शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

धुंदलवाडीत भूकंपाबरोबर थंडीही प्रचंड वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 03:32 IST

डहाणू तालुक्यातील काही गावात सुरू असलेले भूकंपाचे धक्के कमी होण्याची काही लक्षणे दिसत नाहीत सततच्या धक्क्याने ग्रामस्थ थंडीवाऱ्यात घराबाहेर झोपत आहेत.

- सुरेश काटेतलासरी - डहाणू तालुक्यातील काही गावात सुरू असलेले भूकंपाचे धक्के कमी होण्याची काही लक्षणे दिसत नाहीत सततच्या धक्क्याने ग्रामस्थ थंडीवाऱ्यात घराबाहेर झोपत आहेत. सद्या या भागात थंडी वाढल्याने घराबाहेर रात्र काढताना त्यांचा जीव मेटाकुटीला येत आहेया भागातील धुंदलवाडी, हलद पाडा, बहारे, सवणे, सासवंद व इतर गावात दोन तीन महिन्यापासून भूकंपाचे धक्के सतत बसत असताना शासकीय यंत्रणा व राजकारणी मात्र झोपेत होते. पण लोकांमधून संताप व्यक्त होऊ लागताच यंत्रणा जागी झाली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कामाला लागली गाव पाड्यात मार्गदर्शन शिबीरे घेण्यात येऊन भूकंपाबाबत माहिती देण्यात आली. भूकंपाच्या वेळी घेण्याची खबरदारी लोकाना सांगितली गेली. सासवंद येथील वेदांत रुग्णालयाजवळ भूकंप मापक यंत्र बसविण्यात आले. त्यामुळे या भागातील भूकंपाचे ठिकाण समजले व भूकंपाची माहिती मिळू लागली मात्र हे सोपस्कार उरकल्यावर शासकीय यंत्रणा पुन्हा झोपी गेली. भूकंप प्रवण क्षेत्रातील लोकांना काही झोप येत नाही. ते रात्र-रात्र जागून काढत आहेत. घराबाहेर थंडीचा तडाखा वाढला आहे, घरात झोपावे तर भूकंपाच्या धक्क्याने घर कोसळण्याची भीती तर लहान मुले दचकून घाबरून झोपेतून उठून रडत बसत आहेत. घरांना तडे गेल्याने ती कधीही कोसळून पडण्याची भीती यामुळे ग्रामस्थ घराबाहेर तात्पुरता मांडव टाकून रात्र काढत आहेत. पण वाढत्या थंडीचे काय थंडी अन आभाळातून पडणारे दव याने रात्र बाहेर काढणे अवघड झाले आहे.भूकंपाच्या धक्क्यांनी ग्रामस्थ भयभीत असतांना याभागात अफवांचे पीक ही वाढते आहे. त्यामुळे लोकात अजून भीतीचे वातावरण आहे.घर दुरूस्ती करणार कशी?महसूल विभागाने तडे गेलेल्या घरांचे पंचनामे केले पण भरपाईचे काय? याबाबत अजून जिल्हाधिकाºयांचे मौन आहे. त्यामुळे घरांची दुरुस्ती कशी करायची हा प्रश्न आता येथील लोकांना पडला आहे. भूकंपाच्या धक्क्याबरोबर या भागात चिंताजनक परिस्थिती आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVasai Virarवसई विरार