शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

उचाट ग्रामपंचायत १० वर्षे सरपंचाविना, आरक्षित प्रवर्गातील उमेदवार मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:04 IST

वाडा : तालुक्यातील उचाट या ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दहा वर्षापासून सरपंचाविना असून प्रशासकाच्या हाती आहे.

वसंत भोईर वाडा : तालुक्यातील उचाट या ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दहा वर्षापासून सरपंचाविना असून प्रशासकाच्या हाती आहे. आरक्षित जागेवर उमेदवार मिळत नसल्याने व गावात संबंधित जातीचे रहिवासी नसल्याने गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायतीत त्यातील उमेदवार निवडून येत नसल्याने पद रिक्त आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे आहे. येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार विनंती केली असता नियमाच्या पलीकडे काही करता येत नसल्याने ही पदे रिक्तच आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दहा वर्षापासून प्रशासक हाकतो आहे.वाडा तालुक्यातील उचाट हे कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसित गाव आहे. मतदार ५५० इतके आहेत. या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत असून सदस्य संख्या ७ आहे. आता सरपंचपदासाठी एक जागा अतिरिक्त झाल्याने एकूण सदस्य संख्या आठ झाली आहे. येथे अनुसूचित जमाती साठी पाच जागा असून इतर मागास वर्ग (कुणबी) एक जागा आहे. व सर्वसाधारण दोन जागा असून असे एकूण आठ सदस्य आहेत. मात्र आरक्षित उमेदवार उपलब्ध नसल्याने या ग्रामपंचायतीची सदस्य पदे रिक्त असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार सरपंचविना आहे.गेल्या पाच वर्षा पूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकाही आरक्षित जागेवर एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने ग्रामपंचायतीची सर्व सदस्य संख्या रिक्त होती. तशीच परिस्थिती आत्ताच झालेल्या निवडणुकीतही झाली. या गावाच्या हद्दीत फक्त दोन घरे अनुसूचित जमातीच्या नागरिकांची आहेत. त्यामुळे पाच अनुसूचित जमातीचे उमेदवार या गावात उपलब्ध नाहीत. असलेले नागरिक नोकरीमध्ये असल्याने उमेदवार मिळणे दुरापास्त झाले आहे.तसेच या ग्रामपंचायतीत एक सदस्य इतर मागासवगीॅयांकरिता आहे. मात्र या गावात एकही घर इतर मागासवगीॅयांचे नसल्याने हा उमेदवार मिळत नाही. उर्वरित दोन जागा या सर्वसाधारण आहेत. सर्वसाधारण समाजाचे उमेदवार येथे उपलब्ध आहेत. पण फक्त दोन उमेदवार असताना ग्रामपंचायतीची स्थापना होऊ शकत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायतीशिवाय या तिचा कारभार हाकला जातो. प्रशासकाच्या हाती या ग्रामपंचायतीची सत्ता आहे. ग्रामस्थांनी सदरची बाब तहसील व जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या साच्याच्या विरोधात प्रशासनाला जाता येत नाही. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही परिस्थिती जैसे थे आहे.>यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र नियमाच्या पलीकडे त्यांना जात येत नाही. यासाठी आम्हाला आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील. या शिवाय आमच्याकडे आता दुसरा पर्यायच उरलेला नाही.- प्रदीप मोरे, माजी सरपंच, ग्रामपंचायत उचाट>वाडा हा आदिवासी बहुल तालुका आहे. त्यामुळे येथे आदिवासी समाजासाठी पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. उचाट येथे आदिवासी समाजाची लोकसंख्या अत्यंत कमी असून येथे दोन ते तीन घरे आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाचे (अनुसूचित जमाती) उमेदवार उपलब्ध होऊ शकले नाही. या ग्रामपंचायतीत उमेदवार अर्ज प्राप्त न झाल्याने येथील निवडणूक होऊ शकली नाही. पंधरा वर्षापासून येथे हीच परिस्थिती आहे.- विठ्ठल गोसावी,नायब तहसीलदार, वाडा