शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बोलीभाषांच्या संवर्धंनाकरिता देशभ्रमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 02:19 IST

ज्या भाषेत बोलता, त्याच भाषेत लिहते होऊन बोलीभाषेच्या विकासाला हातभार लावा असे आवाहन डोंबिवलीतील पंचविशीच्या तरुणाने देशातील विद्यार्थ्यांना केले आहे.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी - ज्या भाषेत बोलता, त्याच भाषेत लिहते होऊन बोलीभाषेच्या विकासाला हातभार लावा असे आवाहन डोंबिवलीतील पंचविशीच्या तरुणाने देशातील विद्यार्थ्यांना केले आहे. या करिता लडाख ते कन्याकुमारी अशा सायकल देशभ्रमंतीला तो निघाला असून खेडोपाड्यात हिंडून याबाबत जनजागृती करीत आहे. दरम्यान गुजरात मार्गे तो बोर्डी येथे दाखल झाला, त्याचे स्थानिकांनी पुष्प देऊन स्वागत केले.मुंबईच्या डोंबिवली येथील गंधार कुलकर्णी हा पंचविशितील तरु ण त्या-त्या प्रदेशातील बोलीभाषेचे संवर्धन व्हावे या ध्येयाने झपाटला आहे. त्याने संस्कृतचे एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून डोंबिवलीतील ज्ञान प्रबोधिनीत विस्तार केंद्रात सात वर्षांपासून काम करीत आहे. मागील एका वर्षापासून या अभियानाशी तो जोडला गेला आहे. लडाख ते कन्याकुमारी असा २० हजार किमीचा प्रवास सायकलने तो करीत आहे. त्यामुळे खेडोपाड्यात पोहचता येऊन त्या भागातील शाळांना भेट देता येते. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोली भाषेत संवाद साधण्यासह, ती लिहिण्यासाठी उद्युक्त करणे हा त्या मागचा हेतू आहे. पुस्तकाच्या बाहेर जाऊन भाषेचा अभ्यास करीत आहे. विद्यापीठातील प्रबंध धूळखात पडले असून या माध्यमातून ते कृतीशील करता येतील अशी त्याची धारणा आहे. या करिता १ जुलै ते १५ आॅगस्ट २०१९ पर्यंतचे ५०० दिवसांचे लक्ष ठेवण्यात आले असून शेवटचा टप्पा कन्याकुमारी आहे. तेथेच या अभियानाची सांगता होणार आहे.रविवार, ३ नोव्हेंबर रोजी तो महाराष्ट्र गुजरात सीमा भागात आला. झाई येथे त्याचे स्थानिकांनी स्वागत केले. त्याने ७३०० किमीचा प्रवास पूर्ण केला आहे.विद्यार्थ्यांना बोलीभाषा संवर्धनारिता प्रोत्साहन करणे हा या अभियांनाचा उद्देश आहे. आतापर्यंत प्रत्येक भागातील आलेले अनुभव भिन्न आहेत. उच्चारण शास्त्र आणि लिखाण या विषयावर तो विद्यार्थ्यांशी बोलतो. बोलीभाषेत डायरी लिहल्यास त्याचे साहित्य निर्माण होऊन भाषाविकास होतो. साधारणत: पंचवीस वाक्य बनवली असून त्या-त्या बोलीभाषेत लिहायला सांगितले जाते. या भाषा संगणकातही वापरल्या गेल्यास भाषा विकासाला चालना मिळेल.’’-गंधार कुलकर्णी, बोलीभाषेच्या विकासकारिता भारतभ्रमंतीला निघलेला युवक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार