शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

वसईत येते १० दिवस तीव्र वाहतूककोंडीचे, मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 00:40 IST

वसई विरार शहर मनपाच्या एच प्रभाग समिती अंतर्गत माणिकपूर नाका ते पार्वती क्र ॉस या मुख्य रस्त्यावर आज गुरुवार दि.९ मे पासून मुख्य जलवाहिनी बदलण्याच्या कामास प्रारंभ होत आहे.

वसई - वसई विरार शहर मनपाच्या एच प्रभाग समिती अंतर्गत माणिकपूर नाका ते पार्वती क्र ॉस या मुख्य रस्त्यावर आज गुरुवार दि.९ मे पासून मुख्य जलवाहिनी बदलण्याच्या कामास प्रारंभ होत असून महापालिकेतर्फे या भागातील जुनी व जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी बदलून त्याऐवजी ६५० मिलि मीटर व्यासाची लोखंडी मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.जलवाहिनी टाकण्याच्या काळात याठिकाणी नागरिकांना मात्र सकाळ -संध्याकाळ मोठ्या वाहतूककोंडीला सामोरं जावे लागणार हे हि तितकंच सत्य आहे.दररोज येथील प्रचंड वाहतूक कोंडी त्यात स्टेशन ते माणिकपूर भागात मुख्य रस्त्यावर उभी असलेली बेकायदा दुचाकी व चारचाकी वाहने त्यामुळे वाहचालक व प्रवासी आधीच मेटाकुटीस आलेला आहे.परंतु विकासाची कामे पूर्ण होणे हे हि तितकेच गरजेचे असून त्यासाठी नागरिक सहकार्य हि करायला तयार आहेत मात्र त्यासाठी पालिका आयुक्त,वाहतूक शाखा व पोलीस यंत्रणा यांनी संयुक्तरित्या त्यांचा एक्शन प्लॅन शहरातील नागरिकांसमोर योग्य पद्धतीने त्रास न होता व गैरसमज न पसरता समोर ठेवणे अपेक्षित आहे. किंबहुना सकाळी नोकरी धंदयासाठी जाणाऱ्या शहरवासीयांची मोठी कोंडी होणार नाही. या संदर्भात महापालिकेच्या एच प्रभागाचे सहा.आयुक्त गिलसंन घोन्साल्वीस व उपअभियंता आर के पाटील यांनी नागरिकांनी जसा जमेल तसा भुईगाव गास या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करणारे फलक लावले आहेत. मात्र दरम्यानच्या काळात या वाहतूककोंडीचे नियोजन कसे होणार? याचे कुठलीही पूर्वकल्पना जनतेला न देता तडकाफडकी काम सुरु करू नका असे पालिकेला सांगतो असे वाहतूक शाखा निरीक्षक संपत पाटील यांनी सांगितले.मुळातच हे काम सुरु होत असल्याने पापडी ,भाबोला, स्टेला व मेरीविला- माणिकपूरवासियांचा अजिबात विचार झालेला नाही. त्यांना मात्र या कोंडीतून मार्ग काढीत व आपल्या नियोजित वेळेच्या तासभर आधीच घरातून लोकंल पकडण्यासाठी निघावे लागणार आहे. या सर्व प्रश्नी वाहतूक कोंडी व नागरिकांचा पर्यायी रस्ता आणि भाबोलावासियांची कैफियत ऐकल्यावर पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले की आता वसई स्टेशन ते माणिकपूर पर्यंतची बेकायदा पार्किंग हटवली जाऊन हे खोदकाम व जलवाहिनी टाकण्याचे काम रात्रीच केले जाईल असं आयुक्त बळीराम पवार यांनी लोकमतला सांगितले.काम कुठून कुठपर्यंत ?माणिकपूर येथील हनुमान मंदिरापासून या कामाला सुरु वात करून माणिकपूर पार्वती क्र ॉस येथे काम संपवले जाणार आहे.या मुख्य कामासाठी पालिकेला साधारण दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असून साधारण १९ मे पर्यंत हि मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू राहणार आहे.मुख्य जलवाहिनी कामासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याचे खोदकाम करण्यात येणार असल्याने वाहतूककोंडी होणे स्वाभाविक असून त्यामुळे जनतेची गैरसोय तर होणार आहे, या पार्श्वभूमीवर जनतेने मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असणाºया कालावधीत वेळेआधी व मिळेल त्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा असेही आवाहन महापालिकेने केले आहे.आपण वाहतूक शाखा व महापालिकेचा अतिक्र मण विभाग यांना निर्देश देऊन संयुक्तरित्या या काळात मुख्य रस्त्यावर बेकायदा पार्किंग होणार नाही, याची काळजी घेऊच मात्र दिवसा हे काम सुरु राहणार नसून नागरिकांचा अमूल्य वेळ,एक लेन म्हणजेच स्टेशन कडे जाणाºया रस्त्याच्या डाव्या बाजूला होणारे खोदकाम त्यामुळे रस्त्याची एकच बाजू सुरु राहील नागरिकांना याचा त्रास व वाहतूक कोंडी होऊ नये याकरता खास करून हे काम रात्रीच्या वेळी सुरु राहून ते पूर्ण केले जाईल- बळीराम जी पवार,पालिका आयुक्त,वसई -विरार मनपा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार