शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सव्वीस हजार शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी; पालघर-ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 00:08 IST

एकूण १५७ कोटी ४१ लाख रुपये मिळण्याचा अंदाज

सुरेश लोखंडेठाणे : राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना नुकतीच लागू केली. यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनाअट माफ केले जात आहे. यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकºयांचा लेखाजोखा काढला जात आहे. त्यानुसार, २५ हजार ८८२ शेतकºयांना १५७ कोटी ४१ लाख पाच हजार ६७७ रुपयांची कर्जमाफी मिळणार असल्याचा अंदाज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यभरातील शेतकºयांना त्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना राज्यभर लागू केली आहे. त्यास अनुसरून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील टीडीसीसी बँकेच्या ६८ शाखांमध्ये या कर्जदार शेतकºयांचा लेखाजोखा काढला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील ३९६ सहकारी संस्थांद्वारे २५ हजार ८८२ शेतकºयांनी कर्ज घेतले आहे. त्यांच्या या कर्जाच्या खात्यांची तपासणी करण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यांत ३८ बँक तपासनीस, १७४ सचिव कामाला लागले आहेत. त्यांच्याद्वारे ६८ बँक खात्यांतील कर्जफेडीची मोहीम सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

या दोन्ही जिल्ह्यांमधील २५ हजार ८८२ कर्जदार शेतकºयांनी आतापर्यंत दोन लाखांपर्यंतचे १२८ कोटी १९ लाख ३३ हजार ३७७ रुपये कर्ज घेतल्याचे आढळून येत आहे. या मुद्दल कर्जापोटी आतापर्यंत २९ कोटी २१ लाख ७२ हजार २३० रुपये व्याज झाले आहे. या मुद्दल व व्याजाची रक्कम मिळून या शेतकºयांच्या १५७ कोटी ४१ लाख पाच हजार ६७७ रुपयांच्या कर्जमाफीचा अंदाज टीडीसीसी बँकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ७२५ शेतकºयांचे सर्वाधिक ८९ कोटी ८९ लाख २६ हजार ७६४ रुपये कर्जमाफी होत आहे. पालघर जिल्ह्यातील ११ हजार १५७ शेतकºयांचे ६७ कोटी ५१ लाख ७८ हजार ९१३ रुपये कर्जमाफी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पालघर जिल्ह्यात ६७ कोटी ५१ लाखांची कर्जमाफीठाण्याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील ११ हजार १५७ शेतकºयांनी १८९ सहकारी संस्थांद्वारे ३५ टीडीसीसी बँकांतून कर्ज घेतल्याचे आढळून येत आहे. त्यांच्या या व्यवहाराची १७ बँक तपासनीस व संस्थेच्या ८० सचिवांकडून शहानिशा केली जात आहे. या ११ हजार १५७ शेतकºयांनी ५५ कोटी ६७ लाख ६८ हजार ५२५ रुपये कर्ज घेतले आहेत. या मुद्दलीवर ११ कोटी ८४ लाख १० लाख ३८८ रुपये व्याज झालेले आहे. मुद्दलीच्या रकमेसह व्याज मिळून ६७ कोटी ५१ लाख ७८ हजार ९१३ रुपयांची कर्जमाफी पालघर जिल्ह्यातील शेतकºयांना मिळणार आहे. या कर्जदार शेतकºयांचे दोन लाखांपर्यंतच्या कर्जाचे खाते या योजनेमुळे निरंक होण्याची अपेक्षा शेतकºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :palgharपालघरUddhav Thackerayउद्धव ठाकरे