शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

हक्काच्या पाण्यासाठी वसईत समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:52 IST

६९ गावांची पाण्याची योजना : लवकरात लवकर सुरु करा ....घोषणा दुमदुमली

वसई : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वसईतील पर्यावरण संवर्धन समिती वसई- विरार तर्फे 69 गावांची प्रलंबित राहिलेली पाण्याची योजना लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी वसई पश्चिमेतील निर्मळ येथे पाणी योजनेतील त्या रिकाम्या जलकुंभा समोर शेकडो कार्यकर्त्यानी बुधवारी सकाळपासुन धरणे आंदोलन केले.

निर्मळ गावात उभ्या असलेल्या या रिकाम्या जलकुंभात जोपर्यंत पश्चिम पट्टीतील 69 गावातील नागरिकांना पाणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरूच राहण्याच्या घोषणेने येथील परिसर दुमदुमुन गेला. या प्रसंगी प्रसिध्द पथनाट्यकार व जेष्ठ रंगकर्मी झुराण लोपीस व त्यांचे सहकारी डायगो लोपीस व मॅक्सवेल रोझ यांनी या धरणे आंदोलना स्थळी या आंदोलनपर गीतांच्या द्वारे उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.

यावेळी प्रशासनाला ठासून सांगताना वर्तक यांनी वसई विरार महापालिकेला त्यांच्या अधिकार व कर्त्यव्याची आठवण करून देत स्पष्ट केले की, सध्या स्थितीत 69 गावे वसई विरार महापालिकेत येत असून मा. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यातील महापालिकाना स्पष्ट निर्देश आहेत कि प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे बंधनकारक आहे,असे असताना हि मागील अनेक वर्षे झाली हि योजना कार्यांवित असून देखील महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याबाबत उदासीनता दाखवली आहे,याचा जाब विचारण्यासाठी वेळ पडली तर आम्ही गावकरी आमरण उपोषण ही करू असे ही यावेळी आंदोलनकर्ते ग्रामस्थ व वर्तक यांनी स्पष्ट केले.

किंबहुना दि.31 मार्च 2019 पर्यंत हि योजना पूर्ण होऊन पाणी मिळणार असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत यापूर्वी लेखी आश्वासन वर्तक यांनी दिले होते मात्र रिकाम्या जलकुंभ व्यतिरिक्त याठिकाणी ना महापालिका पुढे सरसावली ना जीवन प्राधिकरण योजना पुढे सरकली केवळ आतापर्यंत गावकर्यांना लटकवत ठेवण्यात आले.आणि म्हणूनच पुन्हा प्रशासनाला आठवण करून देण्यासाठी पर्यावरण दिनी असे आंदोलन छेडावे लागले असल्याची खंत ग्रामस्थांनी बोलून दाखवली,

या आंदोलना वेळी पर्यावरण संवर्धन समतिीचे समन्वयक व आंदोलनकर्ते समीर वर्तक, शशी सोनावणे, जण आंदोलनाच्या नेत्या कु.डॉमिनिका डाबरे, वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे व माजी उपसरपंच सुनील डाबरे, आदिवासी एकता परिषदेचे वसई तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे, मनसेचे प्रफुल्ल ठाकूर ,तसेच प्रामुख्याने भुईगाव, वाघोली, निर्मळ, गास परिसरातील आण िसंपूर्ण वसईतून अनेक जेष्ठ व तरु ण कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले.

आंदोलनकर्त्यांची बोळवणपर्यावरण दिनी वसईच्या पश्चिम पट्टीतील ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धन समतिीच्या माध्यमाने निर्मळ येथील रिकाम्या जलकुंभा च्या ठिकाणी केलेल्या धरणे आंदोलनाची गंभीर दखल घेत आश्चर्य म्हणजे वसई विरार मनपाचे शहर अभियंता माधव जवादे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांना या आंदोलनाची दखल व निवेदन घेण्याचे लेखी पत्र च धाडले असल्याने एकप्रकारे आपली जबाबदारी झटकली आहे.

टॅग्स :Waterपाणी