शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

‘लालपरी’साठी वसईकर एकवटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:04 PM

चौकसभांतून जनजागृती : एस.टी.चा मार्ग मोकळा करण्यासाठी सुरू केली चळवळ

विरार : वसईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली मात्र शहरातून हद्दपार झालेली एस.टी. आता पुन्हा शहरात धावावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी शहरातील ग्रामस्थ एकवटले असून एक चळवळ उभी केली जात आहे. या चळवळीतून वसईच्या पश्चिम पट्ट्यात चौकसभांच्या माध्यमातून जनजागृती सुरू झाली आहे.

एस.टी. म्हणजे ग्रामीण भागातील प्रवाशांचा मोठा आधार असतो. वसईकरांसाठी ही एस.टी. महत्त्वपूर्ण भूमिका बजवायची. निव्वळ प्रवासाचे साधन सोडाच वसईकरांची अर्थव्यवस्थाच या एस.टी.शी निगडित होती. कारण वसईच्या शेतात पिकणारा ताजा भाजीपाला, फुले, दूध याच एस.टी.तून शहराबाहेर विक्रीसाठी नेला जात होता. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था एस.टी.वर टिकून होती. मात्र प्रवाशांच्या हक्काची व जिव्हाळ्याची एस.टी. २०१७ साली वसई-विरारमधून तोट्याचे कारण देत हद्दपार झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले होते.

तरीही एस.टी. फेऱ्या बंदच्या विरोधात वसईतील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलन केली होती, मात्र याचा काहीही एक फायदा झाला नाही.दरम्यान, जशी एस.टी. सेवा बंद झाली तशी वसई विरार महापालिकेने २०१२ साली ठेकेदार स्वरूपात परिवहन सेवा सुरू केली. मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे परिवहन सेवेविरोधात अनेक तक्र ारी पुढे येऊ लागल्या. यामध्ये निकृष्ट दर्जाच्या बस, प्रदूषणकारी धूर ओकणाºया बसेस, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासीवाहतूक, शासनाला न भरलेला प्रवासी कर आणि बालपोषण अधिभार, वाहनतळ नसल्याने होणारी प्रवाशांची गैरसोय, परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार, सततचा संप अशा अनेक समस्या पुढे येत होत्या. त्यातच २०२० वर्ष उजाडल्यावर या समस्या वाढतच गेल्या.परिवहन कर्मचाºयांचा पगार वेळेवर न झाल्याने व इतर विविध मांगण्यासाठी या कर्मचाºयांनी गेल्या दोन महिन्यात दोनदा परिवहन सेवा बंद पाडली होती. त्यामुळे ११ दिवस परिवहन सेवा बंद होती. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना व नोकरदार वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागला. त्यातच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची ही मोठी गैरसोय झाली होती. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे सुद्धा अतोनात हाल झाले होते.परिवहन कर्मचाºयांच्या आंदोलनांमुळे प्रवासी वैतागलेच्सततच्या होणाºया या आंदोलन व परिवहन समस्यांमुळे विविध वर्गातील प्रवासी या सेवेला वैतागले आहेत. त्यामुळे वसईतून हद्दपार झालेली एस.टी. पुन्हा सुरू व्हावी, यासाठी वसईतील आम्ही गासकर संघटना तसेच वसईतील अनेक सामाजिक संघटना यांनी मिळून एक चळवळ सुरु केली आहे.च्यामध्ये चौकसभा घेऊन ग्रामस्थांना आवाहन करीत सर्वांनी आपल्या वैयक्तिक ई-मेल आयडीवरून परिवहनच्या विविध समस्या आणि एस.टी.ची मागणी हे आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे परिवहन मंत्री, परिवहन सचिव, जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे मांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाची शहर बस-सेवा पुन्हा चालू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.च्पालिकेची परिवहन सेवा ठेकेदाराच्या मनमानीनुसार चालत आहे. दोन महिन्यात तीन वेळा ही परिवहन सेवा बंद पडली. तसेच परिवहन सेवा सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असताना पालिकेने त्याकडे लक्ष देण्याऐवजी महोत्सवी कार्यक्रमाकडे जास्त लक्ष दिले जात असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांनी केली.परिवहन संपामुळे आमच्या गावातील चाकरमानी व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे परिवहन सेवा जर अशीच बंद होत राहिली तर प्रवास कसा करावा? त्यासाठी आम्हाला पुन्हा वसईत एस.टी. हवी आहे. म्हणून आम्ही ही चळवळ सुरू केली असून नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे.- जॉय फरगोस, आम्ही गासकर संघटना 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार