शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

अतिवृष्टीमुळे मासवण पंपिंग स्टेशन, धुकटन फिल्टर प्लांटमध्ये साचलाय गाळ; दोन्ही प्लांट पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 23:44 IST

वारंवार वीज होतेय खंडीत; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

- आशिष राणे

वसई: मागील दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे येथील वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट मध्ये मोठया प्रमाणावर गाळ साचला असून हे दोन्ही प्लांट पूर्णपणे सूर्या नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.दरम्यान याठिकाणी वारंवार वीजखंडीत होत असल्याने  पाऊस कमी होईपर्यंत शहरांतील नागरिकांना कमी दाबाने व  अनियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगत नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहेनागरिकांची पाण्यापासून गैरसोय होऊ नये म्हणून पाणीपुरवठा नियंत्रक यांच्या वतीनं सोमवारी रात्री उशिरा ही माहिती लोकमत ला देण्यात आली  आहेनियंत्रक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार,पालघर जिल्ह्यात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सूर्या योजनेतील धामणी धरण शंभर टक्के भरले असून ते ओसंडून वाहत आहे किंबहुना धामणी धरणाचे पाचही दरवाजे सोमवारी दुपारी उघडण्यात आले असून धरणातून हजारो लिटर पाण्याचा विसर्ग ही सुरू आहे त्यात सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आजूबाजूच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा ही दिला आहेमात्र अतिवृष्टीमुळे येथील मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट मध्ये मोठया प्रमाणावर  गाळ साचला असून  सूर्या नदीला पुर आल्याने हे दोन्ही प्लांट पूर्ण पणे पाण्याखाली गेले आहेत

अतिवृष्टीमुळे वीज होतेय खंडित; जॅकवेलही करावा लागतोय दुरुस्तजोरदार अतिवृष्टी व सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे  मासवण पंपिंग स्टेशन चा काही भाग पाण्याखाली गेला असल्याने त्या पुराच्या पाण्याबरोबर मोठा गाळ, केरकचरा वाहून येऊन तो मासवण पंपिंगच्या जॅकवेलमध्ये गाळ येऊन पंप नादुरुस्त होत आहेत.त्यामुळे पंपिंग बंद करून पाणबुडी जॅकवेलमध्ये उतरवून जॅकवेलमधील गाळ वारंवार साफ करावा लागत असल्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे

कुठल्याही क्षणी वीज होऊ शकते खंडित?दरम्यान पालघर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टी ,जोरदार वादळी वाऱ्यामुळे आतापर्यंत दोन वेळा मासवण पंपिंग स्टेशन व  धुकटन फिल्टर प्लांट येथे वीज पुरवठा खंडित झाला असून पुढेही विद्युत पुरवठा खंडित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी वरील कारणांमुळे वसई विरार शहराला होणारा पाणीपुरवठा पुढील दोन दिवस अनियमित आणि कमी प्रमाणात होऊ शकतो तरी नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे  असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.