शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

वैतरणा, पारगाव पुलांना धोका!

By admin | Updated: October 10, 2016 03:12 IST

वैतरणा खाडीतून बेकायदेशीर रेती उत्खननामुळे वैतरणा रेल्वे पुलासह पारगाव पुलाला धोका निर्माण झाला

पालघर : वैतरणा खाडीतून बेकायदेशीर रेती उत्खननामुळे वैतरणा रेल्वे पुलासह पारगाव पुलाला धोका निर्माण झाला आहे. सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या प्राणहाणीची पुनरावृत्ती पालघर जिल्ह्यात होऊ नये यासाठी पालघरच्या तहसीलदारांनी खाडी शेजारी राहणाऱ्या गावात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण कार्य हाती घेतले आहे. अपघाताच्या शक्यतेचा विचार करुन भविष्यात रस्ते, रेल्वे पुलाच्या सुरक्षिततेची बाब शासन स्तरावरून गांभीर्याने घेतली गेली आहे. पालघर तालुक्यातील सफाळे-वैतरणा खाडीवरील रेल्वे पूल क्र . ९२ व ९३ च्या दोन्ही बाजू कडील ६०० मीटर परिसरातून बेकायदेशीररित्या रेती उत्खनन केले जात असल्याने रेल्वे गाड्यांना होणारा धोका लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या सुचने वरून जिल्हाधिकाऱ्यांनी अशा रेती उत्खननास पूर्णत: बंदी घातली आहे. ह्या संदर्भात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ‘आसनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्या’ नुसार मनाई आदेश काढले होते. तरीही काही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील काही ग्रामस्थ विनापरवाना रात्रंदिवस खाडीतून अनिधकृत पणे रेती उत्खनन करून साठवणूक, वाहतूक आणि विक्र ी करीत असल्याचे दिसून आले होते.एका बाजूला कायद्याच्या कठोर अंमल बाजावणीची ताकीद देताना ह्या बेकायदेशीर रेती उत्खनना मुळे वैतरणा खाडीवरील, पारगाव पूल कोसळल्यास मोठ्या जीवित हानीला आपल्याला सर्वाना सामोरे जाण्याची पाळी ओढवू शकते ह्याची जाणीव तहसीलदारांनी उपस्थितांना करून दिली. दुर्दैवाने एखादा अपघात घडल्यास आणि त्यात आपलेच नातेवाईक बळी गेल्यास आपल्या हाती पश्चातापा शिवाय काहीही उरणार नसल्याचे वास्तव रुपी चित्र समोर उभे केले. त्यामुळे महाड च्या दुर्घटनेतून आपण काही धडा घेऊन योग्य ती काळजी घेतली नाही तर भविष्यात आपल्यावर फार मोठी आपत्ती ओढवू शकते ह्याची जाणीवही तहसीलदार सागर ह्यांनी ग्रामस्थांना करून दिली. ह्यावेळी उपस्थितांनी आपण अशी चूक करणार नसल्याचा विश्वास तहसीलदारांना दिला. (प्रतिनिधी)तडीपारीची कारवाई करणारह्या बेकायदेशीर उत्खनना मुळे भारतीय रेल्वे कायदा कलम, पर्यावरण कायदा कलम, भारतीय दंड विधान संहिता कलम व मोक्का कायद्या नुसार गंभीर गुन्हे दाखल करून तडीपारी सारख्या गंभीर गुन्ह्यांची कारवाईची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार महेश सागर ह्यांनी बहाडोली, खांमलोली, दहिसर तर्फे मनोर, सोनावे, पारगाव, दारशेत उंबरपाडा ई. भागात सभा घेऊन ग्रामस्थांना दिली.