शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

डहाणूतील पारंपरिक फुगे कारखाने मृत्युपंथाला, हजारो कामगारांवर बेकारीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:11 IST

हजारो भूमीपुत्रांना रोजगार देणाऱ्या फुगे कारखान्यांची अवस्था दयनिय झाली आहे. शासनाच्या आडमूठ्ठ्या धोरणामुळे त्यांची मुस्कटदाबी होत आहे.

- शौकत शेखडहाणू - या परिसरातील हजारो भूमीपुत्रांना रोजगार देणाऱ्या फुगे कारखान्यांची अवस्था दयनिय झाली आहे. शासनाच्या आडमूठ्ठ्या धोरणामुळे त्यांची मुस्कटदाबी होत आहे. उद्योग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या आधारे अत्याधुनिक मशीनव्दारे उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या फुगे कारखाने धारकांना जागतिक बाजारपेठेत विकसीत झालेली आॅटोमॅटीक लाईन मशीन आपल्या कारखान्यात बसविणे डहाणूच्या उद्योगबंदीमुळे शक्य होत नाही.गेल्या तीन वर्षापासून असंख्य कारखाने मृत्यूशय्येवर असल्याने येत्या काही महिन्यात आणखीही अनेक कारखाने बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी येथील हजारो मजूर, कुशल, अकुशल कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळणार आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी याकडे लक्ष देऊन आजारी असलेल्या या कारखानदारांना जीवदान देण्याची मागणी उद्योजक रविंद्र फाटक यांनी केली आहे.डहाणू तालुक्यात १९६२ पासून सुमारे दिडशे फुगे कारखाने होते. कच्चा रबरावर पक्रिया करून पारंपरिक पध्दतीने उत्पादीत केल्या जाणाºया डहाणू च्या मनमोहक रंगबेरंगी फुग्याला भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी होती. त्या मुळे रात्रंदिवस सुरू असलेल्या या कारखान्यात सुमारे पंधरा ते वीस हजार कामगारांना रोजगार मिळत होता. परंतु जागतिक बाजरपेठेत दररोज वाढणारे रबराचे दर, तशातच चायना तसेच श्रीलंका येथील दर्जेदार, टिकाऊ, फॅन्सी आणि स्वस्त फुग्यांच्या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस डहाणूतील फुग्यांची मागणी कमी होऊन असंख्य कारखाने आर्थिक संकटात सापडून बंद पडू लागले. विशेष म्हणजे सध्या चायनीज व श्रीलंकेच्या फुग्यांना खूप मागणी आहे. डहाणूच्या फुग्यांच्या तुलनेत ते प्रंचड स्वस्त आहे. त्याचे कारण म्हणजे येथील फुगे कारखाने धारक पारंपरिक पध्दतीने उत्पादन घेते. तर चायना व श्रीलंका येथे आॅटोमॅटीक लाईन मशीन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसीत झालेल्या मशीनवर फुग्यांचे उत्पादन घेतले जाते. कमी वेळात व कमी खर्चात दूप्पट, तिप्पट उत्पादन देणाºया या मशीनची किंमत दोन कोटी आहे.डहाणू तसेच परिसरात सध्या पंचवीस ते तीस फुगे कारखाने असून त्यातील निम्मेपेक्षा अधिक कारखाने महिन्यातून केवळ पंधरा दिवस सुरू असतात. पालघर जिल्हयातील गौण खनिज व डहाणू तालुक्यातील उद्योगबंदी बरोबरच हजारो हातांना रोजगार देणाºया फुगे कारखान्यांकडे कोणीही गांभिर्याने पाहत नसल्याने डहाणूत सुशिक्षित बेरोजगारांबरोबरच मोलमजूरी करून उदनिर्वाह करणाºया आदिवासींवर बेरोजगारीची पाळी आली आहे. डहाणूत केंद्र सरकारने १९९१ मध्ये एका अधिसुनेव्दारे उद्योगबंदी लादल्याने गेल्या २४ वर्षात येथे कोणताही नवीन प्रकल्प, किंवा एक ही कारखान सुरू झालेला नाही१९९१ ची अधिसूचना येते आहे, फुग्यांच्या कारखान्यांच्या मुळावरयेथील कारखानदारांनी शासनाकडे नवीन आॅटोमॅटीक लाईन मशीन साठी परवानगी मागितली. परंतु केंद्र शासनाच्या १९९१ च्या अधिसूचनेकडे डहाणू तालुका पर्यावरण प्रधिकरणाने बोट दाखविल्याने उहाणू फुगे कारखानदार संकटात सापडले आहेत.उद्योगबंदीमुळे गेल्या २८ वर्षात नवीन पिठाची चक्की देखील चालू होऊ शकलेली नाही. एका बाजुला सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच हजारो गोर-गरीब आदिवासी मजूरांना रोजगार देणारे फुगे कारखाने बंद पडत असल्याने भूमीपुत्रांत संताप आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या