त्यात ती मरण पावली. वैतरणा स्थानकात मोठी लोकवस्ती ही पूर्वेकडे आहे शिवाय प्लॅटफॉर्म क्र .१ वर जाण्यासाठी प्रवाशांना पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्र २ वरून १ वर जाण्यासाठी सब-वेचा वापर करून नंतर पुन्हा फूट ओव्हर ब्रिज चढून साधारण २५० मीटरचे अंतर कापावे लागते. हा खटाटोप वृद्ध प्रवाशांना खूपच गैरसोयीचा आहे. त्यामुळे बहुतांशी प्रवासी हे रेल्वेलाइन क्रॉस करतात व काही वेळा अपघाताला बळी पडतात.वैतरणा वाढीव गावातील प्रवाशांना वैतरणा स्थानक गाठण्यासाठी पुलाचा वापर करून रेल्वे रुळांवरून चालत वैतरणा स्थानकात यावे लागते. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी वाढीव गावातील रमेश भगवान पाटील (४९) या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला इतके होऊन सुद्धा अशा दुर्दैवी घटनेची तातडीने दखल घेण्यासाठी वैतरणा स्थानकात जीआरपी किंवा आरपीएफ उपस्थित नव्हते. तसेच अपघात झाल्यावर जीआरपी किंवा आरपीएफ नसल्याने काही वेळा मृतदेह अनेक तास पडून राहतात व त्यामुळे अपघाती मृतांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. १२ दिवसातील या दोन दुर्दैवी घटनांनंतर तरी रेल्वे प्रशासन वैतरणा स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष देईल का असा प्रश्न डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सतिश गावड यांनी उपस्थित केला आहे. प्लॅटफॉर्म क्र ३ पर्यंत मर्यादित असलेला सबवे प्लॅटफॉर्म क्र १ पर्यंत पूर्ण करण्यासाठी रेल्वे व लोकप्रतिनिधी यांच्याकडे आम्ही केलेल्या मागणीची दखल घेऊन ती पूर्ण करावी असे ते म्हणाले.>उघड्यावर वैतरणा स्टेशनरेल्वे स्टेशनची दुर्दशा आणि प्रशासनाची डोळेझाक यामुळे प्रवाशांना होणारा त्रास मोठी डोकेदुखी बनत चालला आहे. रेल्वे दर वर्षी स्टेशनच्या देखभालासाठी, करोडो रु पयाचे बजेट पास करते तरी सुद्धा या एकमेव रेल्वे स्टेशनची अशी दुर्दर्शा का ? प्लॅटफॉर्मवर पत्रे का टाकत नाही ? 25 टक्के फलाटावर पत्रे आणि 75टक्के फलाटावर पत्रे का नाहीत ? असे अनेक प्रश्न येथील प्रवाशांना पडले आहेत. या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने तर हा दुजाभाव होत नाही ना!