शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड : स्लॅक सुपरव्हिजनची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 01:48 IST

२० दिवसांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट

पालघर/कासा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे दोन साधू व त्यांच्या चालकाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी, तब्बल २० दिवसांनंतर घटनास्थळाला भेट दिली. या तिहेरी हत्याकांडाआधी जिल्ह्यात अफवांनी जोर धरला असताना वेळीच पोलीस प्रशासनाला हे हत्याकांड रोखता आले नसल्याची टीका होत आहे. त्यामुळे ‘स्लॅक सुपरव्हिजन’ झाले आहे का? या प्रश्नावर आपण यासंदर्भात माहिती घेत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

१६ एप्रिल रोजी गडचिंचले या आदिवासीबहुल भागात दोन साधू व त्यांच्या गाडीच्या चालकाची निर्घृण हत्या झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट दिली. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, आ.राजेश पाटील, आ. श्रीनिवास वणगा, जि.प. सभापती काशिनाथ चौधरी, सदस्य शिवा सांबरे आदी उपस्थित होते.

याप्रकरणी आतापर्यंत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करीत ३५ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास असताना २१ दिवसांत काही महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या का, याची माहिती देण्यापेक्षा राज्यातील व जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी व त्यावरील उपाययोजनांची माहिती देण्यास गृहमंत्र्यांनी स्वारस्य दाखविले. त्यामुळे गडचिंचलेप्रकरणी चर्चा लांबवली जाऊ नये, याची विशेष काळजी त्यांनी घेतली का, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.आरोपींबाबत चौकशीनंतर निर्णयया प्रकरणात अटक केलेल्या ११५ आरोपींपैकी काही आरोपींचा या प्रकरणाशी संबंध नसल्याने त्यांना या प्रकरणातून वगळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत गृहमंत्र्यांना विचारणा केली असता, याबाबत पूर्ण चौकशी करुन मगच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.अफवांच्या अहवालावरही चौकशी सुरुजिल्ह्यात चोर, दरोडेखोर फिरत असून, ते मुलांच्या किडण्या काढून नेत असल्याच्या अफवांबाबत पोलिसांनी अहवाल पाठविले होते का, यावर गृहमंत्र्यांनी होकार देत याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, आयुक्त गंगाधरन, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, उपजिल्हाधिकारी किरण महाजन आदी उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, त्यावेळी पक्षाचे लोकप्रतिनिधी त्यांच्यासमवेत होते. अशा परिस्थितीत पत्रकारांना मात्र पोलिसांनी वाटेतच रोखून धरले. पत्रकार परिषदेत गृहमंत्र्यांकडे पत्रकारांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :palgharपालघरMurderखूनAnil Deshmukhअनिल देशमुख