शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वाहतूककोंडीवर वाहनतळाचा उतारा

By admin | Updated: October 1, 2016 03:15 IST

वरसोवा पुलाच्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुजरात येथून येणाऱ्या वाहनांकरिता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील सुमारे

तलासरी/ठाणे : वरसोवा पुलाच्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुजरात येथून येणाऱ्या वाहनांकरिता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील सुमारे १४ एकर जागेवर २००० गाडया उभ्या राहू शकतील एवढया क्षमतेचे वाहनतळ सोमवारपर्यंत कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्र वारी दिली.दापचारी आणि आच्छाड येथील दुग्धविकास आणि आरटीओ यांच्या ४ जागांवर हे वाहनतळ उभारण्यात येणार असल्याने ठाणे, कल्याण, भिवंडी बायपास, पालघर, वसई तसेच, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सर्व प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच, वाहतूक नियंत्रित करण्याकरिता मनोर फाटा व चिंचोटी येथे कंट्रोल रूम उभारण्यात यावे व त्यांच्या सूचनेनुसार गुजरातकडून येणारी वाहने नियंत्रित करण्याच्या सूचना करीत वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे शिंदे म्हणाले. वरसोवा पुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ती टाळण्याकरीता झालेल्या बैठकीत विशेष वाहनतळ उभारण्यात येऊन जेएनपीटी व गुजरातकडून येणारी वाहने नियंत्रित करून रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळावी अशी सूचना केल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी हा पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, पोलीस व वाहतूक पोलीस अधिकारी तहसीलदार, प्रांत आदी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तळावर स्वच्छ पाणी व अंघोळीची सोयवाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याकरिता सर्व यंत्रणांनी संयुक्त पणे काम करण्याची गरज असून पोलिसांनी मनुष्यबळ वाढवावे याकरिता महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून अतिरिक्त मनुष्यबळ मिळावे, याकरिता त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले असून त्यांनी होकारही दिला असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर उभारण्यात येणाऱ्या वाहनतळावर स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी तसेच शौचालयांची व्यवस्थेबरोबर ड्रायव्हर यांना अंघोळीकरिता हौद बांधण्यात यावा. तसेच, रु ग्णवाहिकांसाठी ग्रीन कॉरिडॉर देखील राबवण्यात यावे जेणे करून या वाहतूक कोंडीमुळे रु ग्णवाहिकांना कोणताही अडथळा होऊ नये असे त्यांनी सांगितले. गाड्या पास करणाऱ्या टोळ्यांची समस्याचारोटी, दापचारी, तलासरी येथील ग्रामस्थांनी चारोटी, दापचारी तपासणी नाका येथे मोठी वाहतूक कोंडी होते यावर उपाय योजना करण्याचे सांगितले. दापचरी तपासणी नाका येथे अवजड वाहने पास करणाऱ्या अनेक टोळ्या असून ग्रामस्थांना धमकावून या टोळ्या वाहने पास करतात याबाबत तक्रार केली. विशेष म्हणजे आर.टी.ओ, सदभावचे सुपरवायजर यांची हात मिळवणी असल्याचेही ते म्हणाले.पोलिसांवरील हल्ल्याचाही विषय मांडलातसेच या तपासणी नाक्यावर या टोळ्या दिवसरात्र घोळक्याने उभ्या असतात. याच्या कडून ग्रामस्थांना धमकवण्याचे प्रकार होतात तसेच पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचे निदर्शनात आणून देताच यावर कारवाई करण्याचे निर्देश मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या तपासणी नाक्यावरील टोळ्या नेस्तनाबूत केल्यास दापचारी तलासरी भागात शांतता प्रस्थापित होईल असे ग्रामस्थांनी सांगितले.