शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

डहाणूतील पारंपरिक फुगे कारखाने मृत्युपंथाला, हजारो कामगारांवर बेकारीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:11 IST

हजारो भूमीपुत्रांना रोजगार देणाऱ्या फुगे कारखान्यांची अवस्था दयनिय झाली आहे. शासनाच्या आडमूठ्ठ्या धोरणामुळे त्यांची मुस्कटदाबी होत आहे.

- शौकत शेखडहाणू - या परिसरातील हजारो भूमीपुत्रांना रोजगार देणाऱ्या फुगे कारखान्यांची अवस्था दयनिय झाली आहे. शासनाच्या आडमूठ्ठ्या धोरणामुळे त्यांची मुस्कटदाबी होत आहे. उद्योग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या आधारे अत्याधुनिक मशीनव्दारे उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या फुगे कारखाने धारकांना जागतिक बाजारपेठेत विकसीत झालेली आॅटोमॅटीक लाईन मशीन आपल्या कारखान्यात बसविणे डहाणूच्या उद्योगबंदीमुळे शक्य होत नाही.गेल्या तीन वर्षापासून असंख्य कारखाने मृत्यूशय्येवर असल्याने येत्या काही महिन्यात आणखीही अनेक कारखाने बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी येथील हजारो मजूर, कुशल, अकुशल कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळणार आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी याकडे लक्ष देऊन आजारी असलेल्या या कारखानदारांना जीवदान देण्याची मागणी उद्योजक रविंद्र फाटक यांनी केली आहे.डहाणू तालुक्यात १९६२ पासून सुमारे दिडशे फुगे कारखाने होते. कच्चा रबरावर पक्रिया करून पारंपरिक पध्दतीने उत्पादीत केल्या जाणाºया डहाणू च्या मनमोहक रंगबेरंगी फुग्याला भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी होती. त्या मुळे रात्रंदिवस सुरू असलेल्या या कारखान्यात सुमारे पंधरा ते वीस हजार कामगारांना रोजगार मिळत होता. परंतु जागतिक बाजरपेठेत दररोज वाढणारे रबराचे दर, तशातच चायना तसेच श्रीलंका येथील दर्जेदार, टिकाऊ, फॅन्सी आणि स्वस्त फुग्यांच्या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस डहाणूतील फुग्यांची मागणी कमी होऊन असंख्य कारखाने आर्थिक संकटात सापडून बंद पडू लागले. विशेष म्हणजे सध्या चायनीज व श्रीलंकेच्या फुग्यांना खूप मागणी आहे. डहाणूच्या फुग्यांच्या तुलनेत ते प्रंचड स्वस्त आहे. त्याचे कारण म्हणजे येथील फुगे कारखाने धारक पारंपरिक पध्दतीने उत्पादन घेते. तर चायना व श्रीलंका येथे आॅटोमॅटीक लाईन मशीन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसीत झालेल्या मशीनवर फुग्यांचे उत्पादन घेतले जाते. कमी वेळात व कमी खर्चात दूप्पट, तिप्पट उत्पादन देणाºया या मशीनची किंमत दोन कोटी आहे.डहाणू तसेच परिसरात सध्या पंचवीस ते तीस फुगे कारखाने असून त्यातील निम्मेपेक्षा अधिक कारखाने महिन्यातून केवळ पंधरा दिवस सुरू असतात. पालघर जिल्हयातील गौण खनिज व डहाणू तालुक्यातील उद्योगबंदी बरोबरच हजारो हातांना रोजगार देणाºया फुगे कारखान्यांकडे कोणीही गांभिर्याने पाहत नसल्याने डहाणूत सुशिक्षित बेरोजगारांबरोबरच मोलमजूरी करून उदनिर्वाह करणाºया आदिवासींवर बेरोजगारीची पाळी आली आहे. डहाणूत केंद्र सरकारने १९९१ मध्ये एका अधिसुनेव्दारे उद्योगबंदी लादल्याने गेल्या २४ वर्षात येथे कोणताही नवीन प्रकल्प, किंवा एक ही कारखान सुरू झालेला नाही१९९१ ची अधिसूचना येते आहे, फुग्यांच्या कारखान्यांच्या मुळावरयेथील कारखानदारांनी शासनाकडे नवीन आॅटोमॅटीक लाईन मशीन साठी परवानगी मागितली. परंतु केंद्र शासनाच्या १९९१ च्या अधिसूचनेकडे डहाणू तालुका पर्यावरण प्रधिकरणाने बोट दाखविल्याने उहाणू फुगे कारखानदार संकटात सापडले आहेत.उद्योगबंदीमुळे गेल्या २८ वर्षात नवीन पिठाची चक्की देखील चालू होऊ शकलेली नाही. एका बाजुला सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच हजारो गोर-गरीब आदिवासी मजूरांना रोजगार देणारे फुगे कारखाने बंद पडत असल्याने भूमीपुत्रांत संताप आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या