शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

वसईतील रेशनदुकानदार वेठीस

By admin | Updated: June 16, 2016 00:38 IST

शिधापत्रिकाधारकांकडून विविध कागदपत्रांंची पूर्तता करून घेण्याची सक्ती मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सरकारने एक वर्षांपूर्वीच मागे घेतली असतांनाही आहे. पालघर पुरवठा अधिकाऱ्यांनी

- शशी करपे,  वसईशिधापत्रिकाधारकांकडून विविध कागदपत्रांंची पूर्तता करून घेण्याची सक्ती मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सरकारने एक वर्षांपूर्वीच मागे घेतली असतांनाही आहे. पालघर पुरवठा अधिकाऱ्यांनी रेशनदुकानदारांवरील ही सक्ती काम ठेऊन तिचे पालन न करणाऱ्या रेशनदुकानदारांना नोटीसा बजावल्याने ते त्रस्त झाले आहेत. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत एनआरसीकडून प्राप्त झालेल्या कॅस मध्ये डाटा एन्ट्रीचे काम सुरु आहे. त्यानुसार प्रत्येक रेशनदुकानदारांना संगणीकृत शिधापत्रिकांचे पिंं्रटेड फॉर्म देण्यात आले आहेत. त्यात शिधावाटप पत्रिकेतील कुटुंब प्रमुखासह नोंदवलेल्या नावांची आधार कार्ड, बँकेच्या खात्याचा क्रमांक, आधार कार्ड , गॅस एजन्सी आदींची झेरॉक्स दिल्याशिवाय धान्य देणार नसल्याचे फलक दुकानदारांनी लावले आहेत. त्यावरून दुकानदार आणि ग्राहकांमध्ये खटके उडत आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक महासंघाने मुंबईने हायकोर्टात भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने १७ मेबुधवारी २०१६ रोजी रेशनदुकानदारांना अशी माहिती सक्तीने मिळविण्यास मनाई करणारा हुकुम जारी केला आहे. त्याआधी राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अवर सचिव कि. गो. ठोसर यांनी २१ मे २०१५ रोजीच पत्रान्वये राज्यातील सर्व तहसिलदारांना आदेश दिले आहेत. त्यात मुंबई हायकोर्टाचा निर्णय लक्षात घेऊन शिधापत्रिकाधारकांकडून माहिती संकलीत करण्याचे काम पूर्णत: ऐच्छिक असून ते करून देणाऱ्या दुकानदारांना प्रत्येक शिधापत्रिकेमागे पाच रुपये मानधन दिले जाणार आहे, त्यानंतर याच विभागाचे अधिकारी म. गि. जोगदंड यांनी हायकोर्टाने रास्तभाव दुकानदारांनी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक सिडींगकरीता उपलब्ध न केल्यास त्यांचे प्राधिकार पत्र रद्द करण्यात येऊ नये, अथवा कोटा कमी करण्यात येऊ नये अशा सूचना पत्राद्वआरे दिल्या आहेत. याप्रकरणी हायकोर्टाच्या आदेशाचे पालन होईल अशी दक्षता घ्यावी असेही त्यांनी या पत्रात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना बजावले होते. असे असतांनाही पालघर जिल्हा पुरवठा विभागातून रेशनदुकानादारांना वारंवार नोटीसा बजावल्या जात आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, आपणाकडे सोपविण्यात आलेल्या कामात आपण जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. आपल्या दुकानाशी संलग्न शिधापत्रिकांची संख्या अस्तित्वात राहिलेली नाही. त्यामुळे आपण फॉर्ममधील माहिती भरुन घेतलेली नाही. दरम्यान, आधार सीडिंग करण्यासाठी एका खाजगी एजन्सीला राज्यभरात जिल्हा पातळीवर ठेका देण्यात आला आहे.पालघर जिल्ह्यात एजन्सीकडून कामात दिरंगाई झाल्याने पुरवठा विभागाने थेट रास्तभाव धान्य दुकानदारांना या कामाला जुंपण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.आपण अस्तित्वात नसलेल्या शिधापत्रिकांसाठी दरमहा अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची उचल करीत आहात, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. यास्तव आपणाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अन्वे व इतर अनुषंगिक अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई का करण्यात येऊ नये? याबाबतचा खुलासा दोन दिवसात सादर करावा अन्यथा आपणास वरील दोषारोप मान्य आहेत, असे गृहीत धरुन पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, हायकोर्टाच्या आदेशानंतर वर्षभरापूर्वीच राज्य सरकारने याप्रकरणी सविस्तर लेखी खुलासे केल्यानंतरही पुरवठा अधिकाऱ्यांनी मार्चपासून अशा नोटिसा बजावल्या.