शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

वसईत पावसाचा जोर कायम, विरारमधील विवा कॉलेजमध्ये पाणी घुसले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 23:38 IST

वसई-विरार मध्ये शुक्र वार मध्य रात्री पासून कोसळणार्या मुसळधार पावसाचा धुडगूस अजूनही तिसर्या दिवशी ही कायम राहिला असल्याने वसई विरार मध्ये ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे.

वसई : वसई-विरार मध्ये शुक्र वार मध्य रात्री पासून कोसळणार्या मुसळधार पावसाचा धुडगूस अजूनही तिसर्या दिवशी ही कायम राहिला असल्याने वसई विरार मध्ये ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे. दरम्यान ही तर मागील वर्षी ची पुनरावृत्ती म्हणत यावेळी सुध्दा वसईकर नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. सतत तीन ते चार दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे वसई संपूर्ण जलमय झाली आहे, यामध्ये वसई बस आगाराचे तळे झाले असून वसंत नगरी, पार्वती क्र ॉस,अंबाडी रोड,आनंदनगर ,माणकिपूर, चुळणे सनिसटी गास गावसाहित विरार, नालासोपारा अणि वसई पूर्वेस सर्वत्र पाणी साचल्याने रहिवासी व औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या चाकरमान्यांचे पुरते हाल झाले आहेत. त्यातच कुठे पडझड तर वसई- विरार मध्ये या चार दिवसांत एकूण 20 झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पालिका, पोलीस व महसूल विभागाच्या वतीने सर्वत्र पाणी काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वसई-विरार मध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत एकूण ९१७ मिमी पावसाची नोंद झाल्याचे तहसील विभागाने सांगितले. पावसाच्या पाण्यामुळे वसई-विरार मधील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. अनेक इमारतीच्या आवारामध्ये पाणी साचले आहे. वसई पूर्वेला मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी विजे अभावी सलग चार दिवस टप्प्याटप्प्याने वसाहत बंद ठेवण्यात आली आहे. त्यानुसार दुसºया टप्प्यातील कंपन्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र मंगळवारी तर राज्य सरकारने शाळा ,कॉलेज आणि शासकीय निमशासकीय आदींना सार्वजनिक सुट्टी च जाहीर केली त्यामुळे बर्यापैकी जनता बाहेर दिसली नाही. पालघर,ठाणे जिल्ह्यातून वसईत या ठिकाणी चाकरमानी ये-जा करत असतात. सोमवारी -मंगळवारी सकाळी वालीव, गोखिवरे, सातिवली येथे पावसाचे पाणी साचल्याने तुरळक खासगी वाहने रस्त्यावर दिसून आली. मात्र रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने चारही बाजूला पाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे चाकरमानी वर्गाला वसई पूर्व स्थानक परिसर सार्वजनिक वाहनांची बºयाच वेळ प्रतीक्षा करत पावसात उभे राहावे लागले. त्यामुळे रांगच्या रांग लागली असल्याचे दिसून आले. वसई स्थानक परिसरातील बस आगारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. याच पाण्यातून प्रवाशांना वाट काढावी लागली. बाहेरून आलेल्या प्रवाशांची यावेळी अक्षरश: ससेहोलपट झाली.विरार मधील विवा कॉलेज मध्ये ही पाणी घुसले !सतत कोसळणाºया पावसामुळे विरार चे विवा कॉलेज व उड्डाणपुलाजवळ ही मोठया प्रमाणात पाणी साचले असल्याचे चित्र स्पष्ट होते,यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना गैरसोय निर्माण झाली. बोळींज येथील जिल्हा परिषद शाळेसमोर दरवर्षी पाणी साचते. यंदाही या शाळेसमोर पाणी साचल्याने दिसून आले. विजय नगर, आचोळे, अग्रवाल नगर, तुळींज रोड, संतोष भुवन या ठिकाणीदेखील पाणी रस्त्यावर साचले आहे. तर, दुसरीकडे वसई-विरार पालिका हद्दीत चार दिवसांत एकूण २० झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे अिग्नशमन विभागाचे अधिकारी दिलीप पालव यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार