शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड : स्लॅक सुपरव्हिजनची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 01:48 IST

२० दिवसांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट

पालघर/कासा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे दोन साधू व त्यांच्या चालकाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी, तब्बल २० दिवसांनंतर घटनास्थळाला भेट दिली. या तिहेरी हत्याकांडाआधी जिल्ह्यात अफवांनी जोर धरला असताना वेळीच पोलीस प्रशासनाला हे हत्याकांड रोखता आले नसल्याची टीका होत आहे. त्यामुळे ‘स्लॅक सुपरव्हिजन’ झाले आहे का? या प्रश्नावर आपण यासंदर्भात माहिती घेत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

१६ एप्रिल रोजी गडचिंचले या आदिवासीबहुल भागात दोन साधू व त्यांच्या गाडीच्या चालकाची निर्घृण हत्या झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट दिली. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, आ.राजेश पाटील, आ. श्रीनिवास वणगा, जि.प. सभापती काशिनाथ चौधरी, सदस्य शिवा सांबरे आदी उपस्थित होते.

याप्रकरणी आतापर्यंत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करीत ३५ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास असताना २१ दिवसांत काही महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या का, याची माहिती देण्यापेक्षा राज्यातील व जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी व त्यावरील उपाययोजनांची माहिती देण्यास गृहमंत्र्यांनी स्वारस्य दाखविले. त्यामुळे गडचिंचलेप्रकरणी चर्चा लांबवली जाऊ नये, याची विशेष काळजी त्यांनी घेतली का, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.आरोपींबाबत चौकशीनंतर निर्णयया प्रकरणात अटक केलेल्या ११५ आरोपींपैकी काही आरोपींचा या प्रकरणाशी संबंध नसल्याने त्यांना या प्रकरणातून वगळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत गृहमंत्र्यांना विचारणा केली असता, याबाबत पूर्ण चौकशी करुन मगच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.अफवांच्या अहवालावरही चौकशी सुरुजिल्ह्यात चोर, दरोडेखोर फिरत असून, ते मुलांच्या किडण्या काढून नेत असल्याच्या अफवांबाबत पोलिसांनी अहवाल पाठविले होते का, यावर गृहमंत्र्यांनी होकार देत याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, आयुक्त गंगाधरन, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, उपजिल्हाधिकारी किरण महाजन आदी उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, त्यावेळी पक्षाचे लोकप्रतिनिधी त्यांच्यासमवेत होते. अशा परिस्थितीत पत्रकारांना मात्र पोलिसांनी वाटेतच रोखून धरले. पत्रकार परिषदेत गृहमंत्र्यांकडे पत्रकारांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :palgharपालघरMurderखूनAnil Deshmukhअनिल देशमुख