शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:36 IST

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे, शाळा व महाविद्यालतून त्यांची गळती होऊ नये अनेक योजनांवर लाखो रुपये खर्च होत असतांना पंडित दिन दयाळ स्वयम योजने बरोबरच डीबीटी (लाभाचे थेट हस्तांतरण) योजना बारगळली आहे.

- शौकत शेखडहाणू  - आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे, शाळा व महाविद्यालतून त्यांची गळती होऊ नये अनेक योजनांवर लाखो रुपये खर्च होत असतांना पंडित दिन दयाळ स्वयम योजने बरोबरच डीबीटी (लाभाचे थेट हस्तांतरण) योजना बारगळली आहे. या योजनेतून मिळणाऱ्या शंभर रुपयात दोन वेळचे पोटभर जेवण कसे शक्य आहे असाच प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे.निवासी शासकीय वसतीगृहापासून वंचित राहिलेल्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत सुरू केलेली पंडित दिन दयाळ स्वयंम योजने बरोबरच वसतीगृहात प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी डीबीटी (लाभाचे थेट हस्तांतर) योजना वादाच्या भोवºयात सापडली आहे. या योजनेमुळे आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थीनींचे जेवणासाठी हाल होणार असल्याने शिवाय शंभर रूपयात रूपयात दोन वेळचे भरपोट जेवण कोणत्याही होटेल किंवा उपहार गृहात मिळणार नसल्याने त्यांची उपासमार होणार आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी, पालक तसेच विविध संघटनांनी या योजनेला दर्शविला आहे. शासनाने बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी महानगर पालिका, विभागीय तसेच जिल्हास्तरावर पंडित दिन दयाळ योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत शिक्षण घेणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांची जेवणाबरोबरच निवासस्थानाची व्यवस्था स्वत:लाच करावी लागणार आहे. केवळ त्यांना आदिवासी आयुक्तांमार्फत अनुदान मिळणार आहे. तर निवासी शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळविलेल्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील मुलामुलींसाठी शासनाने डीबीटी योजना अमलात आणली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सकाळचा नास्ता, दोन वेळची भोजनाची व्यवस्था स्वत:च करावी लागणार आहे. त्यासाठी आदिवासी विभाग प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खात्यात दर महा केवळ तीन हजार रूपये जमा करणार आहे.विशेष म्हणजे निवासी वस्तीगृहात विद्यार्थीनींना संध्याकाळी पाच वाजेनंतर वस्तीगृहाबाहेर पडण्यास मनाई असल्याने जेवणासाठी ते बाहेर जाऊ शकरणार नाही. तर शासनाचे अनुदान वेळेवर मिळेलच यांची हमी नसल्याने या योजनांना पालक आणि विद्यार्थ्यांकडून विरोध होत आहे. दरम्यान, सध्याच्या निवासी जागांचे दर आणि बांधकाम मूल्य शासनाला मान्य नसल्याने आदिवासी विकास विभागाला निवासी वस्तीगृहासाठी भाडे तत्वावर जागाही मिळत नाही. आणि जागा मिळालीच तर तेथे अनेक अडचणी मुळे बांधकाम होत नाही.अनेकांची गळतीबाजार भावानुसार भाडे द्यायला सरकार तयार नसल्याने जिल्हयात जागा मिळत नाही. पालघर जिल्हयात एकूण १७ निवासी वस्तीगृह आहे. जिल्हयात दर वर्षी उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या हजारोवर गेली आहे.गेल्या पंधरा वर्षात आदिवासी विकास विभागाने एक ही निवासी वस्तीगृह बांधलेले नाही किंवा विद्यमान वस्तीगृहाची क्षमता वाढवलेली नाही. परिणामी वस्तीगृहांची कमतरता भासत असून प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च शिक्षण घेणाºया अनेक विद्यार्थ्यांना वस्तीगृहाचा लाभ मिळत नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या