शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

आदिवासींचा विकास कागदावरच, रोजगार द्या! भटकंतीने थकल्यानंतर पुन्हा आपल्या गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:50 IST

शासनाने आदिवासी विकासाचा कितीही डंका वाजवला असला तरी अजूनही आदिवासीच्या नशीबी वनवासाचा शाप मिटलेला नाही. तालुक्यातील उद्योगबंदी, पालघर जिल्ह्यात उत्खननबंदी त्यामुळे टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी एक शहरातून दुसºया शहरात रोजगार शोधण्याची वेळ सध्या त्यांच्यावर आली आहे.

- शौकत शेखडहाणू - शासनाने आदिवासी विकासाचा कितीही डंका वाजवला असला तरी अजूनही आदिवासीच्या नशीबी वनवासाचा शाप मिटलेला नाही. तालुक्यातील उद्योगबंदी, पालघर जिल्ह्यात उत्खननबंदी त्यामुळे टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी एक शहरातून दुसºया शहरात रोजगार शोधण्याची वेळ सध्या त्यांच्यावर आली आहे.दिवाळी सण संपताच आपल्या कुटुंबानिशी डहाणू, चिंचणी, वानगाव, बोईसर, पालघर इत्यादी भागात स्थलांतरीत झालेल्या आदिवासी कुटुंबाला सध्या काम मिळत नसल्याने गेल्या पंधरा वीस दिवसांपासून त्यांनी जंगलात जाणे सुरू केले आहे. डहाणू तसेच परिसरात असलेल्या विकासकांचे सदनिका पडून असल्याने तसेच इमारतीचे बांधकाम बंद असल्याने मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणाºया आदिवासींवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात सत्तर टक्केपेक्षा अधिक आदिवासी समाजाची लोकवस्ती आहे. डहाणूच्या मुंबई-अहमदाबाद महामार्ग पलीकडील (पूर्व) दुर्गम भागात कायमस्वरुपी रोजगार नसल्याने येथील आदिवासी वीटभट्टी, इमारती बांधकाम तसेच बागायगती व्यावसायिकांकडे रोजगारासाठी दरवर्षी जात असतात.दिवाळीनंतर डहाणूचा कैनाड, सायवन, भिरोंडा, रायपूर, गंजाड, बापूगाव, चरी, बांधघर, कोसेसरी, भवाडी, दिवसी,दाभाडी, निंबापूर, धानिवरी, महालक्ष्मी, कोदाळ, आंबेसरी, कांदरवाडी, धुंदलवाडी, चिंचले, सुरवरआंबा, दाभोण इत्यादी गावे तसेच पाडे ओस पडत असतात. यावर्षी देखील शेकडो कुटुंबे रोजगाराच्या शोधात डहाणूच्या बंदरपट्टी भागात मुक्कामाला होती. परंतु बहुसंख्य ठिकाणी कामे बंद असल्याने आदिवासीची घोर निराशा झाली आहे.विशेष म्हणजे रोजगार मिळविण्यासाठी आदिवासी कुटुंबे जिल्हाभरात फिरत होती. परंतू त्यांना दोन चार, आठ, दिवस पुरतेच काम मिळत होते. त्यामुळे एका शहरातून दुसºया शहरात रोजगारासाठी भटकण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. दरम्यान, रोजगार मिळत नसल्याने अनेकजण पुन्हा गावाकडे परतू लागली आहेत.शहराकडे काम मिळत नसल्याने आदिवासींची दुरावस्थाडहाणूच्या दुर्गम भागांतील दºयाखोºयात डोंगरकुशीत राहणारे आदिवासी कुटुंबे चार, पाच महिने रोजगार मिळेल या आशेने जिल्ह्यातील चिंचणी, बोईसर, डहाणू, वानगाव, धा. डहाणू, वाढवण, तारापूर या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून आले होते. मात्र त्यांची निराशा झाली आहे.या वर्षी शेती, बागायती, इमारती बांधकाम व्यवसायाला मंदि असल्याने असंख्य ठिकाणी कामे बंद आहेत, त्यामुळे शहरामध्ये कामाच्या शोधात भटकणाºया आदिवासीच्या हाताला काम मिळत नाही. परिणामी गेल्या आठ, पंधरा दिवसांपासून आदिवासी कुटुंब पुन्हा जंगलाकडे वळू लागली आहेत. एकंदरीतच यामुळे जिल्हा प्रशासनापुढे मोठे आवाहन आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार