शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

१३ कोटी खर्चूनही वसईत दूषित पाणी

By admin | Updated: April 15, 2017 03:09 IST

पाणी पुरवठा व्यवस्थेवर दरवर्षी तब्बल तेरी कोटीहून अधिक रुपये खर्च केले जातात. तरीही वसईकरांना एक दिवस आड अपुरे आणि अनियमित पाणी मिळते. त्याचबरोबर दुषित

वसई : पाणी पुरवठा व्यवस्थेवर दरवर्षी तब्बल तेरी कोटीहून अधिक रुपये खर्च केले जातात. तरीही वसईकरांना एक दिवस आड अपुरे आणि अनियमित पाणी मिळते. त्याचबरोबर दुषित पाणीही पुरवले जाते. त्यामुळे ठेकेदारांना काळ््या यादीत टाकून महापालिकेची लूट थांबवावी अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. वसई विरार शहराला सूर्या योजनेतून १०० एमएलडी, उसगाव योजनेतून २० एमएलडी, पेल्हार धरणातून १० एमएलडी आणि पापडखिंड धरणातून एक एमएलडी पाणी मिळून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा वितरण, देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाकरता दरसाल ६ कोटी ७८ लाख ४० हजार ४०० रुपये खर्च केला जातो. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजनांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपये, जलशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी रसायने यासाठी १ कोटी २२ लाक ८० हजार ८०० रुपये, क्लोरीन, गॅस टनर आणि अ‍ॅलम पुरवठा कामी ५५ लाख ५९ हजार ६०० रुपये खर्च केला जातो. त्याचबरोबर विभागीय पाणी पुरवठा व्यवस्थापनेवरही लाखो रुपये खर्च केले जातात. हा सर्व खर्च दरवर्षी १३ कोटीहून अधिक होतो. असे असतानाही महापालिकेकडून रहिवाशांना एक दिव आड तोही अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असतो. इतकेच नाही तर अनेक भागात दुषित पाणी पुरवठा होतो, असा चेंदवणकर यांनी आरोप केला आहे. याशिवाय दरमहा जलवाह्न्यिा फुटत आहेत. वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत असतो. त्यामुळे वर्षाला किमान वीस ते तीस दिवस पाणी पुरवठा खंडीत होत असतो. पण, दुरुस्तीच्या नावाखाली जनतेचे करापोटी जमा झालेले कोट्यवधी रुपये ठेकेदारांना दिले जात आहेत. (प्रतिनिधी)