शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

आवक वाढली : वसई-विरारमध्ये भाज्या झाल्या स्वस्त, सर्वसामान्यांच्या खिशावरील भार कमी झाल्याने दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 01:40 IST

Vasai News : वाढत्या थंडीसाेबतच विरार-वसईच्या बाजारांत भाज्यांची आवकही वाढल्याने पालेभाज्या, फळभाज्यांचे भाव उतरले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरील भार कमी झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.

 विरार : गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या भाववाढीने मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात माेठा दिलासा मिळाला आहे. वाढत्या थंडीसाेबतच विरार-वसईच्या बाजारांत भाज्यांची आवकही वाढल्याने पालेभाज्या, फळभाज्यांचे भाव उतरले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरील भार कमी झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.विरार येथे चंदनसार, मनवेल पाडा, विरार पश्चिम मलांग मैदान आणि नालासोपारा सेंट्रल पार्क येथील बाजारांत घाऊक प्रमाणात भाजीपाला येतो. वाशी आणि थेट नाशिक येथून १०० ते २०० टन भाजीपाला या बाजारात दररोज उतरवला जातो. नालासोपारा संतोष भुवन आणि वसईतही मोठ्या प्रमाणात असे बाजार लागत असून या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात भाजीपाला उतरवला जातो. काही महिने या ठिकाणी येणाऱ्या पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले हाेते. त्यामुळे आधीच काेराेनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वसामान्यांना भाजी खरेदी करताना सतत खिशाचा विचार करावा लागत हाेता. आता हिवाळ्यात भाज्यांचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात आवक वाढल्याचे भाजी व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच परिसरातील आदिवासी समाज त्यांच्या परसात उगवत असलेला भाजीपाला येथील किरकोळ बाजारांत विक्री करीत असल्याने आवक वाढली आहे. १५ दिवसांपूर्वी ६५ रुपयांपर्यंत भाव खाणाऱ्या कांद्याचा एपीएमसी मार्केटमधील भाव २० रुपये किलो इतका खाली आला आहे. 

पावसाळ्यात शेतातून भाजीपाला बाजारात येण्यात मोठ्या अडचणी येत असतात. कित्येक वेळा तर अतिवृष्टी आणि तत्सम संकटांमुळे भाजीपाल्याची नासधूस होते. साहजिकच या काळात भाज्यांचे भाव चढे असतात. त्या तुलनेत हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची लागवड केली जाते. त्यामुळे उपलब्धता व आवक वाढते. त्यामुळे सध्या बाजारात भाजीपाला स्वस्त झाला आहे.- सचिन हडकर, मालक, भाजीविक्रेता

टॅग्स :Vasai Virarवसई विरार