शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वसई, विरारमध्ये पावसाचे धुमशान, सोसायट्यांमध्ये पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:05 IST

विजेचा खेळखंडोबा; रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक मंदावली

वसई : वसईत दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्र वार रात्रीपासून जोर धरला. पावसाने शनिवारी जोरदार हजेरी लावल्याने दिवसभर वसईत धुमशान सुरू होते. दरम्यान, वसईतील नवघर- माणिकपूर शहरातील बहुतेक सखल भागासह रस्त्यावरही पाणी साचल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले होते.या पावसाचा फटका येथील वाहतुकीवर व वाहनचालकांना बसला. त्यातच शहरातील मुख्य चौक भागातील सिग्नल यंत्रणा बंद झाल्याने येथील कोंडीत अधिकच भर पडली. किंबहुना रस्त्यावर खड्डे व त्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन दिवसात वसईत सरासरी १५० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी दिवसभर पडणाºया पावसामुळे पुन्हा एकदा वसई बुडाल्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यात विजेचा खेळखंडोबा अधूनमधून सुरूच होता. जून-जुलै महिन्यात वसईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसईत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांतीही घेतली होती. मात्र आता पुन्हा पावसाचे दमदार आगमन झाले आहे.वसई-विरारमधील अनेक सखल भागात पाणी साचले होते. अनेक इमारतींच्या आवारामध्ये पाणी साचले होते. वसई पश्चिमेकडील माणिकपूर, पार्वती क्र ॉस, चुळणे गाव, उमेळमान, कौल सीटी, साईनगर, डीजी नगर, समतानगर, वसई पूर्व, गोखीवरे, वालीव, औद्योगिक पट्टा, मिठागरे वसाहत, ग्रामीण व पश्चिम पट्टीतही बºयापैकी पाणी भरले होते. नवघर माणिकपूरमध्येही तळमजल्यावरील घरे, दुकानात पाणी शिरले होते.पालिकेतर्फे सक्शन पंपाची सोयया सर्व भागातील पाणी काढण्यासाठी महापालिकेतर्फे सक्शन पंप घेऊन काही पथक फिरताना तुरळक दिसले. तर रस्त्यावरील अनेक सखल भागांतील पाणी हळूहळू काढण्यात आले.

टॅग्स :Rainपाऊस