शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 00:23 IST

कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची भीती : बोईसरमध्ये पोलिसांना करावे लागले पाचारण

पंकज राऊत

बोईसर : लसीकरणासाठी असंख्य नागरिक प्रतीक्षेत असताना आलेल्या तूटपुंजा लसीच्या साठ्यामुळे जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. बोईसर येथील टीमामधील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रावर गुरुवारी पहाटेपासून लाभार्थ्यांची अक्षरशः झुंबड उडून सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाल्याने लसीकरण केंद्रेच आता कोरोना प्रादुर्भावाचे ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती वर्तविली जात आहे.

पालघर जिल्ह्यातील अनेक भागात हीच परिस्थिती गुरुवारी होती. जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुक्यांचा समावेश असून, वसई व पालघर या दोन तालुक्यांनंतर डहाणू व वाडा तालुक्याची लोकसंख्या लक्षणीय आहे. उर्वरित तलासरी, जव्हार, मोखाडा व विक्रमगड या तालुक्यांची लोकसंख्या त्या मानाने कमी आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण व दुर्गम भागातही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात आढळलेले रुग्ण व झालेले मृत्यू पाहता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सर्वोच्च प्राधान्य न दिल्यास अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३० लाख आहे. कागदोपत्री मात्र सुमारे २० ते २२ लाख असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत असून, ४५ वर्षांवरील व्यक्तींची लोकसंख्या सुमारे ८ लाख, तर १८ ते ४५ पर्यंतची लोकसंख्या सुमारे अडीच ते तीन लाख असल्याचे सांगण्यात येते. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण १ मे पासून सुरू केले असले तरी त्याला फारसी गती मिळालेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे सव्वादोन लाख व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले असून, राज्यातील इतर काही जिल्ह्यांच्या मानाने लसीकरणाची ही आकडेवारी समाधानकारक वाटत असली तरी या वयोगटाबरोबरच उर्वरित सर्व वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस लवकरात लवकर देणे हे मोठे आव्हान जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासमोर आहे.

लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणीपालघर जिल्हा आरोग्य विभागाकडे पुरेसी लस, लसीकरणासाठी सुसज्ज जागेबरोबरच कर्मचाऱ्यांची मर्यादा या अडचणी आहेत. त्यामुळे विविध भागतून तर काही दूर अंतरावरून नागरिक मोठ्या अपेक्षेने येतात. उन्हाचा त्रास सहन करतात, परंतु त्यांचा नंबर लागत नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे, तर टीमामध्ये बोईसरमधील एकमेव लसीकरण केंद्र असून, लोकसंख्येच्या मानाने जास्त प्रमाणात लसी उपलब्ध करून देणे  गरजेचे आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार