शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

पाण्याच्या ‘व्यावसायिकरणा’चा वसई-विरार पालिकेला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 08:40 IST

टँकर व्यावसायिक महापालिका हद्दीतील जलाशये, विहिरी, कूपनलिका व अन्य नैसर्गिक स्रोतांद्वारे मिळणारे पाणी शहरातील सोसायट्या व व्यावसायिकांना अवाच्या सवा दराने विकून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा दरवर्षी मिळवत आहेत.

विरार/नालासोपारा : वसई-विरार शहराच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत असून येथील लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना होणारा पाणीपुरवठा अपुरा पडू लागला असून याचा अचूक फायदा घेत टँकर व्यावसायिकांनी वसई-विरारमध्ये आपले बस्तान घट्ट बसविले आहे. पाणी विक्रीतून या लाॅबीला लाखो रुपयांचा नफा होत असताना महापालिकेला मात्र कराचे पैसेही मिळत नसल्याने मोठा फटका बसत असल्याचे उघड झाले आहे.टँकर व्यावसायिक महापालिका हद्दीतील जलाशये, विहिरी, कूपनलिका व अन्य नैसर्गिक स्रोतांद्वारे मिळणारे पाणी शहरातील सोसायट्या व व्यावसायिकांना अवाच्या सवा दराने विकून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा दरवर्षी मिळवत आहेत. या व्यवहारातून वार्षिक अंदाजे १५० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.मागील दहा ते पंधरा वर्षांपासून येथील टँकरमालक बिनदिक्कतपणे पाण्याची लूट करून त्यातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ घेत आहेत. तरीही आजपर्यंत पालिकेकडून यांच्यावर कोणतीही कर आकारणी केली गेलेली नाही.वसई-विरार महापालिका हद्दीतील नैसर्गिक पाण्याचे हे बाजारीकरण जोरात सुरू असून या व्यावसायिकांवर पाालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे महापालिका अधिनियम १३० अंतर्गत टँकर व्यावसायिकांना तसेच बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्यांना पाणी लाभ कर आकारला जावा, अशी मागणी केली जात आहे. वसई-विरार महानगरपालिकेने  अनधिकृतरीत्या पाणीविक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारून टँकर व्यावसायिकांसह बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या पाणी लाभ श्रेणीत आणून महापालिकेच्या महसुलात वाढ करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडे केली आहे.

१२०० रुपयांची गुंतवणूक, २४ हजारांचा नफा!बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी तर सगळ्याच सीमा पार करून २० लीटरचा पाण्याचा बाटला सरासरी ४० रुपयांना विकण्यास सुरुवात केली आहे. १२०० रुपयांना मिळणाऱ्या १२ हजार लीटर पाण्याच्या एका टँकरचे पाणी शुद्धीकरण करून पिण्यास योग्य असल्याचा बनाव करून त्यातून तयार होणारे सहाशे बाटलीबंद डबे विकून हे पाणी विक्रेते सरासरी २४ हजार रुपयांचा भरघोस नफा एका टँकरमागे प्रतिदिन कमवत आहेत. या व्यवहारातून दरवर्षी ८०० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार होत असल्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी