शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बँकेच्या कर्जापासून आदिवासी अनभिज्ञ, कर्जमाफीनंतर आदिवासींच्या डोक्यावरील कर्ज झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:32 AM

बोगस कर्ज कशी वाटप केली जातात आणि त्याचा लाभ अनेक सामाजिक संस्था, बँका व दलाल कसे आपल्या घशात घालून घेतात याचे जिवंत उदाहरण वाडा तालुक्यातील वि-हे येथील शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जावरून उघड झाले आहे.

- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांना आपण मोठ्या रकमेचे बँकेकडून कर्ज घेतले असल्याबद्दल माहितीच नसून शासनाने केलेल्या कर्जमाफीनंतर त्यांच्या नावे हजारो रुपयांचे कर्ज होते व ते माफ झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बोगस कर्ज कशी वाटप केली जातात आणि त्याचा लाभ अनेक सामाजिक संस्था, बँका व दलाल कसे आपल्या घशात घालून घेतात याचे जिवंत उदाहरण वाडा तालुक्यातील वि-हे येथील शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जावरून उघड झाले आहे. यातील फसवल्या गेलेल्या अनेक शेतकऱ्यांनी वाडा तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करत या कर्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.वाडा शहरापासून सुमारे ४० कि.मी. अंतरावरील वि-हे गावातील काही शेतकºयांना एका व्यक्तीने येऊन तुम्हाला कर्जमाफी मिळाली आहे. तुम्ही फॉर्म भरून लाभ घ्या आणि पावती आमच्या कार्यालयात आणून द्या, असे सांगितले. यानंतर येथील वसंत देऊ वातास, देवीदास गौड, सुरेश बोंगे, रमेश लक्ष्मण बोंगे, लखमा लक्ष्मण रिंजड, सोन्या रामू भोये, दामू देऊ बर्डे, बंधू सोनू बरफ या शेतकऱ्यांनी येऊन कर्जमाफीचे फॉर्म भरले असता आपण ३९ हजार तर कुणी ४२ हजार रुपये कर्ज घेतले होते आणि ते माफ झाले असे समजले. बंधू बरफ व वसंत वातास यांनी प्रत्यक्षात एकही रु पयांचे कर्ज घेतले नसून त्यांच्या नावे हजारो रुपयांचे कर्ज घेऊन ते माफ केले आहे असे उघड झाले. शेतकºयांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी सिंजेंटा फाउंडेशनने येथील स्थानिक व्यक्ती भारत लहांगे यांना सोबत घेऊन शेतकºयांकडून एक फार्म भरून घेतला होता तसेच यानंतर काहींकडून धनादेश व कागद सह्या करून घेतले होते. यातील काही शेतकºयांना मोटार व बियाणे यासाठी ८ ते १९ हजार देण्यात आले होते. काहींनी यातील ठराविक रक्कम परत देखील केली तर मागील वर्षी झालेल्या कर्जमाफीत आपली कर्ज माफ झाली असतील असा समज या शेतकऱ्यांचा झाला. नुकताच झालेल्या कर्जमाफीत मात्र याच शेतकºयांच्या नावाने ३९ ते ४२ हजार अशा रक्कमेचे कर्ज काढलेले आहे हे पाहून शेतकरी अचंबित झाले आहेत. आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत सह्या व अंगठे यांचा दुरुपयोग करून शेतकरी व कर्जमाफी करणाऱ्यां सरकारची घोर फसवणूक केल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे.शासनाच्या आदेशानुसार कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील विºहे येथील शेतकºयांच्या कर्ज घेतलेच नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने चौकशी करु न वरिष्ठांच्या सूचनांनुसार कार्यवाही करू.- डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, वाडा.वाडा तालुक्यातील भारत लहांगे याच्या पत्नीच्या नावे औषधे, खते व औजारे देण्यासाठी प्रयत्न केले होते, यात शेतकºयांची फसवणूक करण्यात आली असेल तर आम्हाला काही माहिती नाही. सविस्तर माहिती घेऊन कारवाही करू.- अविनाश वामन, प्रोजेक्ट आॅफिसर ,सिजेंटा फाउंडेशन

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार