शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

वसई -विरार शहरवासियांचे पाणी पावसाळा पूर्व दुरुस्ती अभावी 24 तास राहणार बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 16:32 IST

पूर्ववत झाल्यावर दोन दिवस कमी दाबाने  पाणीपुरवठा

- आशिष राणे

वसई- वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्याच्या जुन्या व नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पंपाची व त्यांच्या पॅनलसहित इतर ही कामे पावसाळ्यापूर्वी करून घेणे आवश्यक असल्याने ही दुरुस्तीची कामे करण्याकरिता बुधवारी दि 2 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते गुरूवार दि 3 जून सकाळी 9 वाजेपर्यंत सूर्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा 24 तासांकरीता बंद राहणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे शहर अभियंता एम.गिरगावकर यांनी सांगितले.

दरम्यान दोन दिवसांच्या दुरूस्तीनंतर पुढील दोन दिवस शहरात पाणी पुरवठा कमी दाबाने अपुरा येण्याची शक्यता आहे. तर या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे व पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

नाईलाजाने वसईकरांना टँकरचे दुषित पाणी -

वसई-विरारकरांना पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिन्या अनेकदा नादुरुस्त होतात. पंम्पिंग स्टेशनमध्ये होत असलेल्या तांत्रीक बिघाडामुळे पालिकेकडून त्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घ्यावं  लागतं, तर दुरूस्तीच्या काळात वसईकरांचा पाणी पुरवठा काही तासांसाठी किंवा दिवसांसाठी बंद ठेवला जातो. या काळात अनियमित दराने अथवा अपुरा पाणीपुरवठा देखील वसईकरांना केला जातो. जलवाहिन्यांतून गढूळ पाणी येणे असे प्रकार वारंवार उद्भवत आहेत.

आधीच वसई-विरारमध्ये पाण्याची बऱ्यापैकी टंचाई सुरू आहे. बर्‍याच नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्यात सातत्याने जलवाहिन्यांत होणारे बिघाड व त्यावर पालिकेचे ठरलेले रडगाणे यामुळे वसईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नाईलाजाने वसईकरांना टँकरच्या दुषित पाण्याचा वापर करावा लागतो आधिच कोरोना, म्युकर मायकोसिस आणि त्यात हे दूषित व गढूळ पाणी त्यामुळे  वसईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी