शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार महापालिकेच्या परिवहन कामगारांचा संप सुरूच, आजचा सहावा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 03:26 IST

वसई : संपकरी कामगार आणि ठेकेदारात बडतर्फीच्या मुद्यावरून वाद असल्याने संपाबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. आता तर संपकरी कामगार आणि ठेकेदारातील चर्चाच बंद झाली आहे. त्यामुळे वसई विरार महापालिकेच्या परिवहन कामगारांचे बेमुदत काम बंद शनिवारीही सुरु होते.वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील कामगार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. बंदचा आजचा ...

वसई : संपकरी कामगार आणि ठेकेदारात बडतर्फीच्या मुद्यावरून वाद असल्याने संपाबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. आता तर संपकरी कामगार आणि ठेकेदारातील चर्चाच बंद झाली आहे. त्यामुळे वसई विरार महापालिकेच्या परिवहन कामगारांचे बेमुदत काम बंद शनिवारीही सुरु होते.वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील कामगार सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. बंदचा आजचा सहावा दिवस असून मध्यंतरी दोनवेळा संप मागेही घेण्यात आला होता. पण, दहा कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मुद्यावरून वाद झाल्याने हा संप सुरु राहिला आहे.बुधवारी झालेल्या बैठकीत आयुक्त सतीश लोखंडे यांनी संपकरी श्रमजीवी कामगार संघटनेचे नेते विवेक पंडित यांना दहा बडतर्फ कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांनाही त्याचा पुनरूच्चार केला होता. पण, गुरुवारी रात्री परिवहनचे ठेकेदार मनोहर सकपाळ यांनी बडतर्फ कामगारांना चौकशी केल्यानंतर कामगार घेऊ अशी भूमिका घेतली. त्यावरून पुन्हा वाद सुरु झाला. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून कामगार पुन्हा संपावर गेले आहेत.शुक्रवारी संपकरी कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांनी आयुक्त आणि ठेकेदाराशी चर्चा केली. पण, आयुक्तांनी हात वर करीत ठेकेदारच निर्णय घेईल असे सांगून कामगार बडतर्फीबाबत घुमजाव केले. तर ठेकेदार सकपाळ यांनी चौकशी झाल्यावरच कामगारांना कामावर घेऊ अशी ठाम भूमिका घेतली. परिणामी कोणताच तोडगा न निघाल्याने काम बंद सुरुच राहिले आहे. ठेकेदार आणि कामगार यांच्या या वादात प्रवाशांचे मात्र हाल होत आहे.संपाशिवाय पर्यायच नाहीआयुक्त सतीश लोखंडे यांनी सर्व मागण्या मान्य करतांना बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. आता त्यांनीच शब्द फिरवल्याने संपाशिवाय पर्याय नाही, असे विवेक पंडित यांनी सांगितले.