शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

वसई ते भाईंदर १० मिनिटांत, ११०० कोटी रु पयांचा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 00:15 IST

वसई-विरार उपप्रदेश आता भार्इंदर खाडी मार्गे मुंबई शहराला जोडण्याचा मार्ग े मोकळा झाला आहे. भार्इंदर खाडीवर हलक्या वाहनांसाठी सहा पदरी पूल बांधण्याच्या कामाची निविदा नुकतीच मंगळवारी एमएमआरडी ए प्राधिकरणने प्रसिद्ध केली.

वसई  - वसई-विरार उपप्रदेश आता भार्इंदर खाडी मार्गे मुंबई शहराला जोडण्याचा मार्ग े मोकळा झाला आहे. भार्इंदर खाडीवर हलक्या वाहनांसाठी सहा पदरी पूल बांधण्याच्या कामाची निविदा नुकतीच मंगळवारी एमएमआरडी ए प्राधिकरणने प्रसिद्ध केली. वर्ष २०१३ ला या कामाला मंजुरी देण्यात आली होती. सुमारे ११०० कोटी रु पयांचा हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर परिणामी या कामामुळे चक्क वसई ते भार्इंदर अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करू शकता येणार आहे.पश्चिम रेल्वे मार्गाने वसई-विरार शहर मुंबईला जोडले गेले असले तरी मात्र वाहन घेऊन मुंबईला जायचे असेल तर महामार्गावरून खाडीला वळसा घालून जावे लागत होते. त्यात भार्इंदरला जरी जायचे असेल तर काशिमिरा महामार्गावरून जावे लागत होते. वसई हून भार्इंदरला रेल्वेने जाण्यासाठी आतापर्यंत केवळ दहा मिनिटे लागत असून महामार्गावरून जाण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागत होता.त्यामुळे रस्तामार्गे जाताना नागरिकांचा वेळ आणि इंधनाचा अधिक खर्च होत असे. भार्इंदर-नायगाव दरम्यानचा ब्रिटिशकालीन लोखंडी पूल वापरासाठी देण्याची बरीच वर्षे नागरिकांची मागणी होती, परंतु तो कमकुवत असल्याने त्याला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे भार्इंदर खाडीवर रेल्वे पुलाला समांतर असा पूल बांधावा, अशी पर्यायी मागणी समोर आली. तत्कालीन नवघर माणिकपूर नगर परिषदेने १०० कोटी रु पये खर्चाच्या पुलाचा प्रस्ताव तत्कालीन एमएमआरडीए अध्यक्ष रत्नाकर गायकवाड यांना सादर केला होता.वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एम एम आर डीए कडे खाडीवरून वाहनांच्या पुलाच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. २०१३ मध्ये एमएमआरडीएने या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. मात्र विविध कारणांमुळे पुलाच्या कामाच्या निविदा निघत नव्हत्या. अखेर मंगळवारी एमएमआरडीएने कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. १६ आॅक्टोबर २०१९ पर्यंत निविदेला अंतिम मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे या पुलासंदर्भातील सर्व प्रक्रि या पूर्ण झाल्या असून आम्ही निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली.पाणजू वासीयांना बऱ्यापैकी आनंद : नायगाव व भार्इंदर या दरम्यान असणाºया पाणजू बेटावर जाण्यासाठी फेरीबोट हाच एकमेव पर्याय आहे. पावसाळ्यात बोटीने प्रवास करणे धोक्याचे असते. त्यामुळे पाणजूचे रहिवासी भार्इंदर खाडीवरील जुन्या रेल्वे पुलावरून जीव धोक्यात घालून चालत जातात. भार्इंदर खाडीवरील नव्या पुलाला पाणजू गावात उतार देण्यात आला आहे. त्यामुळे त्याची समस्या दूर झाली आहे. पुलाच्या सर्व प्रक्रि या पूर्ण झाल्या असून निविदा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दोन वर्षांत पुलाचे काम पूर्ण होईल.पूल असा जोडणारनायगावला या पुलाला उतार मिळाल्यानंतर तो रिंगरूटला जोडला जाणार आहे. तेथून तो वसईमार्गे विरारच्या नारिंगीपर्यंत जोडला जाणार आहे. नारिंगी ते पालघर तालुक्यातील दातीवरे या खाडीवरील पुलाला मंजुरी मिळाली असल्याने पालघरातील नागरिकांनाही या मार्गाने मुंबई खूपच जवळ पडणार आहे. भार्इंदरला हा पूल नेताजी सुभाषचंद्र मार्गाला जोडून पुढे दिहसरपर्यंत जाणार आहे. यामुळे वसईहून वाहनाने निघालेली व्यक्ती थेट भार्इंदरला १० मिनिटांत आणि तेथून पुढे मुंबईला जाऊ शकणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारbhayandarभाइंदर