शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या कर्जापासून आदिवासी अनभिज्ञ, कर्जमाफीनंतर आदिवासींच्या डोक्यावरील कर्ज झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:33 IST

बोगस कर्ज कशी वाटप केली जातात आणि त्याचा लाभ अनेक सामाजिक संस्था, बँका व दलाल कसे आपल्या घशात घालून घेतात याचे जिवंत उदाहरण वाडा तालुक्यातील वि-हे येथील शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जावरून उघड झाले आहे.

- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांना आपण मोठ्या रकमेचे बँकेकडून कर्ज घेतले असल्याबद्दल माहितीच नसून शासनाने केलेल्या कर्जमाफीनंतर त्यांच्या नावे हजारो रुपयांचे कर्ज होते व ते माफ झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बोगस कर्ज कशी वाटप केली जातात आणि त्याचा लाभ अनेक सामाजिक संस्था, बँका व दलाल कसे आपल्या घशात घालून घेतात याचे जिवंत उदाहरण वाडा तालुक्यातील वि-हे येथील शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जावरून उघड झाले आहे. यातील फसवल्या गेलेल्या अनेक शेतकऱ्यांनी वाडा तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करत या कर्ज प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.वाडा शहरापासून सुमारे ४० कि.मी. अंतरावरील वि-हे गावातील काही शेतकºयांना एका व्यक्तीने येऊन तुम्हाला कर्जमाफी मिळाली आहे. तुम्ही फॉर्म भरून लाभ घ्या आणि पावती आमच्या कार्यालयात आणून द्या, असे सांगितले. यानंतर येथील वसंत देऊ वातास, देवीदास गौड, सुरेश बोंगे, रमेश लक्ष्मण बोंगे, लखमा लक्ष्मण रिंजड, सोन्या रामू भोये, दामू देऊ बर्डे, बंधू सोनू बरफ या शेतकऱ्यांनी येऊन कर्जमाफीचे फॉर्म भरले असता आपण ३९ हजार तर कुणी ४२ हजार रुपये कर्ज घेतले होते आणि ते माफ झाले असे समजले. बंधू बरफ व वसंत वातास यांनी प्रत्यक्षात एकही रु पयांचे कर्ज घेतले नसून त्यांच्या नावे हजारो रुपयांचे कर्ज घेऊन ते माफ केले आहे असे उघड झाले. शेतकºयांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी सिंजेंटा फाउंडेशनने येथील स्थानिक व्यक्ती भारत लहांगे यांना सोबत घेऊन शेतकºयांकडून एक फार्म भरून घेतला होता तसेच यानंतर काहींकडून धनादेश व कागद सह्या करून घेतले होते. यातील काही शेतकºयांना मोटार व बियाणे यासाठी ८ ते १९ हजार देण्यात आले होते. काहींनी यातील ठराविक रक्कम परत देखील केली तर मागील वर्षी झालेल्या कर्जमाफीत आपली कर्ज माफ झाली असतील असा समज या शेतकऱ्यांचा झाला. नुकताच झालेल्या कर्जमाफीत मात्र याच शेतकºयांच्या नावाने ३९ ते ४२ हजार अशा रक्कमेचे कर्ज काढलेले आहे हे पाहून शेतकरी अचंबित झाले आहेत. आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत सह्या व अंगठे यांचा दुरुपयोग करून शेतकरी व कर्जमाफी करणाऱ्यां सरकारची घोर फसवणूक केल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे.शासनाच्या आदेशानुसार कर्जमाफी देण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील विºहे येथील शेतकºयांच्या कर्ज घेतलेच नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने चौकशी करु न वरिष्ठांच्या सूचनांनुसार कार्यवाही करू.- डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, वाडा.वाडा तालुक्यातील भारत लहांगे याच्या पत्नीच्या नावे औषधे, खते व औजारे देण्यासाठी प्रयत्न केले होते, यात शेतकºयांची फसवणूक करण्यात आली असेल तर आम्हाला काही माहिती नाही. सविस्तर माहिती घेऊन कारवाही करू.- अविनाश वामन, प्रोजेक्ट आॅफिसर ,सिजेंटा फाउंडेशन

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार