शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

वसईत खताची टंचाई, शेतकरी त्रस्त, कृषीखाते सुस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 00:34 IST

वसई तालुक्याच्या पूर्व भागातील भात शेतीच्या पेरण्याची रोपे वीतभर वाढली असून त्यांना पहिली मात्रा लागणा-या खतांमधील युरिया कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध नसल्याने शेतक-यांमध्ये रोष पसरला आहे.

पारोळ : वसईत खत टंचाई निर्माण झाली असून पडणाऱ्या पावसात भातरोपांची वाढ होण्यासाठी खताची मात्रा देणे आवश्यक असते. पण खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून खत लवकर उपलब्ध व्हावे, अशी मागणी त्यांनी कृषी विभागाकडे केली आहे.वसई तालुक्याच्या पूर्व भागातील भात शेतीच्या पेरण्याची रोपे वीतभर वाढली असून त्यांना पहिली मात्रा लागणा-या खतांमधील युरिया कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध नसल्याने शेतक-यांमध्ये रोष पसरला आहे. एक तर पाऊस उशिरा सुरु झाला. त्यात कशाबशा पेरण्या आटोपल्या. त्यांची रोपे आता शेतात डोलू लागली असून काही ठिकाणी वीतभर वाढ झालेली आहे. अशावेळी रोपांना वाढीसाठी अत्यंत आवश्यक असणारे युरिया हे खत योग्य वेळी दिले गेले नाही तर पुढील येणाºया भात पिकावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, असे शेतकरी सांगत आहेत . मागील गुरूवारपासून बरसणाºया वरूणराजाने काहीशी उसंत घेतल्याने. दिवसभर मिळालेल्या पावसाच्या उघडीपीमुळे जोरदार पावसामुळे खोळंबून राहिलेली शेतीची कामे करण्याची लगबग शेतकºयांमध्ये दिसून येत आहे. या कामाचाच एक भाग म्हणजे वाढ होत असलेल्या रोपांना अधिक सक्षम करण्यासाठी युरियाची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी लागते. मात्र नेमक्यावेळी युरिया मिळत नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत कृषी सेवा केंद्र चालकांनी सांगितल की, आम्ही मिळणाºया खतासाठी शुल्क केव्हाच भरले असून अजूनही फर्टिलायझरकडून आम्हाला पुरवठा करण्यात आलेला नाही. तर तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही .

टॅग्स :Vasai Virarवसई विरार