शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

डहाणूतील पारंपरिक फुगे कारखाने मृत्युपंथाला, हजारो कामगारांवर बेकारीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:11 IST

हजारो भूमीपुत्रांना रोजगार देणाऱ्या फुगे कारखान्यांची अवस्था दयनिय झाली आहे. शासनाच्या आडमूठ्ठ्या धोरणामुळे त्यांची मुस्कटदाबी होत आहे.

- शौकत शेखडहाणू - या परिसरातील हजारो भूमीपुत्रांना रोजगार देणाऱ्या फुगे कारखान्यांची अवस्था दयनिय झाली आहे. शासनाच्या आडमूठ्ठ्या धोरणामुळे त्यांची मुस्कटदाबी होत आहे. उद्योग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या आधारे अत्याधुनिक मशीनव्दारे उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या फुगे कारखाने धारकांना जागतिक बाजारपेठेत विकसीत झालेली आॅटोमॅटीक लाईन मशीन आपल्या कारखान्यात बसविणे डहाणूच्या उद्योगबंदीमुळे शक्य होत नाही.गेल्या तीन वर्षापासून असंख्य कारखाने मृत्यूशय्येवर असल्याने येत्या काही महिन्यात आणखीही अनेक कारखाने बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी येथील हजारो मजूर, कुशल, अकुशल कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळणार आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी याकडे लक्ष देऊन आजारी असलेल्या या कारखानदारांना जीवदान देण्याची मागणी उद्योजक रविंद्र फाटक यांनी केली आहे.डहाणू तालुक्यात १९६२ पासून सुमारे दिडशे फुगे कारखाने होते. कच्चा रबरावर पक्रिया करून पारंपरिक पध्दतीने उत्पादीत केल्या जाणाºया डहाणू च्या मनमोहक रंगबेरंगी फुग्याला भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी होती. त्या मुळे रात्रंदिवस सुरू असलेल्या या कारखान्यात सुमारे पंधरा ते वीस हजार कामगारांना रोजगार मिळत होता. परंतु जागतिक बाजरपेठेत दररोज वाढणारे रबराचे दर, तशातच चायना तसेच श्रीलंका येथील दर्जेदार, टिकाऊ, फॅन्सी आणि स्वस्त फुग्यांच्या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस डहाणूतील फुग्यांची मागणी कमी होऊन असंख्य कारखाने आर्थिक संकटात सापडून बंद पडू लागले. विशेष म्हणजे सध्या चायनीज व श्रीलंकेच्या फुग्यांना खूप मागणी आहे. डहाणूच्या फुग्यांच्या तुलनेत ते प्रंचड स्वस्त आहे. त्याचे कारण म्हणजे येथील फुगे कारखाने धारक पारंपरिक पध्दतीने उत्पादन घेते. तर चायना व श्रीलंका येथे आॅटोमॅटीक लाईन मशीन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसीत झालेल्या मशीनवर फुग्यांचे उत्पादन घेतले जाते. कमी वेळात व कमी खर्चात दूप्पट, तिप्पट उत्पादन देणाºया या मशीनची किंमत दोन कोटी आहे.डहाणू तसेच परिसरात सध्या पंचवीस ते तीस फुगे कारखाने असून त्यातील निम्मेपेक्षा अधिक कारखाने महिन्यातून केवळ पंधरा दिवस सुरू असतात. पालघर जिल्हयातील गौण खनिज व डहाणू तालुक्यातील उद्योगबंदी बरोबरच हजारो हातांना रोजगार देणाºया फुगे कारखान्यांकडे कोणीही गांभिर्याने पाहत नसल्याने डहाणूत सुशिक्षित बेरोजगारांबरोबरच मोलमजूरी करून उदनिर्वाह करणाºया आदिवासींवर बेरोजगारीची पाळी आली आहे. डहाणूत केंद्र सरकारने १९९१ मध्ये एका अधिसुनेव्दारे उद्योगबंदी लादल्याने गेल्या २४ वर्षात येथे कोणताही नवीन प्रकल्प, किंवा एक ही कारखान सुरू झालेला नाही१९९१ ची अधिसूचना येते आहे, फुग्यांच्या कारखान्यांच्या मुळावरयेथील कारखानदारांनी शासनाकडे नवीन आॅटोमॅटीक लाईन मशीन साठी परवानगी मागितली. परंतु केंद्र शासनाच्या १९९१ च्या अधिसूचनेकडे डहाणू तालुका पर्यावरण प्रधिकरणाने बोट दाखविल्याने उहाणू फुगे कारखानदार संकटात सापडले आहेत.उद्योगबंदीमुळे गेल्या २८ वर्षात नवीन पिठाची चक्की देखील चालू होऊ शकलेली नाही. एका बाजुला सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच हजारो गोर-गरीब आदिवासी मजूरांना रोजगार देणारे फुगे कारखाने बंद पडत असल्याने भूमीपुत्रांत संताप आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या