शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

उल्हासनगर पालिका : वाळवी लागल्याने फायली नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 02:26 IST

उल्हासनगर महापालिकेच्या नगररचनाकार विभागातील महत्त्वाच्या कपाटाला वाळवी लागल्याने दोन फाइल नष्ट, तर इतर फायलींची दैना झाली आहे.

उल्हासनगर : महापालिकेच्या नगररचनाकार विभागातील महत्त्वाच्या कपाटाला वाळवी लागल्याने दोन फाइल नष्ट, तर इतर फायलींची दैना झाली आहे. मंगळवारी फायलींची कपाटे रिकामी करून पेस्टकंट्रोल करून घेतल्याची माहिती नगररचनाकार मिलिंद सोनावणी यांनी दिली आहे.नगररचनाकार विभागात पावसाळ्यात गळती होत असल्याने कपाटाला वाळवीपासून वाचवण्यासाठी पेस्टकंट्रोल करून घ्या, अथवा इतरत्र हलवण्याची लेखी मागणी विभागाने आयुक्तांना केली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आयुक्तांसह बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने कपाटाला वाळवी लागून फाइल खराब झाल्या, असे सोनावणी यांनी सांगितले. दुसरीकडे महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, बांधकाम विभाग, महापालिका सचिव, पत्रकार कक्षासह प्रभाग समिती सभापतींच्या कार्यालयाचे नूतनीकरणावर कोट्यवधी खर्च केले आहे.आरोप-प्रत्यारोप सुरूनगररचनाकार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लाकडी कपाटातून फाइल काढल्यावर कपाट व फाइलला वाळवी लागल्याचे सोनावणी यांच्या लक्षात आले. किती फाइलला वाळवी लागून नष्ट झाल्या, असा प्रश्न विचारण्यात येत असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अखेर, विभागाने स्वखर्चाने पेस्टकंट्रोल करून घेतल्याची माहिती सोनावणी यांनी दिली. इतर विभागाच्या कपाटांची हीच अवस्था असून पालिकेच्या मुख्य फाइल रेकॉर्डरूमची तपासणी करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर