शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

वसईत टँकर लॉबीला सुगीचे दिवस

By admin | Updated: March 23, 2016 01:58 IST

सततच्या पाणी टंचाईमुळे आता टँकर लॉबीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुुरु झाल्यानंतर वसईतून टँकर हद्दपार झाले होते.

शशी करपे, वसईसततच्या पाणी टंचाईमुळे आता टँकर लॉबीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुुरु झाल्यानंतर वसईतून टँकर हद्दपार झाले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून टँकर पुन्हा धावू लागले आहेत. याघडीला तालुक्यात टँकरची संख्या साडेसहाशेच्या घरात पोचली आहे. सध्या दहा हजार लिटरचा एकेक टँकर दिवसाला किमान चार फेऱ्या मारतात. किमान ५० हजारांहून अधिक कुटुंबे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. एकेकाळी टँकरमुळे वसईत दरवर्षी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा. सूर्या पाणी पुरवठा योजनेने टँकरला हद्दपार केले होते. पण, लोकसंख्या वाढल्यामुळे टँकर पुन्हा धावू लागले आहेत. तालु्नयात साडेसहाशेहून अधिक टँकर असून सध्या पाण्याची गरज असल्याने दहा हजार लिटरचा एकेक टँकर दिवसाला चार फेरा मारतो. सर्वाधिक ३५० च्या आसपास टँकर एकट्या नालासोपारा परिसरात धावतात, असे नालासोपारा टँकर असोसिएशनचे म्हणणे आहे. पूर्वी टँकर पश्चिम पट्ट्यातून पाणी उपसा करीत असत. बेसुमार उपशामुळे पाण्याची पातळी खाली गेल्याने तिथून टँकरला बंदी घालण्यात आली. आता धानीव, गोखीवरे, वालीव, पेल्हार, पारोळ, पेल्हार, उसगाव, उसगाव नदी, तानसा नदी, शिवनसई, खानिवडे, चंदनसार, भाटपाडा, विरार पूर्वेकडील फुलपाडा याभागातील विहीर आणि बोअरवेलमधून टँकर पाणी भरतात. खाजगी विहीर आणि बोअरवेल मालक पैशासाठी बेसुमार पाणी उपसा करु लागल्याने याभागातील पाण्याची पातळी खालावली असून गावकरी चिंतेत सापडले आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून वसईचे तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांनी टंँकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पाणी दूषित तरी दर मात्र वाढतेचटँकर लॉबी पैसा कमावण्याच्या उद्देशाने मिळेल तिथून पाणी भरून आणून शहरात विकतात. या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याने दूषित पाणी पिण्याशिवाय लोकांना पर्याय नसते. एरव्ही पावसाळा ते फेब्रुवारीपर्यंत टँकरचे दर ९०० ते १२०० रुपये असतात. आता टँकरचे दर वाढू लागले असून सध्या किमान १५०० रुपये आकारले जात आहे. जसजशी पाणी टंचाईची झळ वाढायला सुरुवात होईल तसतसा टँकरचा दर दोन हजार रुपयांच्या घरात पोचलेला असेल.अनेक टँकर जुनाट, गळके, अनफिट आरटीओ कार्यालयामध्ये सुमारे २२५ टँकरची नोंद आहे. काही टँकरची नोंद ठाणे येथे झाल्याचे गृहीत धरले तरी किमान तीनशे टँकर बेकायदेशिर धंदा करीत आहेत. मुंबईत आठ वर्षांपेक्षा जुने झालेले ट्रक वापरण्यास बंदी आहे. याच ट्रकमध्ये फेरबदल करून त्याचे टँकरमध्ये बेकायदेशिरपणे रुपांतर करून वसईत त्याचा वापर केला जातो. अनेक टँकर जुनाट, गळके, फिटनेस नसलेले आहेत. याची माहिती आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना आहे. पण, रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने चालवून दर महिन्याला दोन-तीन अपघात करणाऱ्या, वर्षाला किमान दोन-तीन लोकांचा जीव घेणाऱ्या टँकरविरोधात आरटीओ अथवा पोलीस कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.