शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रेशनवर सर्व आदिवासींना तूरडाळ, खाद्यतेल मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:56 IST

पांढरी शिधा पत्रिकाधारक वगळता सर्व आदिवासींना आता रेशनवर दोन किलोग्रॅम तूरडाळ आणि एक किलोग्रॅम खाद्यतेल दिले जाणार आहे.

मोखाडा : पांढरी शिधा पत्रिकाधारक वगळता सर्व आदिवासींना आता रेशनवर दोन किलोग्रॅम तूरडाळ आणि एक किलोग्रॅम खाद्यतेल दिले जाणार आहे. श्रमजीवीची २०१७-१८ पासून ही मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आदेश दिले होते. कुपोषणाची दाहकता असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा या कुपोषणाने प्रभावित तालुक्यात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. या प्रयोगाच्या यशानंतर ही योजना राज्यभर अंमलात येईल. आवश्यक पोषण घटकांच्या अभावामुळे आदिवासी मातांमध्ये कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे. हे श्रमजीवीने सरकार दरबारी मांडले होते. याबाबत अनेक प्रखर आंदोलने झाली. अखेर या योजनेला शासनाचा हिरवा कंदील मिळाला. १० जुलै २०१९ पासून या योजनेचा अंमल होणार आहे.पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न २०१६ साली पुन्हा ऐरणीवर आला होता. श्रमजीवी संघटनेने या प्रश्नावर रस्त्यावर उतरून रान उठवले होते. दुसऱ्या बाजूला याबाबत उपाययोजना काय असाव्यात, याबाबतही श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडितांच्या शिष्टमंडळाने सरकारशी चर्चा करून विवेक पंडित यांनी प्रत्यक्ष आदिवासींच्या भोजनात आवश्यक जीवनसत्त्व असलेले अन्नपदार्थ असावे असे सांगितले होते. त्यासाठी रेशनवर खाद्यतेल आणि तूरडाळ असावी, ही मागणी श्रमजीवी संघटनेने लावून धरली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘‘वर्षा’’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी पालघर जिल्हाधिकारी आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा सचिवांना याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. यानंतरही संघटनेने वारंवार याबाबत पाठपुरावा केला.श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन गरजू गरीब आदिवासींचे मागणी अर्ज शासनाकडे दाखल केले होते. याबाबत आता शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जव्हार आणि मोखाड्यात या योजनेचा प्रयोग होणार आहे. पांढºया शिधा पत्रिका वगळून सर्व केशरी, पिवळ्या, अंत्योदय शिधा पत्रिकाधारक आदिवासी कुटुंबाना याचा लाभ मिळणार असून या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर राज्यभरातील आदिवासींना याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी हिताच्या घेतलेल्या या निर्णयाचे श्रमजीवीेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार