शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

सव्वीस हजार शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी; पालघर-ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 00:08 IST

एकूण १५७ कोटी ४१ लाख रुपये मिळण्याचा अंदाज

सुरेश लोखंडेठाणे : राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना नुकतीच लागू केली. यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनाअट माफ केले जात आहे. यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकºयांचा लेखाजोखा काढला जात आहे. त्यानुसार, २५ हजार ८८२ शेतकºयांना १५७ कोटी ४१ लाख पाच हजार ६७७ रुपयांची कर्जमाफी मिळणार असल्याचा अंदाज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यभरातील शेतकºयांना त्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना राज्यभर लागू केली आहे. त्यास अनुसरून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील टीडीसीसी बँकेच्या ६८ शाखांमध्ये या कर्जदार शेतकºयांचा लेखाजोखा काढला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील ३९६ सहकारी संस्थांद्वारे २५ हजार ८८२ शेतकºयांनी कर्ज घेतले आहे. त्यांच्या या कर्जाच्या खात्यांची तपासणी करण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यांत ३८ बँक तपासनीस, १७४ सचिव कामाला लागले आहेत. त्यांच्याद्वारे ६८ बँक खात्यांतील कर्जफेडीची मोहीम सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

या दोन्ही जिल्ह्यांमधील २५ हजार ८८२ कर्जदार शेतकºयांनी आतापर्यंत दोन लाखांपर्यंतचे १२८ कोटी १९ लाख ३३ हजार ३७७ रुपये कर्ज घेतल्याचे आढळून येत आहे. या मुद्दल कर्जापोटी आतापर्यंत २९ कोटी २१ लाख ७२ हजार २३० रुपये व्याज झाले आहे. या मुद्दल व व्याजाची रक्कम मिळून या शेतकºयांच्या १५७ कोटी ४१ लाख पाच हजार ६७७ रुपयांच्या कर्जमाफीचा अंदाज टीडीसीसी बँकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ७२५ शेतकºयांचे सर्वाधिक ८९ कोटी ८९ लाख २६ हजार ७६४ रुपये कर्जमाफी होत आहे. पालघर जिल्ह्यातील ११ हजार १५७ शेतकºयांचे ६७ कोटी ५१ लाख ७८ हजार ९१३ रुपये कर्जमाफी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पालघर जिल्ह्यात ६७ कोटी ५१ लाखांची कर्जमाफीठाण्याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील ११ हजार १५७ शेतकºयांनी १८९ सहकारी संस्थांद्वारे ३५ टीडीसीसी बँकांतून कर्ज घेतल्याचे आढळून येत आहे. त्यांच्या या व्यवहाराची १७ बँक तपासनीस व संस्थेच्या ८० सचिवांकडून शहानिशा केली जात आहे. या ११ हजार १५७ शेतकºयांनी ५५ कोटी ६७ लाख ६८ हजार ५२५ रुपये कर्ज घेतले आहेत. या मुद्दलीवर ११ कोटी ८४ लाख १० लाख ३८८ रुपये व्याज झालेले आहे. मुद्दलीच्या रकमेसह व्याज मिळून ६७ कोटी ५१ लाख ७८ हजार ९१३ रुपयांची कर्जमाफी पालघर जिल्ह्यातील शेतकºयांना मिळणार आहे. या कर्जदार शेतकºयांचे दोन लाखांपर्यंतच्या कर्जाचे खाते या योजनेमुळे निरंक होण्याची अपेक्षा शेतकºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :palgharपालघरUddhav Thackerayउद्धव ठाकरे