शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

साखरा धरणाजवळ अज्ञातांनी टाकले घातक रसायन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:28 IST

वाणगावजवळ असलेले साखरा धरण तालुक्यातील सुमारे २९ गावांना पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे धरण आहे.

डहाणू : लाखो लोकांची तहान भागविणाऱ्या डहाणू तालुक्यातील साखरा धरणापासून अवघ्या २५० ते ३०० मीटर अंतरावर अज्ञात टँकरमधून घातक रसायन रस्त्यालगत टाकल्याचे समोर आले आहे.

वाणगावजवळ असलेले साखरा धरण तालुक्यातील सुमारे २९ गावांना पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे धरण आहे. डहाणू नगर परिषद, वाणगाव, चिंचणी यासह लाखो लोकांना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणापासून काही अंतरावर टँकरमधून घातक रसायन रस्त्यावर सोडल्याने त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे.

धरणालगतच वाणगाव-चारोटीकडे जाणाºया रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर परिसरात अवैधपणे टँकरद्वारे हे रसायन सोडले आहे. त्यामुळे रस्त्यालगत असलेली झाडेझुडपे जळून गेली आहेत. तसेच रसायनाची दुर्गंधी वातावरणात पसरल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, प्रवासी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनादेखील त्याचा त्रास होत आहे.

हे घातक केमिकल रात्रीच्या सुमारास टाकण्यात आल्याने ते कोणी टाकले हे समजू शकलेले नाही. तरीही बाजूलाच असलेल्या धरण परिसरात रसायन टाकल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लाखो लोकांना पाणीपुरवठा करणारे या धरणाची सुरक्षाव्यवस्था यानिमित्ताने ऐरणीवर आली आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. संबंधित प्रशासन याबाबत कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी