शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

जिल्ह्यातील लसीकरणाच्या कासवगतीने नाराजी, आजवर २ लाख ७३ हजार ३०२ नागरिकांनाच डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 08:38 IST

पालघर जिल्ह्याच्या अनेक भागांत अद्यापही लसीकरणाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे लसीकरण वेळत होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

जगदीश भोवड -

पालघर :  जिल्ह्याची एकूण लोकसंख्या अंदाजे ३० लाखांच्या घरात आहे, मात्र आजवर जिल्ह्यात केवळ २ लाख ७३ हजार ३०२ एवढेच लसीकरण झालेले आहे. एकंदर कासवगतीने होत असलेले लसीकरण पाहता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीची भावना पसरलेली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत असलेल्या लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत असून अनेकांना लसीअभावी परत फिरावे लागत आहे.पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागातही रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. पूर्वी गावखेड्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र आता गावागावांमध्येही रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी फारसे उत्सुक नसलेले अनेक आता मात्र लसीकरण केंद्रांवर गर्दी करताना दिसत आहेत. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागांत अद्यापही लसीकरणाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे लसीकरण वेळत होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करताना कुणीही कुठेही जाऊन लस घेऊ शकतो, अशी सोय असल्यामुळे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील केंद्रांवर शहरी भागातील नागरिक लसीकरणासाठी येत असल्याचेही दिसून आले आहे. जव्हार, विक्रमगड, वाडा आदी तालुक्यांतील ग्रामीण भागांतील लसीकरण केंद्रांवर बाहेरील लोकांनीच गर्दी केल्याचे दिसून आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचेही पाहावयास मिळाले.

१८ वर्षांपुढील नागरिकांमुळे ज्येष्ठांचे दुसरे डोस रखडलेराज्यात १८ वर्षांपुढील नागरिकांना १ मे पासून लसीकरण सुरू करण्यात आल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. यामुळे पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील अनेक नागरिकांना दुसरा डोस घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच ग्रामीण भागातील अनेकांना मोबाईलवर रजिस्ट्रेशन करता येत नसल्याने तेही लसीकरण केंद्रांवर जाऊन गर्दी पाहून परत फिरत आहेत.

लसीअभावी काही सेंटर बंदजिल्ह्याच्या अनेक भागांतून लसीकरणाबाबत तक्रारी येत आहेत. तलासरीसह काही तालुक्यांमधील लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा नसल्याने लसीकरण बंद करावे लागले आहे. तसेच अन्यही भागांत घडत आहे. त्यामुळे सकाळपासून केंद्रावर गर्दी करणाऱ्या नागरिकांना लस न मिळाल्याने परत फिरावे लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. 

लसीकरण दहापासून, गर्दी पहाटेपासूनचकोरोनापासून बचाव व्हावा यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याने अनेक लोक पहाटेच  लसीकरण केंद्र गाठतात आणि लाईनमध्ये थांबतात. मात्र सरकारी कर्मचारी सकाळी नऊ-साडेनऊनंतर येत असल्याने प्रत्यक्षात लसीकरण सकाळी १० वाजल्यापासून सुरू होते. त्यामुळे नागरिकांना चार-पाच तास रांगेत उभे राहावे लागते.

मी कुडूस येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी सकाळच्या सुमारास गेलो होतो, परंतु तेथे प्रचंड गर्दी होऊन वादावादी झाली. शेवटी पोलिसांना बोलावले. त्यामुळे मला लस न घेताच रिकाम्या हाताने परत फिरावे लागले.-अनिल पाटील, कुडूस

वाड्यातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलाे असता माझ्या मोबाईलवरील लिंग ओपन न झाल्याने मला लस मिळू शकली नाही. - शरद नगर, वाडा

वाडा शहरातील पांडुरंग जावजी हायस्कूलच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी सकाळी  आणि दुपारी दोन वेळा गेली दोन्ही वेळा तुमच्या मोबाईलमधील लिंग ओपन होत नसल्याचे कारण पुढे करून मला दोन वेळा घरी परतावे लागले.- सोनू भोईर, गांधरे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलVasai Virarवसई विरार