शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील पर्यटन धोक्यात, २३० कोटींचा खर्च वाया ? : प्रदूषणामुळे बंहुसंख्य बीचेस झाले काळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:36 IST

पालघर जिल्ह्याला पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत किनारपट्टीवरील केळवे सह अन्य विविध गावांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्याला सन २०१५ पासून २३० कोटी ३ लाख ८२ हजाराचा वितरित झालेला निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालघर : पालघर जिल्ह्याला पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत किनारपट्टीवरील केळवे सह अन्य विविध गावांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्याला सन २०१५ पासून २३० कोटी ३ लाख ८२ हजाराचा वितरित झालेला निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तारापूर औद्योगिक वसाहती मधून क्षमतेपेक्षा अधिक प्रदूषित पाणी सोडण्यात येत असल्याने किनाº्यालगतचे पाणी काळे-पिवळे झाले असून दुसरीकडे थेट समुद्रात ७.१ किमी अंतरावर पाईपलाईन द्वारे प्रदूषित पाणी सोडले जाणार असल्याने समुद्रकिनारे दुर्गंधीयुक्त, प्रदूषित होऊन पर्यटकांची संख्या रोडवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तारापूर औद्योगिक वसाहती मध्ये सुमारे ३ ते ४ हजार लहान, मोठे कारखाने असून ह्या कारखान्यातून निघणारे प्रदूषित रासायनिक पाण्यावर प्रक्रि या करण्यासाठी २५ एमएलडी क्षमतेचे शुद्धीकरण प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले होते. मात्र कारखान्याच्या वाढत्या संख्येने या शुद्धीकरण प्रक्रि येची क्षमता मर्यादित ठरल्याने ५० एमएलडी क्षमतेच्या नवीन शुद्धीकरण प्रक्रियेची उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. ही पाईपलाईन समुद्रात ७.१ किलोमीटर्स आत जाणार असल्याने प्रदूषणाची मात्रा वाढणार आहे. पूर्वी ही लाईन समुद्रकिनाऱ्यापर्यंत मर्यादित असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी सोडले जात असल्याने आणि मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत असल्याचे स्थानिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिले होते.मग जर ही लाईन समुद्रात खोलवर सोडली तर प्रदूषणाची मात्रा वाढून सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्छेळी-दांडी, डहाणू या भागाच्या समोरील लहान बोटीद्वारे केली जाणारी मासेमारी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे किनारपट्टीवरील खाडीतील बोय, शिंगटी, शिंपले आदी माशांना रॉकेलमिश्रीत वास येत असल्याने माश्यांची विक्र ी होत नाही. त्याचप्रमाणे शेवंड, पापलेट,कोत, दाढा,घोळ आदी माश्यांनाही भविष्यात रॉकेल मिश्रित रसायनाचा वास येण्याची शक्यता आहे. प्रदूषणामुळे इथला निसर्ग उध्वस्त होत नामशेष होण्याच्या दिशेने मार्गक्र मण सुरू असल्याचे सांगून कोकण वाचिवण्याच्या आमच्या आंदोलनात प्रदूषणाविरोधात ही आमची लढाई राहणार असल्याचे लोकमतला सांगितले.- संजय यादवराव, अध्यक्ष, समृद्ध कोकण संघटना५० इमएलडी क्षमतेच्या पाईपलाईनचे काम अपूर्णावस्थेत असल्याने दररोज २ पैसे प्रति लिटर असे दररोज ५ लाख रु पये दंड म्हणून विभागीय कोकण आयुक्तांकडे भरण्याची नोटीस बजावली आहे. मात्र पैसे अजूनही जमा केलेले नाहीत.- मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारीकरोडोंचा निधी झाला खर्च, अनेक कामे सुरूजिल्हा पर्यटन विकास कार्यक्र मांतर्गत सन २०१५-१६ साठी जिल्हास्तरीय पर्यटन विकास कार्यक्र मा अंतर्गत वन पर्यटन, प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत १३८ कोटी ८ लाख १९ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून ९० कोटी ५ लाख १८ हजाराच्या निधीतून ८९ कामे मंजूर करण्यात आली आहे.२०१६-१७ साला करिता १२९ कोटी २ लाख २३ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून ८० कोटी १लाख ३३ हजाराच्या निधीतून ६१ कामे मंजूर करण्यात आली असून ११ कामे पूर्ण झाली असून ५० प्रगतीपथावर आहेत.सन २०१७-१८ साला करिता ११४ कोटी ७ लाख ३२ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून ५९ कोटी ७ लाख ३१ हजाराच्या निधीतून ३१ कामांना मंजुरी मिळाली पण एकही काम पूर्ण झाले नसून ३१ अशी सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.सन २०१५ ते २०१८ सालात एकूण ३८२ कोटी ७ लाख ४७ हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून २३० कोटी ३ लाख ८२ हजारा च्या निधीतून १८१ कामांना मंजुरी मिळाली असून ८४ कामे पूर्ण होत ३१ कामे प्रगतीपथावर असून पर्यटनाला मोठा वाव देण्यात आला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpollutionप्रदूषण