शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

वसईत टँकर लॉबीला सुगीचे दिवस

By admin | Updated: March 23, 2016 01:58 IST

सततच्या पाणी टंचाईमुळे आता टँकर लॉबीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुुरु झाल्यानंतर वसईतून टँकर हद्दपार झाले होते.

शशी करपे, वसईसततच्या पाणी टंचाईमुळे आता टँकर लॉबीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुुरु झाल्यानंतर वसईतून टँकर हद्दपार झाले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून टँकर पुन्हा धावू लागले आहेत. याघडीला तालुक्यात टँकरची संख्या साडेसहाशेच्या घरात पोचली आहे. सध्या दहा हजार लिटरचा एकेक टँकर दिवसाला किमान चार फेऱ्या मारतात. किमान ५० हजारांहून अधिक कुटुंबे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. एकेकाळी टँकरमुळे वसईत दरवर्षी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा. सूर्या पाणी पुरवठा योजनेने टँकरला हद्दपार केले होते. पण, लोकसंख्या वाढल्यामुळे टँकर पुन्हा धावू लागले आहेत. तालु्नयात साडेसहाशेहून अधिक टँकर असून सध्या पाण्याची गरज असल्याने दहा हजार लिटरचा एकेक टँकर दिवसाला चार फेरा मारतो. सर्वाधिक ३५० च्या आसपास टँकर एकट्या नालासोपारा परिसरात धावतात, असे नालासोपारा टँकर असोसिएशनचे म्हणणे आहे. पूर्वी टँकर पश्चिम पट्ट्यातून पाणी उपसा करीत असत. बेसुमार उपशामुळे पाण्याची पातळी खाली गेल्याने तिथून टँकरला बंदी घालण्यात आली. आता धानीव, गोखीवरे, वालीव, पेल्हार, पारोळ, पेल्हार, उसगाव, उसगाव नदी, तानसा नदी, शिवनसई, खानिवडे, चंदनसार, भाटपाडा, विरार पूर्वेकडील फुलपाडा याभागातील विहीर आणि बोअरवेलमधून टँकर पाणी भरतात. खाजगी विहीर आणि बोअरवेल मालक पैशासाठी बेसुमार पाणी उपसा करु लागल्याने याभागातील पाण्याची पातळी खालावली असून गावकरी चिंतेत सापडले आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून वसईचे तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी टंँकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पाणी दूषित तरी दर मात्र वाढतेचटँकर लॉबी पैसा कमावण्याच्या उद्देशाने मिळेल तिथून पाणी भरून आणून शहरात विकतात. या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याने दूषित पाणी पिण्याशिवाय लोकांना पर्याय नसते. एरव्ही पावसाळा ते फेब्रुवारीपर्यंत टँकरचे दर ९०० ते १२०० रुपये असतात. आता टँकरचे दर वाढू लागले असून सध्या किमान १५०० रुपये आकारले जात आहे. जसजशी पाणी टंचाईची झळ वाढायला सुरुवात होईल तसतसा टँकरचा दर दोन हजार रुपयांच्या घरात पोचलेला असेल.अनेक टँकर जुनाट, गळके, अनफिट आरटीओ कार्यालयामध्ये सुमारे २२५ टँकरची नोंद आहे. काही टँकरची नोंद ठाणे येथे झाल्याचे गृहीत धरले तरी किमान तीनशे टँकर बेकायदेशिर धंदा करीत आहेत. मुंबईत आठ वर्षांपेक्षा जुने झालेले ट्रक वापरण्यास बंदी आहे. याच ट्रकमध्ये फेरबदल करून त्याचे टँकरमध्ये बेकायदेशिरपणे रुपांतर करून वसईत त्याचा वापर केला जातो. अनेक टँकर जुनाट, गळके, फिटनेस नसलेले आहेत. याची माहिती आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना आहे. पण, रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने चालवून दर महिन्याला दोन-तीन अपघात करणाऱ्या, वर्षाला किमान दोन-तीन लोकांचा जीव घेणाऱ्या टँकरविरोधात आरटीओ अथवा पोलीस कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.