शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मागोवा 2020: शेतकऱ्यांवर कोरोनासह अवकाळीचे दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 23:54 IST

 पालघर जिल्हा विशेषत: वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे.

- वसंत भोईरवाडा :  पालघर जिल्हा विशेषत: वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र २०२० वर्षाचा मागोवा घेताना शेतकऱ्यांना कोरोना महामारीसह अतिवृष्टी आणि अवकाळीच्या दुहेरी संकटाला सामाेरे जावे लागले. खरीप हंगामाच्या काळात या वर्षी लांबलेल्या पावसाने धुमाकूळ घातल्याने भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  कोरोना संकट सुरू झाल्यानंतर जिल्ह्यासह वाडा तालुक्यातील रब्बी हंगामातील कडधान्य पिके, भाजीपाला पिके, फळपिके, फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून या धक्क्यातून शेतकरीराजा अद्याप सावरलेला नाही. 

भातखरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची अडवणूक

अवकाळीमुळे भातपिकांचे खूप मोठे नुकसान झाले. त्यातूनही जे काही हाती लागले आहे, ते भात खरेदी केंद्रांवर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचे नंबर लागले आहेत. काही केंद्रांवर पोती नाहीत, तर काही ठिकाणी भात चांगले नसल्याने ते घेतले जात नाही. महामंडळाचे अधिकारी आणि मिलर यांचे साटेलोटे असल्याने केंद्रावर नेऊनदेखील भात दर्जेदार नसल्याचे कारण सांगून भात खरेदी करत नाहीत. त्यामुळे तेच भात मिलर मातीमोल किमतीत खाजगीमध्ये खरेदी करीत आहेत. 

कर्जफेड करणारे उपाशी 

महाराष्ट्रात ठाकरे सरकारने केलेल्या कृषी कर्जमाफीत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रूपयांचा सरकारी लाभ देण्याचे घोषित केले होते, परंतु कोरोनाचे संकट सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्यांना हा लाभ अद्याप मिळालेलाच नाही. त्यामुळे कर्ज थकविणारे तुपाशी,  तर कर्जफेड करणारे उपाशी अशी  शेतकऱ्यांची अवस्था आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी