शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
4
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
5
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
6
भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
7
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
8
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
9
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
10
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
11
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
12
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
13
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
14
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
15
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
16
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
17
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
18
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
19
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
20
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?

वाहतूककोंडीवर वाहनतळाचा उतारा

By admin | Updated: October 1, 2016 03:15 IST

वरसोवा पुलाच्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुजरात येथून येणाऱ्या वाहनांकरिता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील सुमारे

तलासरी/ठाणे : वरसोवा पुलाच्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुजरात येथून येणाऱ्या वाहनांकरिता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील सुमारे १४ एकर जागेवर २००० गाडया उभ्या राहू शकतील एवढया क्षमतेचे वाहनतळ सोमवारपर्यंत कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्र वारी दिली.दापचारी आणि आच्छाड येथील दुग्धविकास आणि आरटीओ यांच्या ४ जागांवर हे वाहनतळ उभारण्यात येणार असल्याने ठाणे, कल्याण, भिवंडी बायपास, पालघर, वसई तसेच, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सर्व प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच, वाहतूक नियंत्रित करण्याकरिता मनोर फाटा व चिंचोटी येथे कंट्रोल रूम उभारण्यात यावे व त्यांच्या सूचनेनुसार गुजरातकडून येणारी वाहने नियंत्रित करण्याच्या सूचना करीत वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे शिंदे म्हणाले. वरसोवा पुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ती टाळण्याकरीता झालेल्या बैठकीत विशेष वाहनतळ उभारण्यात येऊन जेएनपीटी व गुजरातकडून येणारी वाहने नियंत्रित करून रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळावी अशी सूचना केल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी हा पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, पोलीस व वाहतूक पोलीस अधिकारी तहसीलदार, प्रांत आदी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तळावर स्वच्छ पाणी व अंघोळीची सोयवाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याकरिता सर्व यंत्रणांनी संयुक्त पणे काम करण्याची गरज असून पोलिसांनी मनुष्यबळ वाढवावे याकरिता महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून अतिरिक्त मनुष्यबळ मिळावे, याकरिता त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले असून त्यांनी होकारही दिला असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर उभारण्यात येणाऱ्या वाहनतळावर स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी तसेच शौचालयांची व्यवस्थेबरोबर ड्रायव्हर यांना अंघोळीकरिता हौद बांधण्यात यावा. तसेच, रु ग्णवाहिकांसाठी ग्रीन कॉरिडॉर देखील राबवण्यात यावे जेणे करून या वाहतूक कोंडीमुळे रु ग्णवाहिकांना कोणताही अडथळा होऊ नये असे त्यांनी सांगितले. गाड्या पास करणाऱ्या टोळ्यांची समस्याचारोटी, दापचारी, तलासरी येथील ग्रामस्थांनी चारोटी, दापचारी तपासणी नाका येथे मोठी वाहतूक कोंडी होते यावर उपाय योजना करण्याचे सांगितले. दापचरी तपासणी नाका येथे अवजड वाहने पास करणाऱ्या अनेक टोळ्या असून ग्रामस्थांना धमकावून या टोळ्या वाहने पास करतात याबाबत तक्रार केली. विशेष म्हणजे आर.टी.ओ, सदभावचे सुपरवायजर यांची हात मिळवणी असल्याचेही ते म्हणाले.पोलिसांवरील हल्ल्याचाही विषय मांडलातसेच या तपासणी नाक्यावर या टोळ्या दिवसरात्र घोळक्याने उभ्या असतात. याच्या कडून ग्रामस्थांना धमकवण्याचे प्रकार होतात तसेच पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचे निदर्शनात आणून देताच यावर कारवाई करण्याचे निर्देश मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या तपासणी नाक्यावरील टोळ्या नेस्तनाबूत केल्यास दापचारी तलासरी भागात शांतता प्रस्थापित होईल असे ग्रामस्थांनी सांगितले.