शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार मनपाला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:28 IST

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये १) सर्वात जास्त स्वयंसेवकांचा सहभाग २) सर्वोच्च कचरा संकलन तसेच ३) प्लास्टिक कचऱ्याचे रिसायकल प्रात्याक्षिक या तीन श्रेणीमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले.

नालासोपारा (मंगेश कराळे) :- आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त सर्व १३ किनारी राज्यांमध्ये राज्य सरकार/स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम/मोहिम २१ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्याचे पर्यावरण व हवामान बदल विभाग, राज्य शासन यांनी निर्देश दिले होते. राष्ट्रीय किनारपट्टी कचरामुक्त करणेसाठी प्रोत्साहित करणे, जागतिक महासागर आणि जलमार्गांचे जतन व संरक्षण करण्याबद्दल लोंकामध्ये जागृकता निर्माण करणे हे हा दिवस साजरा करण्याचा मुळ उद्देश होता. त्याअनुषंगाने २१ सप्टेंबरला विरारच्या राजोडी बिच येथे आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त वसई विरार मनपा व गो-शुन्य प्रा. लि. यांच्या सहयोगाने स्वच्छता मोहिम राबविणेत आली.

सदर मोहिमे अंतर्गत शहरातील स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालये, एनसीसी व एनएसएस विद्यार्थी, महिला बचतगट, लोकप्रतिनिधी, पत्रकार वर्ग, सामान्य नागरीक, तसेच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग असे एकुण १५ हजाराहून अधिक सहभागी उपस्थित होते. एकुण ५३ मेट्रिक टन कचरा संकलन करून त्यातील ६६२ कि.ग्र. प्लास्टिक कचऱ्याचे रिसायकल प्रात्याक्षिक नागरीकांना दाखविण्यात आले.

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये १) सर्वात जास्त स्वयंसेवकांचा सहभाग २) सर्वोच्च कचरा संकलन तसेच ३) प्लास्टिक कचऱ्याचे रिसायकल प्रात्याक्षिक या तीन श्रेणीमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले.

वसई विरार शहराला विस्तीर्ण निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. किनारपट्टी स्वच्छता मोहिमेतून स्वच्छता, कचऱ्याचे विलगीकरण, रिसायकल, पुनर्वापर, प्लास्टिकचा कमीत कमी वापर आदि संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सदर उपक्रम राबविण्यात आलेला होता.

समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य अबाधित ठेऊन, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मनपाने सुरू केलेली ही मोहिम, केवळ आजची आवश्यकता नाही, तर आगामी पिढ्यांसाठी त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. महापालिका, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या मदतीने समुद्र किनाऱ्यांच्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. - अनिलकुमार पवार, (आयुक्त)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार