शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

‘उत्तन-विरार’साठी कांदळवनावर कुऱ्हाड, ३८ एकर कांदळवन क्षेत्र बाधित होणार; प्रस्ताव पर्यावरण मंजुरीसाठी सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 08:43 IST

'Uttan-Virar' दक्षिण मुंबईची थेट पालघरला जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल ३८ एकर क्षेत्रफळावरील कांदळवन तोडावे लागणार आहे.

- अमर शैला मुंबई -  दक्षिण मुंबईची थेट पालघरला जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल ३८ एकर क्षेत्रफळावरील कांदळवन तोडावे लागणार आहे. या प्रकल्पाच्या कामात तब्बल ८,४२० तिवराच्या झाडांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पर्यावरण मंजुरीसाठी सादर केलेल्या प्रस्तावातून ही बाब समोर आली आहे. 

एमएमआरडीए ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चून उत्तन विरार सागरी सेतू उभारणार आहे. हा सागरी सेतू थेट मुंबई -दिल्ली एक्स्प्रेसवे बरोबर विरारजवळ जोडला जाणार आहे. त्याची लांबी ५५.४२ किमी आहे. उत्तन, वसई आणि विरार या भागांत सागरी सेतूला कनेक्टर दिला जाणार आहे. हा सागरी सेतू पर्यवरण संवेदनशील भागातून जाणार आहे. तसेच, या सागरी सेतूच्या कनेक्टरच्या मार्गात खारफुटी जमीन, भरती-ओहोटीचे क्षेत्र, खाऱ्या पाण्याचे तलाव आणि मत्स्य क्षेत्र येत आहे. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणात आणि घनदाट असे कांदळवन क्षेत्र आहे. यातील उत्तन कनेक्टर हा तब्बल १० किमी लांबीचा आहे. यामध्ये तब्बल २१ एकर कांदळवन क्षेत्र नष्ट होणार आहे. तर, विरार कनेक्टर हा १८.९५ किमी लांबीचा असून, या भागात १६.५ एकर कांदळवन क्षेत्र बाधित होणार असल्याचे समोर आले आहे. सीआरझेड मंजुरी मिळाल्यानंतर एका वर्षाच्या कालावधीत हे कांदळवण तोडले जाणार आहे. 

या प्रकल्पाच्या कामाच्या कामासाठी नुकतीच एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. येत्या काही दिवसांत राज्य मंत्रिमंडळाकडूनही त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षात या प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदार नेमला जाणार आहे. 

प्रकल्पासाठी २११ हेक्टर जमीन लागणारया प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल २११ हेक्टर जमीन एमएमआरडीएला लागणार आहे. यात २.५ हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे, असेही प्रस्तावातून समोर आले आहे. 

१९० एकर क्षेत्रावर नव्याने कांदळवन लावणारप्रकल्पात ३८ एकर क्षेत्रावरील कांदळवण बाधित होणार आहे. याची भरपाई म्हणून १९० एकर क्षेत्रावर कांदळवणाचे रोपण केले जाणार आहे, असेही एमएमआरडीएने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMumbaiमुंबई