शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिरवली गावात गणेशोत्सवात सारीपाट खेळण्याची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 23:55 IST

महाभारतात खेळले गेलेले द्यूत अर्थात सारीपाट. आताच्या काळात एका मालिकेतून त्याचे दर्शन महाराष्ट्राला झाले,

पारोळ : गणेशोत्सवात वसई तालुक्यातील शिरवली गावात सारीपाटाचा डाव मांडला जात असून पालघर जिल्ह्यात याच गावात हा खेळ खेळला जातो. वसईत हा कुतुहालाचा विषय ठरला आहे.

महाभारतात खेळले गेलेले द्यूत अर्थात सारीपाट. आताच्या काळात एका मालिकेतून त्याचे दर्शन महाराष्ट्राला झाले, तो सारीपाट खेळ गणेशोत्सवात वसईतील शिरवली गावात खेळला जातो. ८१ वर्षांपासून दर गणेशोत्सवात हा खेळ खेळला जात असून आजही ही परंपरा सुरू आहे. या खेळासाठी कापडी सारीपाट वापरला जात असून सोंगट्या म्हणून लाकडी सोंगट्यांचा वापर होतो. लाकडी सोंगट्या कापडी पटावर ठेऊन हा खेळ सुरु होतो. तर फासे म्हणून कवड्यांचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे खेळाडू कवड्याचे दान घेतो त्या दानानुसार सोंगटी पटावर चालवली जाते. हा खेळ दोन गटात खेळवला जात असल्याने ज्या गटाच्या सोंगट्या सारीपाटाच्या मध्यभागी सर्वात प्रथम जातील तो गट विजयी होतो. या खेळात एक डाव पूर्ण होण्यासाठी ४ तास लागतात. विशेष म्हणजे या खेळात पैशाचा वापर केला जात नाही. एक उत्सव म्हणून अनेक वर्षापासून गणपतीत जागर व्हावा म्हणून करमणुकीसाठी हा खेळ खेळला जातो. पूर्वी या खेळात मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा सहभाग असायचा. मात्र मैदानी खेळांप्रमाणेच तरुण वर्गाने या खेळाकडे पाठ फिरवली आहे.महाभारतात हा खेळ खेळल्याचे सर्वश्रुत आहे. याच खेळात हरल्याने पांडवांना १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात काढावे लागले होते. आजकालच्या स्मार्ट मोबाइलमध्ये आढळणारा ल्युडो गेम हा या द्युत किंवा सारीपाटाचाच आधुनिक अवतार म्हणावा लागेल, इतका सारखेपणा त्यात दिसतो. मात्र, खेळ जरी सारखा असला तरी समोरासमोर बसून, गप्पागोष्टी करून हा खेळ खेळण्यात, दुसऱ्यावर मात करण्यात जी मजा आहे, ती मोबाइल गेममध्ये निश्चितच नाही. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारganpatiगणपती