शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

वसईत पावसाचा जोर कायम, विरारमधील विवा कॉलेजमध्ये पाणी घुसले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 23:38 IST

वसई-विरार मध्ये शुक्र वार मध्य रात्री पासून कोसळणार्या मुसळधार पावसाचा धुडगूस अजूनही तिसर्या दिवशी ही कायम राहिला असल्याने वसई विरार मध्ये ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे.

वसई : वसई-विरार मध्ये शुक्र वार मध्य रात्री पासून कोसळणार्या मुसळधार पावसाचा धुडगूस अजूनही तिसर्या दिवशी ही कायम राहिला असल्याने वसई विरार मध्ये ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे. दरम्यान ही तर मागील वर्षी ची पुनरावृत्ती म्हणत यावेळी सुध्दा वसईकर नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. सतत तीन ते चार दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे वसई संपूर्ण जलमय झाली आहे, यामध्ये वसई बस आगाराचे तळे झाले असून वसंत नगरी, पार्वती क्र ॉस,अंबाडी रोड,आनंदनगर ,माणकिपूर, चुळणे सनिसटी गास गावसाहित विरार, नालासोपारा अणि वसई पूर्वेस सर्वत्र पाणी साचल्याने रहिवासी व औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या चाकरमान्यांचे पुरते हाल झाले आहेत. त्यातच कुठे पडझड तर वसई- विरार मध्ये या चार दिवसांत एकूण 20 झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पालिका, पोलीस व महसूल विभागाच्या वतीने सर्वत्र पाणी काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वसई-विरार मध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत एकूण ९१७ मिमी पावसाची नोंद झाल्याचे तहसील विभागाने सांगितले. पावसाच्या पाण्यामुळे वसई-विरार मधील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. अनेक इमारतीच्या आवारामध्ये पाणी साचले आहे. वसई पूर्वेला मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी विजे अभावी सलग चार दिवस टप्प्याटप्प्याने वसाहत बंद ठेवण्यात आली आहे. त्यानुसार दुसºया टप्प्यातील कंपन्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र मंगळवारी तर राज्य सरकारने शाळा ,कॉलेज आणि शासकीय निमशासकीय आदींना सार्वजनिक सुट्टी च जाहीर केली त्यामुळे बर्यापैकी जनता बाहेर दिसली नाही. पालघर,ठाणे जिल्ह्यातून वसईत या ठिकाणी चाकरमानी ये-जा करत असतात. सोमवारी -मंगळवारी सकाळी वालीव, गोखिवरे, सातिवली येथे पावसाचे पाणी साचल्याने तुरळक खासगी वाहने रस्त्यावर दिसून आली. मात्र रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने चारही बाजूला पाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे चाकरमानी वर्गाला वसई पूर्व स्थानक परिसर सार्वजनिक वाहनांची बºयाच वेळ प्रतीक्षा करत पावसात उभे राहावे लागले. त्यामुळे रांगच्या रांग लागली असल्याचे दिसून आले. वसई स्थानक परिसरातील बस आगारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. याच पाण्यातून प्रवाशांना वाट काढावी लागली. बाहेरून आलेल्या प्रवाशांची यावेळी अक्षरश: ससेहोलपट झाली.विरार मधील विवा कॉलेज मध्ये ही पाणी घुसले !सतत कोसळणाºया पावसामुळे विरार चे विवा कॉलेज व उड्डाणपुलाजवळ ही मोठया प्रमाणात पाणी साचले असल्याचे चित्र स्पष्ट होते,यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना गैरसोय निर्माण झाली. बोळींज येथील जिल्हा परिषद शाळेसमोर दरवर्षी पाणी साचते. यंदाही या शाळेसमोर पाणी साचल्याने दिसून आले. विजय नगर, आचोळे, अग्रवाल नगर, तुळींज रोड, संतोष भुवन या ठिकाणीदेखील पाणी रस्त्यावर साचले आहे. तर, दुसरीकडे वसई-विरार पालिका हद्दीत चार दिवसांत एकूण २० झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे अिग्नशमन विभागाचे अधिकारी दिलीप पालव यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार