शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मागोवा 2020: शेतकऱ्यांवर कोरोनासह अवकाळीचे दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 23:54 IST

 पालघर जिल्हा विशेषत: वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे.

- वसंत भोईरवाडा :  पालघर जिल्हा विशेषत: वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र २०२० वर्षाचा मागोवा घेताना शेतकऱ्यांना कोरोना महामारीसह अतिवृष्टी आणि अवकाळीच्या दुहेरी संकटाला सामाेरे जावे लागले. खरीप हंगामाच्या काळात या वर्षी लांबलेल्या पावसाने धुमाकूळ घातल्याने भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  कोरोना संकट सुरू झाल्यानंतर जिल्ह्यासह वाडा तालुक्यातील रब्बी हंगामातील कडधान्य पिके, भाजीपाला पिके, फळपिके, फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून या धक्क्यातून शेतकरीराजा अद्याप सावरलेला नाही. 

भातखरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची अडवणूक

अवकाळीमुळे भातपिकांचे खूप मोठे नुकसान झाले. त्यातूनही जे काही हाती लागले आहे, ते भात खरेदी केंद्रांवर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचे नंबर लागले आहेत. काही केंद्रांवर पोती नाहीत, तर काही ठिकाणी भात चांगले नसल्याने ते घेतले जात नाही. महामंडळाचे अधिकारी आणि मिलर यांचे साटेलोटे असल्याने केंद्रावर नेऊनदेखील भात दर्जेदार नसल्याचे कारण सांगून भात खरेदी करत नाहीत. त्यामुळे तेच भात मिलर मातीमोल किमतीत खाजगीमध्ये खरेदी करीत आहेत. 

कर्जफेड करणारे उपाशी 

महाराष्ट्रात ठाकरे सरकारने केलेल्या कृषी कर्जमाफीत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रूपयांचा सरकारी लाभ देण्याचे घोषित केले होते, परंतु कोरोनाचे संकट सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्यांना हा लाभ अद्याप मिळालेलाच नाही. त्यामुळे कर्ज थकविणारे तुपाशी,  तर कर्जफेड करणारे उपाशी अशी  शेतकऱ्यांची अवस्था आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी