शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:36 IST

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे, शाळा व महाविद्यालतून त्यांची गळती होऊ नये अनेक योजनांवर लाखो रुपये खर्च होत असतांना पंडित दिन दयाळ स्वयम योजने बरोबरच डीबीटी (लाभाचे थेट हस्तांतरण) योजना बारगळली आहे.

- शौकत शेखडहाणू  - आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे, शाळा व महाविद्यालतून त्यांची गळती होऊ नये अनेक योजनांवर लाखो रुपये खर्च होत असतांना पंडित दिन दयाळ स्वयम योजने बरोबरच डीबीटी (लाभाचे थेट हस्तांतरण) योजना बारगळली आहे. या योजनेतून मिळणाऱ्या शंभर रुपयात दोन वेळचे पोटभर जेवण कसे शक्य आहे असाच प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे.निवासी शासकीय वसतीगृहापासून वंचित राहिलेल्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत सुरू केलेली पंडित दिन दयाळ स्वयंम योजने बरोबरच वसतीगृहात प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी डीबीटी (लाभाचे थेट हस्तांतर) योजना वादाच्या भोवºयात सापडली आहे. या योजनेमुळे आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थीनींचे जेवणासाठी हाल होणार असल्याने शिवाय शंभर रूपयात रूपयात दोन वेळचे भरपोट जेवण कोणत्याही होटेल किंवा उपहार गृहात मिळणार नसल्याने त्यांची उपासमार होणार आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी, पालक तसेच विविध संघटनांनी या योजनेला दर्शविला आहे. शासनाने बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी महानगर पालिका, विभागीय तसेच जिल्हास्तरावर पंडित दिन दयाळ योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत शिक्षण घेणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांची जेवणाबरोबरच निवासस्थानाची व्यवस्था स्वत:लाच करावी लागणार आहे. केवळ त्यांना आदिवासी आयुक्तांमार्फत अनुदान मिळणार आहे. तर निवासी शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळविलेल्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील मुलामुलींसाठी शासनाने डीबीटी योजना अमलात आणली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सकाळचा नास्ता, दोन वेळची भोजनाची व्यवस्था स्वत:च करावी लागणार आहे. त्यासाठी आदिवासी विभाग प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खात्यात दर महा केवळ तीन हजार रूपये जमा करणार आहे.विशेष म्हणजे निवासी वस्तीगृहात विद्यार्थीनींना संध्याकाळी पाच वाजेनंतर वस्तीगृहाबाहेर पडण्यास मनाई असल्याने जेवणासाठी ते बाहेर जाऊ शकरणार नाही. तर शासनाचे अनुदान वेळेवर मिळेलच यांची हमी नसल्याने या योजनांना पालक आणि विद्यार्थ्यांकडून विरोध होत आहे. दरम्यान, सध्याच्या निवासी जागांचे दर आणि बांधकाम मूल्य शासनाला मान्य नसल्याने आदिवासी विकास विभागाला निवासी वस्तीगृहासाठी भाडे तत्वावर जागाही मिळत नाही. आणि जागा मिळालीच तर तेथे अनेक अडचणी मुळे बांधकाम होत नाही.अनेकांची गळतीबाजार भावानुसार भाडे द्यायला सरकार तयार नसल्याने जिल्हयात जागा मिळत नाही. पालघर जिल्हयात एकूण १७ निवासी वस्तीगृह आहे. जिल्हयात दर वर्षी उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या हजारोवर गेली आहे.गेल्या पंधरा वर्षात आदिवासी विकास विभागाने एक ही निवासी वस्तीगृह बांधलेले नाही किंवा विद्यमान वस्तीगृहाची क्षमता वाढवलेली नाही. परिणामी वस्तीगृहांची कमतरता भासत असून प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च शिक्षण घेणाºया अनेक विद्यार्थ्यांना वस्तीगृहाचा लाभ मिळत नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या