शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

अतिवृष्टीमुळे मासवण पंपिंग स्टेशन, धुकटन फिल्टर प्लांटमध्ये साचलाय गाळ; दोन्ही प्लांट पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 23:44 IST

वारंवार वीज होतेय खंडीत; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

- आशिष राणे

वसई: मागील दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे येथील वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट मध्ये मोठया प्रमाणावर गाळ साचला असून हे दोन्ही प्लांट पूर्णपणे सूर्या नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.दरम्यान याठिकाणी वारंवार वीजखंडीत होत असल्याने  पाऊस कमी होईपर्यंत शहरांतील नागरिकांना कमी दाबाने व  अनियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगत नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहेनागरिकांची पाण्यापासून गैरसोय होऊ नये म्हणून पाणीपुरवठा नियंत्रक यांच्या वतीनं सोमवारी रात्री उशिरा ही माहिती लोकमत ला देण्यात आली  आहेनियंत्रक अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार,पालघर जिल्ह्यात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सूर्या योजनेतील धामणी धरण शंभर टक्के भरले असून ते ओसंडून वाहत आहे किंबहुना धामणी धरणाचे पाचही दरवाजे सोमवारी दुपारी उघडण्यात आले असून धरणातून हजारो लिटर पाण्याचा विसर्ग ही सुरू आहे त्यात सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आजूबाजूच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा ही दिला आहेमात्र अतिवृष्टीमुळे येथील मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट मध्ये मोठया प्रमाणावर  गाळ साचला असून  सूर्या नदीला पुर आल्याने हे दोन्ही प्लांट पूर्ण पणे पाण्याखाली गेले आहेत

अतिवृष्टीमुळे वीज होतेय खंडित; जॅकवेलही करावा लागतोय दुरुस्तजोरदार अतिवृष्टी व सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे  मासवण पंपिंग स्टेशन चा काही भाग पाण्याखाली गेला असल्याने त्या पुराच्या पाण्याबरोबर मोठा गाळ, केरकचरा वाहून येऊन तो मासवण पंपिंगच्या जॅकवेलमध्ये गाळ येऊन पंप नादुरुस्त होत आहेत.त्यामुळे पंपिंग बंद करून पाणबुडी जॅकवेलमध्ये उतरवून जॅकवेलमधील गाळ वारंवार साफ करावा लागत असल्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे

कुठल्याही क्षणी वीज होऊ शकते खंडित?दरम्यान पालघर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टी ,जोरदार वादळी वाऱ्यामुळे आतापर्यंत दोन वेळा मासवण पंपिंग स्टेशन व  धुकटन फिल्टर प्लांट येथे वीज पुरवठा खंडित झाला असून पुढेही विद्युत पुरवठा खंडित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी वरील कारणांमुळे वसई विरार शहराला होणारा पाणीपुरवठा पुढील दोन दिवस अनियमित आणि कमी प्रमाणात होऊ शकतो तरी नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे  असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.