शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

वसईत बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा; शुद्धतेचे निकष पायदळी, प्रशासन गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 02:54 IST

पाणी हे जीवन असतांना वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा धंदा जोरात सुरु असून तालुक्यातील अनेक पाणी शुध्दीकरण प्रकल्पातून फार्मासिस्ट, मायक्रोेबायोलॉजिकल तपासणी प्रयोगशाळा गायब असल्याने या पाण्याच्या शुद्धतेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

- सुनिल घरतपारोळ : पाणी हे जीवन असतांना वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा धंदा जोरात सुरु असून तालुक्यातील अनेक पाणी शुध्दीकरण प्रकल्पातून फार्मासिस्ट, मायक्रोेबायोलॉजिकल तपासणी प्रयोगशाळा गायब असल्याने या पाण्याच्या शुद्धतेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.वसई तालुक्यात कामण, सातिवली, धानीव, पेल्हार, वसई फाटा, बावखळ, विरारफाटा, शिरसाड अशा अनेक भागात बाटली बंद पाण्याचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात पाण्याची शुध्दता तपासण्याचे यंत्रच नाहीत. शुध्दतेसाठी पाण्यावर १४ प्रक्रीया व २२ प्रकारच्या चाचण्या करण्याचा नियम या प्रकल्पात पायदळी तुडवला जात आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभाग उदासीन असल्याने वसईमध्ये बाटली बंद धंद्याला चांगलाच जोर चढला आहे.अशुद्ध पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी डीसल आॅक्सीजन, हार्डनेस पी एच, ओड्यूर कलर, जिवाणूची स्थिती, पाण्यातील जडपणा आदी प्रकारच्या चाचण्या पाणी शुद्ध करण्यासाठी गरजेचे असते. तसेच, या प्रकल्पात प्रयोगशाळा हाताळणारा फार्मासिस्ट असणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे पाण्यातील क्षार, विषाणू, क्लोराइडस घातक द्रव्य बाजूला काढण्याचे निकष अत्यंत कडक आहेत. मात्र हे नियम पाळले जात असल्याचे दिसून येत आहे.अशा प्रकारे हा गोरखधंदा करतांना ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी बाटलीचे पॅकिंग चांगल्या दर्जाचे केले जाते. ग्राहक ही पाण्याची शुद्धता न तपासता चांगला दर देऊन ते विकत घेतात.काही ठिकाणी तर बोअरवेल व नळाचे पाणी देखील बाटल्यांमध्ये भरून विकण्यात येत आहे. शुद्धतेच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा गोरखधंदा सुरु आहे.बक्कळ पैसे घेऊन अशुद्ध पाणी ग्राहकांना विकणे हा गुन्हाच आहे. वास्तविक पाणी प्रकल्पामध्ये पाच रुपयात मिळणारे एक लिटर पाणी बाजारात २० रुपयांना विकले जाते ही फसवणूक आहे. एफडीएकडून पाण्याची शुद्धता व किंमत यावर नियंत्रण असायला हवे.- राम पाटील, ग्राहक संरक्षण परिषद, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार