शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या ‘व्यावसायिकरणा’चा वसई-विरार पालिकेला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 08:40 IST

टँकर व्यावसायिक महापालिका हद्दीतील जलाशये, विहिरी, कूपनलिका व अन्य नैसर्गिक स्रोतांद्वारे मिळणारे पाणी शहरातील सोसायट्या व व्यावसायिकांना अवाच्या सवा दराने विकून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा दरवर्षी मिळवत आहेत.

विरार/नालासोपारा : वसई-विरार शहराच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत असून येथील लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना होणारा पाणीपुरवठा अपुरा पडू लागला असून याचा अचूक फायदा घेत टँकर व्यावसायिकांनी वसई-विरारमध्ये आपले बस्तान घट्ट बसविले आहे. पाणी विक्रीतून या लाॅबीला लाखो रुपयांचा नफा होत असताना महापालिकेला मात्र कराचे पैसेही मिळत नसल्याने मोठा फटका बसत असल्याचे उघड झाले आहे.टँकर व्यावसायिक महापालिका हद्दीतील जलाशये, विहिरी, कूपनलिका व अन्य नैसर्गिक स्रोतांद्वारे मिळणारे पाणी शहरातील सोसायट्या व व्यावसायिकांना अवाच्या सवा दराने विकून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा दरवर्षी मिळवत आहेत. या व्यवहारातून वार्षिक अंदाजे १५० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.मागील दहा ते पंधरा वर्षांपासून येथील टँकरमालक बिनदिक्कतपणे पाण्याची लूट करून त्यातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ घेत आहेत. तरीही आजपर्यंत पालिकेकडून यांच्यावर कोणतीही कर आकारणी केली गेलेली नाही.वसई-विरार महापालिका हद्दीतील नैसर्गिक पाण्याचे हे बाजारीकरण जोरात सुरू असून या व्यावसायिकांवर पाालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे महापालिका अधिनियम १३० अंतर्गत टँकर व्यावसायिकांना तसेच बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्यांना पाणी लाभ कर आकारला जावा, अशी मागणी केली जात आहे. वसई-विरार महानगरपालिकेने  अनधिकृतरीत्या पाणीविक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारून टँकर व्यावसायिकांसह बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या पाणी लाभ श्रेणीत आणून महापालिकेच्या महसुलात वाढ करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडे केली आहे.

१२०० रुपयांची गुंतवणूक, २४ हजारांचा नफा!बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी तर सगळ्याच सीमा पार करून २० लीटरचा पाण्याचा बाटला सरासरी ४० रुपयांना विकण्यास सुरुवात केली आहे. १२०० रुपयांना मिळणाऱ्या १२ हजार लीटर पाण्याच्या एका टँकरचे पाणी शुद्धीकरण करून पिण्यास योग्य असल्याचा बनाव करून त्यातून तयार होणारे सहाशे बाटलीबंद डबे विकून हे पाणी विक्रेते सरासरी २४ हजार रुपयांचा भरघोस नफा एका टँकरमागे प्रतिदिन कमवत आहेत. या व्यवहारातून दरवर्षी ८०० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार होत असल्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी