शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

मासे टिकविण्यासाठी सोडियम मेटा बाय सल्फाईडचा वापर; दोन खलाशांच्या मृत्यूनंतर मच्छीमारांत भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 13:22 IST

...मात्र दिवसेंदिवस पर्ससीन, एलईडी, डोलनेट आदी प्रगत आणि विनाशकारी मासेमारी पद्धतीमुळे समुद्रातील मत्स्य उत्पादन घटू लागल्याने आता बारा ते पंधरा दिवसांची मासेमारी करून बोटी परत येत आहेत. 

हितेन नाईक -

पालघर : समुद्रातील माशांचे प्रमाण घटल्याने मासेमारीला जाणाऱ्या बोटी १० ते १५ दिवसांनी मासेमारी करून बंदरात येऊ लागल्या. त्यामुळे पकडलेले मासे अधिक दिवस ताजे राहावेत म्हणून माशांवर ‘सोडियम मेटा बाय सल्फाईड’ नावाच्या जंतुनाशक पावडरचा वापर केला जात आहे. हा वापर जीवघेणा ठरत आहे. याच्या वापराबाबत योग्य प्रशिक्षण नसल्याने भाऊच्या धक्क्यावर एका ट्रॉलरच्या खणातून मासे बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या खलाशांपैकी दोघांच्या फुप्फुसात सल्फ्युरिक ॲसिड निर्माण होऊन ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. समुद्रात जाणाऱ्या बोटी, ट्रॉलर दोन ते पाच दिवसांनी मासे पकडून बंदरात यायच्या; मात्र दिवसेंदिवस पर्ससीन, एलईडी, डोलनेट आदी प्रगत आणि विनाशकारी मासेमारी पद्धतीमुळे समुद्रातील मत्स्य उत्पादन घटू लागल्याने आता बारा ते पंधरा दिवसांची मासेमारी करून बोटी परत येत आहेत. 

शवविच्छेदन रिपोर्टनंतरच कळेल खरे कारण- २६ डिसेंबर रोजी भाऊच्या धक्क्यावरील श्रीनिवास यादव आणि नागा डॉन संजय या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. -  खणात उतरलेल्या सहा कामगारांच्या फुप्फुसात श्वासोच्छ्वासादरम्यान सल्फर डायऑक्साईड हा विषारी वायू जाऊन त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी शंका रसायनशास्त्राचे प्रा. सुहास जनवाडकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. -  येलो गेट पोलिसांना या मृत्यूप्रकरणी शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतरच खरे कळेल, असे ते म्हणाले.

टॅग्स :fishermanमच्छीमारpalgharपालघर