शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

वैतरणा, पारगाव पुलांना धोका!

By admin | Updated: October 10, 2016 03:12 IST

वैतरणा खाडीतून बेकायदेशीर रेती उत्खननामुळे वैतरणा रेल्वे पुलासह पारगाव पुलाला धोका निर्माण झाला

पालघर : वैतरणा खाडीतून बेकायदेशीर रेती उत्खननामुळे वैतरणा रेल्वे पुलासह पारगाव पुलाला धोका निर्माण झाला आहे. सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या प्राणहाणीची पुनरावृत्ती पालघर जिल्ह्यात होऊ नये यासाठी पालघरच्या तहसीलदारांनी खाडी शेजारी राहणाऱ्या गावात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण कार्य हाती घेतले आहे. अपघाताच्या शक्यतेचा विचार करुन भविष्यात रस्ते, रेल्वे पुलाच्या सुरक्षिततेची बाब शासन स्तरावरून गांभीर्याने घेतली गेली आहे. पालघर तालुक्यातील सफाळे-वैतरणा खाडीवरील रेल्वे पूल क्र . ९२ व ९३ च्या दोन्ही बाजू कडील ६०० मीटर परिसरातून बेकायदेशीररित्या रेती उत्खनन केले जात असल्याने रेल्वे गाड्यांना होणारा धोका लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या सुचने वरून जिल्हाधिकाऱ्यांनी अशा रेती उत्खननास पूर्णत: बंदी घातली आहे. ह्या संदर्भात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ‘आसनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्या’ नुसार मनाई आदेश काढले होते. तरीही काही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील काही ग्रामस्थ विनापरवाना रात्रंदिवस खाडीतून अनिधकृत पणे रेती उत्खनन करून साठवणूक, वाहतूक आणि विक्र ी करीत असल्याचे दिसून आले होते.एका बाजूला कायद्याच्या कठोर अंमल बाजावणीची ताकीद देताना ह्या बेकायदेशीर रेती उत्खनना मुळे वैतरणा खाडीवरील, पारगाव पूल कोसळल्यास मोठ्या जीवित हानीला आपल्याला सर्वाना सामोरे जाण्याची पाळी ओढवू शकते ह्याची जाणीव तहसीलदारांनी उपस्थितांना करून दिली. दुर्दैवाने एखादा अपघात घडल्यास आणि त्यात आपलेच नातेवाईक बळी गेल्यास आपल्या हाती पश्चातापा शिवाय काहीही उरणार नसल्याचे वास्तव रुपी चित्र समोर उभे केले. त्यामुळे महाड च्या दुर्घटनेतून आपण काही धडा घेऊन योग्य ती काळजी घेतली नाही तर भविष्यात आपल्यावर फार मोठी आपत्ती ओढवू शकते ह्याची जाणीवही तहसीलदार सागर ह्यांनी ग्रामस्थांना करून दिली. ह्यावेळी उपस्थितांनी आपण अशी चूक करणार नसल्याचा विश्वास तहसीलदारांना दिला. (प्रतिनिधी)तडीपारीची कारवाई करणारह्या बेकायदेशीर उत्खनना मुळे भारतीय रेल्वे कायदा कलम, पर्यावरण कायदा कलम, भारतीय दंड विधान संहिता कलम व मोक्का कायद्या नुसार गंभीर गुन्हे दाखल करून तडीपारी सारख्या गंभीर गुन्ह्यांची कारवाईची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार महेश सागर ह्यांनी बहाडोली, खांमलोली, दहिसर तर्फे मनोर, सोनावे, पारगाव, दारशेत उंबरपाडा ई. भागात सभा घेऊन ग्रामस्थांना दिली.