शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

वसईत बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा; शुद्धतेचे निकष पायदळी, प्रशासन गप्प का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 02:54 IST

पाणी हे जीवन असतांना वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा धंदा जोरात सुरु असून तालुक्यातील अनेक पाणी शुध्दीकरण प्रकल्पातून फार्मासिस्ट, मायक्रोेबायोलॉजिकल तपासणी प्रयोगशाळा गायब असल्याने या पाण्याच्या शुद्धतेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

- सुनिल घरतपारोळ : पाणी हे जीवन असतांना वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा धंदा जोरात सुरु असून तालुक्यातील अनेक पाणी शुध्दीकरण प्रकल्पातून फार्मासिस्ट, मायक्रोेबायोलॉजिकल तपासणी प्रयोगशाळा गायब असल्याने या पाण्याच्या शुद्धतेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.वसई तालुक्यात कामण, सातिवली, धानीव, पेल्हार, वसई फाटा, बावखळ, विरारफाटा, शिरसाड अशा अनेक भागात बाटली बंद पाण्याचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात पाण्याची शुध्दता तपासण्याचे यंत्रच नाहीत. शुध्दतेसाठी पाण्यावर १४ प्रक्रीया व २२ प्रकारच्या चाचण्या करण्याचा नियम या प्रकल्पात पायदळी तुडवला जात आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभाग उदासीन असल्याने वसईमध्ये बाटली बंद धंद्याला चांगलाच जोर चढला आहे.अशुद्ध पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी डीसल आॅक्सीजन, हार्डनेस पी एच, ओड्यूर कलर, जिवाणूची स्थिती, पाण्यातील जडपणा आदी प्रकारच्या चाचण्या पाणी शुद्ध करण्यासाठी गरजेचे असते. तसेच, या प्रकल्पात प्रयोगशाळा हाताळणारा फार्मासिस्ट असणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे पाण्यातील क्षार, विषाणू, क्लोराइडस घातक द्रव्य बाजूला काढण्याचे निकष अत्यंत कडक आहेत. मात्र हे नियम पाळले जात असल्याचे दिसून येत आहे.अशा प्रकारे हा गोरखधंदा करतांना ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी बाटलीचे पॅकिंग चांगल्या दर्जाचे केले जाते. ग्राहक ही पाण्याची शुद्धता न तपासता चांगला दर देऊन ते विकत घेतात.काही ठिकाणी तर बोअरवेल व नळाचे पाणी देखील बाटल्यांमध्ये भरून विकण्यात येत आहे. शुद्धतेच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा गोरखधंदा सुरु आहे.बक्कळ पैसे घेऊन अशुद्ध पाणी ग्राहकांना विकणे हा गुन्हाच आहे. वास्तविक पाणी प्रकल्पामध्ये पाच रुपयात मिळणारे एक लिटर पाणी बाजारात २० रुपयांना विकले जाते ही फसवणूक आहे. एफडीएकडून पाण्याची शुद्धता व किंमत यावर नियंत्रण असायला हवे.- राम पाटील, ग्राहक संरक्षण परिषद, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार