शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

उचाट ग्रामपंचायत १० वर्षे सरपंचाविना, आरक्षित प्रवर्गातील उमेदवार मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:04 IST

वाडा : तालुक्यातील उचाट या ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दहा वर्षापासून सरपंचाविना असून प्रशासकाच्या हाती आहे.

वसंत भोईर वाडा : तालुक्यातील उचाट या ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दहा वर्षापासून सरपंचाविना असून प्रशासकाच्या हाती आहे. आरक्षित जागेवर उमेदवार मिळत नसल्याने व गावात संबंधित जातीचे रहिवासी नसल्याने गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायतीत त्यातील उमेदवार निवडून येत नसल्याने पद रिक्त आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे आहे. येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार विनंती केली असता नियमाच्या पलीकडे काही करता येत नसल्याने ही पदे रिक्तच आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दहा वर्षापासून प्रशासक हाकतो आहे.वाडा तालुक्यातील उचाट हे कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसित गाव आहे. मतदार ५५० इतके आहेत. या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत असून सदस्य संख्या ७ आहे. आता सरपंचपदासाठी एक जागा अतिरिक्त झाल्याने एकूण सदस्य संख्या आठ झाली आहे. येथे अनुसूचित जमाती साठी पाच जागा असून इतर मागास वर्ग (कुणबी) एक जागा आहे. व सर्वसाधारण दोन जागा असून असे एकूण आठ सदस्य आहेत. मात्र आरक्षित उमेदवार उपलब्ध नसल्याने या ग्रामपंचायतीची सदस्य पदे रिक्त असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार सरपंचविना आहे.गेल्या पाच वर्षा पूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकाही आरक्षित जागेवर एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने ग्रामपंचायतीची सर्व सदस्य संख्या रिक्त होती. तशीच परिस्थिती आत्ताच झालेल्या निवडणुकीतही झाली. या गावाच्या हद्दीत फक्त दोन घरे अनुसूचित जमातीच्या नागरिकांची आहेत. त्यामुळे पाच अनुसूचित जमातीचे उमेदवार या गावात उपलब्ध नाहीत. असलेले नागरिक नोकरीमध्ये असल्याने उमेदवार मिळणे दुरापास्त झाले आहे.तसेच या ग्रामपंचायतीत एक सदस्य इतर मागासवगीॅयांकरिता आहे. मात्र या गावात एकही घर इतर मागासवगीॅयांचे नसल्याने हा उमेदवार मिळत नाही. उर्वरित दोन जागा या सर्वसाधारण आहेत. सर्वसाधारण समाजाचे उमेदवार येथे उपलब्ध आहेत. पण फक्त दोन उमेदवार असताना ग्रामपंचायतीची स्थापना होऊ शकत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायतीशिवाय या तिचा कारभार हाकला जातो. प्रशासकाच्या हाती या ग्रामपंचायतीची सत्ता आहे. ग्रामस्थांनी सदरची बाब तहसील व जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या साच्याच्या विरोधात प्रशासनाला जाता येत नाही. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही परिस्थिती जैसे थे आहे.>यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र नियमाच्या पलीकडे त्यांना जात येत नाही. यासाठी आम्हाला आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील. या शिवाय आमच्याकडे आता दुसरा पर्यायच उरलेला नाही.- प्रदीप मोरे, माजी सरपंच, ग्रामपंचायत उचाट>वाडा हा आदिवासी बहुल तालुका आहे. त्यामुळे येथे आदिवासी समाजासाठी पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. उचाट येथे आदिवासी समाजाची लोकसंख्या अत्यंत कमी असून येथे दोन ते तीन घरे आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाचे (अनुसूचित जमाती) उमेदवार उपलब्ध होऊ शकले नाही. या ग्रामपंचायतीत उमेदवार अर्ज प्राप्त न झाल्याने येथील निवडणूक होऊ शकली नाही. पंधरा वर्षापासून येथे हीच परिस्थिती आहे.- विठ्ठल गोसावी,नायब तहसीलदार, वाडा