शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

सव्वीस हजार शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी; पालघर-ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 00:08 IST

एकूण १५७ कोटी ४१ लाख रुपये मिळण्याचा अंदाज

सुरेश लोखंडेठाणे : राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना नुकतीच लागू केली. यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनाअट माफ केले जात आहे. यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकºयांचा लेखाजोखा काढला जात आहे. त्यानुसार, २५ हजार ८८२ शेतकºयांना १५७ कोटी ४१ लाख पाच हजार ६७७ रुपयांची कर्जमाफी मिळणार असल्याचा अंदाज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यभरातील शेतकºयांना त्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना राज्यभर लागू केली आहे. त्यास अनुसरून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील टीडीसीसी बँकेच्या ६८ शाखांमध्ये या कर्जदार शेतकºयांचा लेखाजोखा काढला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील ३९६ सहकारी संस्थांद्वारे २५ हजार ८८२ शेतकºयांनी कर्ज घेतले आहे. त्यांच्या या कर्जाच्या खात्यांची तपासणी करण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यांत ३८ बँक तपासनीस, १७४ सचिव कामाला लागले आहेत. त्यांच्याद्वारे ६८ बँक खात्यांतील कर्जफेडीची मोहीम सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

या दोन्ही जिल्ह्यांमधील २५ हजार ८८२ कर्जदार शेतकºयांनी आतापर्यंत दोन लाखांपर्यंतचे १२८ कोटी १९ लाख ३३ हजार ३७७ रुपये कर्ज घेतल्याचे आढळून येत आहे. या मुद्दल कर्जापोटी आतापर्यंत २९ कोटी २१ लाख ७२ हजार २३० रुपये व्याज झाले आहे. या मुद्दल व व्याजाची रक्कम मिळून या शेतकºयांच्या १५७ कोटी ४१ लाख पाच हजार ६७७ रुपयांच्या कर्जमाफीचा अंदाज टीडीसीसी बँकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ७२५ शेतकºयांचे सर्वाधिक ८९ कोटी ८९ लाख २६ हजार ७६४ रुपये कर्जमाफी होत आहे. पालघर जिल्ह्यातील ११ हजार १५७ शेतकºयांचे ६७ कोटी ५१ लाख ७८ हजार ९१३ रुपये कर्जमाफी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पालघर जिल्ह्यात ६७ कोटी ५१ लाखांची कर्जमाफीठाण्याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील ११ हजार १५७ शेतकºयांनी १८९ सहकारी संस्थांद्वारे ३५ टीडीसीसी बँकांतून कर्ज घेतल्याचे आढळून येत आहे. त्यांच्या या व्यवहाराची १७ बँक तपासनीस व संस्थेच्या ८० सचिवांकडून शहानिशा केली जात आहे. या ११ हजार १५७ शेतकºयांनी ५५ कोटी ६७ लाख ६८ हजार ५२५ रुपये कर्ज घेतले आहेत. या मुद्दलीवर ११ कोटी ८४ लाख १० लाख ३८८ रुपये व्याज झालेले आहे. मुद्दलीच्या रकमेसह व्याज मिळून ६७ कोटी ५१ लाख ७८ हजार ९१३ रुपयांची कर्जमाफी पालघर जिल्ह्यातील शेतकºयांना मिळणार आहे. या कर्जदार शेतकºयांचे दोन लाखांपर्यंतच्या कर्जाचे खाते या योजनेमुळे निरंक होण्याची अपेक्षा शेतकºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :palgharपालघरUddhav Thackerayउद्धव ठाकरे