शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे मासवण पंपिंग स्टेशन, धुकटन फिल्टर प्लांटमध्ये साचलाय गाळ; दोन्ही प्लांट पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 23:44 IST

वारंवार वीज होतेय खंडीत; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

- आशिष राणे

वसई: मागील दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे येथील वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट मध्ये मोठया प्रमाणावर गाळ साचला असून हे दोन्ही प्लांट पूर्णपणे सूर्या नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.दरम्यान याठिकाणी वारंवार वीजखंडीत होत असल्याने  पाऊस कमी होईपर्यंत शहरांतील नागरिकांना कमी दाबाने व  अनियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगत नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहेनागरिकांची पाण्यापासून गैरसोय होऊ नये म्हणून पाणीपुरवठा नियंत्रक यांच्या वतीनं सोमवारी रात्री उशिरा ही माहिती लोकमत ला देण्यात आली  आहेनियंत्रक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार,पालघर जिल्ह्यात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सूर्या योजनेतील धामणी धरण शंभर टक्के भरले असून ते ओसंडून वाहत आहे किंबहुना धामणी धरणाचे पाचही दरवाजे सोमवारी दुपारी उघडण्यात आले असून धरणातून हजारो लिटर पाण्याचा विसर्ग ही सुरू आहे त्यात सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आजूबाजूच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा ही दिला आहेमात्र अतिवृष्टीमुळे येथील मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट मध्ये मोठया प्रमाणावर  गाळ साचला असून  सूर्या नदीला पुर आल्याने हे दोन्ही प्लांट पूर्ण पणे पाण्याखाली गेले आहेत

अतिवृष्टीमुळे वीज होतेय खंडित; जॅकवेलही करावा लागतोय दुरुस्तजोरदार अतिवृष्टी व सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे  मासवण पंपिंग स्टेशन चा काही भाग पाण्याखाली गेला असल्याने त्या पुराच्या पाण्याबरोबर मोठा गाळ, केरकचरा वाहून येऊन तो मासवण पंपिंगच्या जॅकवेलमध्ये गाळ येऊन पंप नादुरुस्त होत आहेत.त्यामुळे पंपिंग बंद करून पाणबुडी जॅकवेलमध्ये उतरवून जॅकवेलमधील गाळ वारंवार साफ करावा लागत असल्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे

कुठल्याही क्षणी वीज होऊ शकते खंडित?दरम्यान पालघर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टी ,जोरदार वादळी वाऱ्यामुळे आतापर्यंत दोन वेळा मासवण पंपिंग स्टेशन व  धुकटन फिल्टर प्लांट येथे वीज पुरवठा खंडित झाला असून पुढेही विद्युत पुरवठा खंडित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी वरील कारणांमुळे वसई विरार शहराला होणारा पाणीपुरवठा पुढील दोन दिवस अनियमित आणि कमी प्रमाणात होऊ शकतो तरी नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे  असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.