शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

पर्यटन कंपन्या दिवाळखोरीच्या वाटेवर, व्यावसायिक हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 01:28 IST

व्यावसायिक हवालदिल । कुटुंबासह रस्त्यावर येण्याची वेळ

नालासोपारा : कोरोनाच्या विळख्यात वसईतील पर्यटन कंपन्याही अडकल्या आहेत. सर्वच सहली रद्द झाल्यामुळे या कंपन्या दिवाळखोरीच्या वाटेला लागल्या आहेत. शालान्त परीक्षा संपून सुट्यांचा हंगाम सुरू होईल तसा मुंबई, वसई आणि जवळपासच्या परिसरातील लोकांचा पर्यटनाला उत्तम प्रतिसाद मिळेल. या आशेने सहल कंपन्यांनी डिसेंबर-जानेवारीपासून नियोजनास सुरुवात करून तयारी केली. या सर्वांवर कोरोनाच्या जागतिक संकटाने पाणी फिरले आहे.

देश-विदेशांतील सहली, तीर्थयात्रा, सिनीयर सिटीझन्स टूर्स, पॅकेज टूर्स, समूह सहलीसाठी मार्गदर्शन करून सेवा-सुविधा या कंपन्या देतात. पर्यटन क्षेत्रात आधीच तीव्र स्पर्धा आहे. मात्र, पारंपरिक ग्राहक याच पर्यटन कंपन्यांकडे येतात. जीवघेणी स्पर्धा, आर्थिक ओढाताण, नैसर्गिक आपत्ती, राजकीय व प्रादेशिक आंदोलने अशा प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असलेल्या पर्यटक कंपन्या कोरोनामुळे पार उद्ध्वस्त झाल्या आहेत. सगळीकडे बुकिंगच्या रकमा भरल्या होत्या. विमान, बस, रेल्वे व इतर सोयीसाठी आगाऊ रक्कम भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा अडकून पडला आहे. त्यामुळे या कंपन्यांचे संचालक हवालदिल झाले आहेत.महामारीच्या भीतीने लोक घराबाहेर पडत नाहीत आणि टाळेबंदीच्या कालावधीत सतत वाढच होत आहे. यामुळे या व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. मदत मागायची तरी कुणाकडे? केंद्र आणि राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन लवकर हालचाल केली नाही, तर हा उद्योग मरणावस्थेत पोहोचेल आणि आत्मनिर्भरता या घोषणेचा उद्देश असफल होईल.- रिक्सन तुस्कानो, पर्यटन कंपनीचे संचालक

टॅग्स :MumbaiमुंबईVasai Virarवसई विरार