शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

मागोवा 2020: शेतकऱ्यांवर कोरोनासह अवकाळीचे दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 23:54 IST

 पालघर जिल्हा विशेषत: वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे.

- वसंत भोईरवाडा :  पालघर जिल्हा विशेषत: वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र २०२० वर्षाचा मागोवा घेताना शेतकऱ्यांना कोरोना महामारीसह अतिवृष्टी आणि अवकाळीच्या दुहेरी संकटाला सामाेरे जावे लागले. खरीप हंगामाच्या काळात या वर्षी लांबलेल्या पावसाने धुमाकूळ घातल्याने भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  कोरोना संकट सुरू झाल्यानंतर जिल्ह्यासह वाडा तालुक्यातील रब्बी हंगामातील कडधान्य पिके, भाजीपाला पिके, फळपिके, फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून या धक्क्यातून शेतकरीराजा अद्याप सावरलेला नाही. 

भातखरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची अडवणूक

अवकाळीमुळे भातपिकांचे खूप मोठे नुकसान झाले. त्यातूनही जे काही हाती लागले आहे, ते भात खरेदी केंद्रांवर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचे नंबर लागले आहेत. काही केंद्रांवर पोती नाहीत, तर काही ठिकाणी भात चांगले नसल्याने ते घेतले जात नाही. महामंडळाचे अधिकारी आणि मिलर यांचे साटेलोटे असल्याने केंद्रावर नेऊनदेखील भात दर्जेदार नसल्याचे कारण सांगून भात खरेदी करत नाहीत. त्यामुळे तेच भात मिलर मातीमोल किमतीत खाजगीमध्ये खरेदी करीत आहेत. 

कर्जफेड करणारे उपाशी 

महाराष्ट्रात ठाकरे सरकारने केलेल्या कृषी कर्जमाफीत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रूपयांचा सरकारी लाभ देण्याचे घोषित केले होते, परंतु कोरोनाचे संकट सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्यांना हा लाभ अद्याप मिळालेलाच नाही. त्यामुळे कर्ज थकविणारे तुपाशी,  तर कर्जफेड करणारे उपाशी अशी  शेतकऱ्यांची अवस्था आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी