शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा विकास कागदावरच, रोजगार द्या! भटकंतीने थकल्यानंतर पुन्हा आपल्या गावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:50 IST

शासनाने आदिवासी विकासाचा कितीही डंका वाजवला असला तरी अजूनही आदिवासीच्या नशीबी वनवासाचा शाप मिटलेला नाही. तालुक्यातील उद्योगबंदी, पालघर जिल्ह्यात उत्खननबंदी त्यामुळे टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी एक शहरातून दुसºया शहरात रोजगार शोधण्याची वेळ सध्या त्यांच्यावर आली आहे.

- शौकत शेखडहाणू - शासनाने आदिवासी विकासाचा कितीही डंका वाजवला असला तरी अजूनही आदिवासीच्या नशीबी वनवासाचा शाप मिटलेला नाही. तालुक्यातील उद्योगबंदी, पालघर जिल्ह्यात उत्खननबंदी त्यामुळे टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी एक शहरातून दुसºया शहरात रोजगार शोधण्याची वेळ सध्या त्यांच्यावर आली आहे.दिवाळी सण संपताच आपल्या कुटुंबानिशी डहाणू, चिंचणी, वानगाव, बोईसर, पालघर इत्यादी भागात स्थलांतरीत झालेल्या आदिवासी कुटुंबाला सध्या काम मिळत नसल्याने गेल्या पंधरा वीस दिवसांपासून त्यांनी जंगलात जाणे सुरू केले आहे. डहाणू तसेच परिसरात असलेल्या विकासकांचे सदनिका पडून असल्याने तसेच इमारतीचे बांधकाम बंद असल्याने मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणाºया आदिवासींवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यात सत्तर टक्केपेक्षा अधिक आदिवासी समाजाची लोकवस्ती आहे. डहाणूच्या मुंबई-अहमदाबाद महामार्ग पलीकडील (पूर्व) दुर्गम भागात कायमस्वरुपी रोजगार नसल्याने येथील आदिवासी वीटभट्टी, इमारती बांधकाम तसेच बागायगती व्यावसायिकांकडे रोजगारासाठी दरवर्षी जात असतात.दिवाळीनंतर डहाणूचा कैनाड, सायवन, भिरोंडा, रायपूर, गंजाड, बापूगाव, चरी, बांधघर, कोसेसरी, भवाडी, दिवसी,दाभाडी, निंबापूर, धानिवरी, महालक्ष्मी, कोदाळ, आंबेसरी, कांदरवाडी, धुंदलवाडी, चिंचले, सुरवरआंबा, दाभोण इत्यादी गावे तसेच पाडे ओस पडत असतात. यावर्षी देखील शेकडो कुटुंबे रोजगाराच्या शोधात डहाणूच्या बंदरपट्टी भागात मुक्कामाला होती. परंतु बहुसंख्य ठिकाणी कामे बंद असल्याने आदिवासीची घोर निराशा झाली आहे.विशेष म्हणजे रोजगार मिळविण्यासाठी आदिवासी कुटुंबे जिल्हाभरात फिरत होती. परंतू त्यांना दोन चार, आठ, दिवस पुरतेच काम मिळत होते. त्यामुळे एका शहरातून दुसºया शहरात रोजगारासाठी भटकण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. दरम्यान, रोजगार मिळत नसल्याने अनेकजण पुन्हा गावाकडे परतू लागली आहेत.शहराकडे काम मिळत नसल्याने आदिवासींची दुरावस्थाडहाणूच्या दुर्गम भागांतील दºयाखोºयात डोंगरकुशीत राहणारे आदिवासी कुटुंबे चार, पाच महिने रोजगार मिळेल या आशेने जिल्ह्यातील चिंचणी, बोईसर, डहाणू, वानगाव, धा. डहाणू, वाढवण, तारापूर या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून आले होते. मात्र त्यांची निराशा झाली आहे.या वर्षी शेती, बागायती, इमारती बांधकाम व्यवसायाला मंदि असल्याने असंख्य ठिकाणी कामे बंद आहेत, त्यामुळे शहरामध्ये कामाच्या शोधात भटकणाºया आदिवासीच्या हाताला काम मिळत नाही. परिणामी गेल्या आठ, पंधरा दिवसांपासून आदिवासी कुटुंब पुन्हा जंगलाकडे वळू लागली आहेत. एकंदरीतच यामुळे जिल्हा प्रशासनापुढे मोठे आवाहन आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार