शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलेचा हलगर्जीपणामुळे मृत्यू ? एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फरपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 05:55 IST

या महिलेला चार-पाच ठिकाणी उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. 

वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका २३ वर्षीय आदिवासी महिलेची प्रकृती सलाइन लावताच गंभीर झाली. त्यानंतर या महिलेला चार-पाच ठिकाणी उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. रुचिता रूपेश वड असे या मृत महिलेचे नाव असून, ती चांबळे गावातील रहिवासी आहे. या महिलेच्या मृत्यूने तिच्या तीन वर्षांच्या कुपोषित असलेल्या बालकाचे मातृछत्र हरपले आहे. दरम्यान, या आरोपाचे वैद्यकीय अधिकाऱ्याने खंडन केले आहे.

सोमवारी रुचिता वड ही थोडा ताप आणि अशक्तपणा असल्याची तक्रार घेऊन पती रूपेशसोबत प्राथमिक आरोग्य केंद्र कुडूस येथे गेली. तिला  महिला डॉक्टरने तपासले आणि सलाइन लावले.  त्यानंतर तिला थंडी भरून आली आणि जुलाब सुरू झाले. याची माहिती मिळताच, सुरुवातीला कर्तव्यावर उपस्थित नसलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान पगारे तेथे आले. तिला मोठ्या रुग्णालयात घेऊन जा, असे सांगितले. १०८ रुग्णवाहिकेतून पती रूपेश रुचिताला घेऊन कुडूस येथील खासगी डॉक्टरकडे घेऊन गेला. दरम्यान, तिला ऑक्सिजन, आयव्ही, काहीही न लावता किंवा सोबत नर्स अथवा डॉक्टर न देता, बेजबाबदारपणे पाठविल्याचा आरोप वड यांनी केला आहे.

डॉ. ठाकरे यांनी ती गंभीर असल्याचे सांगितले. अखेर गाडीने रुचिताला अंबाडी येथील साईदत्त हॉस्पिटलमध्ये नेले.  येथील डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले. मात्र, ऑक्सिजन पातळी ३० ते ३५ इतकी कमी होती. तेथील डॉक्टरने त्यांची रुग्णवाहिका घेऊन रुचिताला आधी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेले. मात्र, त्यांनीही उपचार नाकारला. पुढे सायन येथे नेल्यानंतर तिथेही उपचार नाकारले. पुन्हा ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय आणले. मात्र, तोपर्यंत रुचिता हिने प्राण सोडले होते. त्यानंतर, शवविच्छेदन केले गेले आणि ठाणे वागळे इस्टेट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली, असे श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळला

या संदर्भात कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान पगारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रूपेश वड यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. ही रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्याआधी त्यांना जुलाब व उलटीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांचा बीपी अत्यंत कमी झाला होता. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर १०८ रुग्णवाहिका देऊन त्यांना पुढे ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, अशी माहिती त्यांनी दिली.